शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कणकवलीत संपूर्ण जागेत उड्डाण पूलच होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 12:22 IST

Pramod Jathar, Highway, Bjp, Kankavli, sindhudurngnews सिंधुदुर्गात महामार्गाच्या चौपदरीकरण अंतर्गत कणकवलीतील बॉक्सेलच्या कोसळलेल्या भागाच्या ठिकाणी गर्डर टाकून उड्डाणपूल करण्याबाबत प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे . या भागात उड्डाणपूलच होणार असल्याची ग्वाही भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिली.

ठळक मुद्देकणकवलीत संपूर्ण जागेत उड्डाण पूलच होणार ! प्रमोद जठार यांचा दावा

कणकवली : महामार्ग चौपदरीकरणाचे काम सिंधुदुर्गात अंतिम टप्प्यात आले असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील रखडलेल्या कामासंदर्भात टास्क फोर्सच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जात आहेत.

सिंधुदुर्गात महामार्गाच्या चौपदरीकरण अंतर्गत कणकवलीतील बॉक्सेलच्या कोसळलेल्या भागाच्या ठिकाणी गर्डर टाकून उड्डाणपूल करण्याबाबत प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे . या भागात उड्डाणपूलच होणार असल्याची ग्वाही भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिली.कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हा चिटणीस रवींद्र शेट्ये , भाजपा ओबीसी सेलचे मुंबई प्रदेश अध्यक्ष नरेंद्र गावकर , क्रीडा भारती अध्यक्ष रवी करमळकर , नगरसेवक शिशीर परुळेकर आदी उपस्थित होते .प्रमोद जठार म्हणाले, कोरोनामुळे देशभरात अनेक विकासकामांचे फंड आरोग्याच्या बाबीवर वळविण्यात आले आहेत. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे . त्यामुळे ४० कोटी काय ? ४०० कोटी लागले तरी उड्डाणपूलाचे हे काम होईल.परशुराम घाटामध्ये चौपदरीकरणाचा प्रश्न रखडलेला होता . तेथील जमीन मालक व परशुराम देवस्थानचे ट्रस्टी यांच्यात समन्वय साधत हा प्रश्न मार्गी लावण्यात आला . तेथे आता चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे . संगमेश्वर मध्ये ४५ मीटर भूसंपादन करण्यात आले होते . मात्र शास्त्री पुलाचे स्ट्रक्चर बदलल्याने तेथे ६० मीटर भूसंपादनाची आवश्यकता भासत होती . त्याबाबतही मार्ग काढण्यात आला असून ४५ मीटरमध्ये काम करण्यात येत आहे.महाविकास आघाडीचे प्रणेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आत्मचरित्रात एपीएमसी मार्केट बंद व दलालांची साखळी तोडण्याबाबत समर्थन करण्यात आले आहे . दलाल माजल्यामुळे भारत बंद चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला . मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी जवान व किसान असल्यामुळेच कोकण व मुंबईत भारत बंदचा फज्जा उडाला आहे.केंद्र सरकारने आणलेल्या कायद्यातील तरतुदीनुसार जर ठेकेदाराने अटी - शर्ती पाळल्या नाहीत तर त्याला शिक्षा होऊ शकते . यामुळे दलालांचे धाबे दणाणले आहेत . शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून हे विधेयक आणण्यात आले . त्याला शेतकऱ्यांकडूनही पाठिंबा मिळायला हवा .भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे १८ ते २० डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत . या तीन दिवसांच्या दौऱ्यात २० डिसेंबर रोजी दौऱ्याच्या संदर्भातील नियोजनाच्या बाबीमध्ये माझ्यावर एक दिवसाचा दिन प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे .त्यामुळे कोकणाचा हा सन्मान करण्यात आला आहे. असेही जठार यावेळी म्हणाले.जनतेला ठरवू दे प्रकल्प हवा की नको !जनता विकास कामांबाबत प्रगल्भता दाखवते . मात्र तिच प्रगल्भता शिवसेनेच्या खासदारांकडे नाही. जर रिफायनरी प्रकल्प झाला असता तर रोजगारा नसल्याने कोकणातल्या तरुणावर उपासमारीची वेळ आली नसती . खासदार प्रकल्प हवा की नको ते ठरवत आहेत . मात्र , मुख्यमंत्र्यांनी याबाबत अधिसूचना काढावी मग जनतेला ठरवू दे प्रकल्प हवा की नको ते , असे प्रमोद जठार यावेळी म्हणाले . 

 

 

 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाKankavliकणकवलीPramod Jatharप्रमोद जठार