शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मालवणमधील पर्यटन हंगाम आता शेवटच्या टप्यात; किल्ले दर्शन, साहसी जलक्रीडा कधी बंद होणार.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 17:55 IST

संदीप बोडवे मालवण: मालवण मधील पर्यटन हंगाम शेवटच्या टप्यात आहे. यामुळे येथील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजलेले आहेत. दरम्यान पर्यटन ...

संदीप बोडवेमालवण: मालवण मधील पर्यटन हंगाम शेवटच्या टप्यात आहे. यामुळे येथील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजलेले आहेत. दरम्यान पर्यटन हंगामाची सांगता २५ मे पासून होणार आहे. त्यामुळे येथील किल्ले दर्शन, साहसी जलक्रीडा प्रकार बंद होणार आहेत. शिवाय हवामान विभागाने यावेळी २० मे नंतर पावसाला सुरवात होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता पर्यटन हंगामात केवळ सहा सात दिवसांचा व्यवसाय पर्यटन व्यावसायिकांना मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पर्यटन व्यवसायाची व्याप्ती पाहता पावसाळी पर्यटनासाठी शासनाने नियोजन करणे आवश्यक आहे. यावर्षीच्या पर्यटन हंगामाची सुरवात तर दिमाखात झाली. ऑक्टोबरपासून सुरवात झालेल्या या हंगामात पर्यटकांची मोठी गर्दी जिल्ह्यात झाली. पर्यटकांचा ओढा हा किनारपट्टी भागाकडे असल्याने तारकर्ली, देवबाग, वायरी भुतनाथ, दांडी, बंदर जेटी, चिवला बीच, आचरा, तळाशील बीच याकडे पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे तसेच त्यांच्याकडून साहसी जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटता जात असल्याचे दिसून आले. यातून पर्यटन व्यावसायिकांचा चांगला व्यवसायही झाला. उन्हाळी सुट्टी उशिरा पडल्याने फटकाजानेवारी, फेब्रुवारी महिन्यातही येथे पर्यटकांचा ओघ बर्‍यापैकी होता. मात्र दहावी, बारावी परिक्षांमुळे किरकोळ पर्यटकच येथे दाखल झाले. या परिक्षा झाल्यानंतर पर्यटकांचा ओघ वाढेल अशी अपेक्षा पर्यटन व्यावसायिकांकडून बाळगली जात होती. मात्र माध्यमिक शाळा एप्रिल महिन्याच्या 25 तारखेपर्यत सुरू राहिल्याने मे महिन्यातील सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी कुटुंबवत्सल पर्यटक फारच कमी प्रमाणात दाखल झाले. याचा फटका पर्यटन व्यावसायिकांना बसल्याचे दिसून आले. पहलगाम हल्ल्यानंतर अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्दपहलगाम हल्ल्यानंतर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने अधिकारी वर्गाच्या सुट्ट्या रद्द झाल्या. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागातून येथे येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. ऐन पर्यटन हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पर्यटकांची संख्या रोडावल्याने त्याचा फटका साहसी जलक्रीडा प्रकारासह अन्य छोट्या पर्यटन व्यावसायिकांना बसला आहे. सलग सुट्ट्यांच्या कालावधीत गर्दीवातावरणातील वाढती उष्णता यामुळेही पर्यटक कमी प्रमाणात येथे दाखल होत असल्याचे दिसून येत आहे. मे महिन्यात येथील पर्यटन हंगाम हाऊसफुल असल्याचे गेल्या काही वर्षात दिसून आले. मात्र यावेळी पर्यटक केवळ शुक्रवार ते रविवार या सलग सुट्टीच्या काळातच येथे मोठ्या प्रमाणात येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात या पर्यटकांची गर्दी होत आहे. निवासासाठी आगाऊ आरक्षण नाहीचमे महिन्यातील पर्यटन हंगामात किनारपट्टी भागात पर्यटकांकडून निवासाचे आगाऊ आरक्षण केले जात होते. मात्र यावेळी अशी परिस्थिती किनारपट्टी भागात दिसून आली नाही. येथे येणारे पर्यटक केवळ साहसी जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटून, किल्ले सिंधुदुर्ग, रॉकगार्डन तसेच अन्य पर्यटन स्थळांना भेट देऊन माघारी परतत असल्याचे दिसून आले.राजकोट येथे शिवपुतळा राहणार आकर्षणराजकोट येथे नव्याने पुन्हा उभारण्यात आलेला ९१ फूट उंचीचा शिवाजी महाराजांचा पुतळा हा आता पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू राहणार आहे. पावसाळ्यात सागरी पर्यटन बंद असले तरी शिवपुतळा पाहण्याची संधी पर्यटकांना असणार आहे. त्यामुळे शिवपुतळा पाहण्यासाठी यावर्षी पावसाळ्यातही पर्यटक दाखल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटनMalvan beachमालवण समुद्र किनारा