शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
4
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
5
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
6
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
7
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
8
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
9
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
10
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
11
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
12
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
13
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
14
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
15
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
16
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
17
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
18
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
19
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
20
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...

कणकवलीत संपूर्ण जागेत उड्डाण पूलच होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 12:22 IST

Pramod Jathar, Highway, Bjp, Kankavli, sindhudurngnews सिंधुदुर्गात महामार्गाच्या चौपदरीकरण अंतर्गत कणकवलीतील बॉक्सेलच्या कोसळलेल्या भागाच्या ठिकाणी गर्डर टाकून उड्डाणपूल करण्याबाबत प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे . या भागात उड्डाणपूलच होणार असल्याची ग्वाही भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिली.

ठळक मुद्देकणकवलीत संपूर्ण जागेत उड्डाण पूलच होणार ! प्रमोद जठार यांचा दावा

कणकवली : महामार्ग चौपदरीकरणाचे काम सिंधुदुर्गात अंतिम टप्प्यात आले असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील रखडलेल्या कामासंदर्भात टास्क फोर्सच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जात आहेत.

सिंधुदुर्गात महामार्गाच्या चौपदरीकरण अंतर्गत कणकवलीतील बॉक्सेलच्या कोसळलेल्या भागाच्या ठिकाणी गर्डर टाकून उड्डाणपूल करण्याबाबत प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे . या भागात उड्डाणपूलच होणार असल्याची ग्वाही भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिली.कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हा चिटणीस रवींद्र शेट्ये , भाजपा ओबीसी सेलचे मुंबई प्रदेश अध्यक्ष नरेंद्र गावकर , क्रीडा भारती अध्यक्ष रवी करमळकर , नगरसेवक शिशीर परुळेकर आदी उपस्थित होते .प्रमोद जठार म्हणाले, कोरोनामुळे देशभरात अनेक विकासकामांचे फंड आरोग्याच्या बाबीवर वळविण्यात आले आहेत. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे . त्यामुळे ४० कोटी काय ? ४०० कोटी लागले तरी उड्डाणपूलाचे हे काम होईल.परशुराम घाटामध्ये चौपदरीकरणाचा प्रश्न रखडलेला होता . तेथील जमीन मालक व परशुराम देवस्थानचे ट्रस्टी यांच्यात समन्वय साधत हा प्रश्न मार्गी लावण्यात आला . तेथे आता चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे . संगमेश्वर मध्ये ४५ मीटर भूसंपादन करण्यात आले होते . मात्र शास्त्री पुलाचे स्ट्रक्चर बदलल्याने तेथे ६० मीटर भूसंपादनाची आवश्यकता भासत होती . त्याबाबतही मार्ग काढण्यात आला असून ४५ मीटरमध्ये काम करण्यात येत आहे.महाविकास आघाडीचे प्रणेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आत्मचरित्रात एपीएमसी मार्केट बंद व दलालांची साखळी तोडण्याबाबत समर्थन करण्यात आले आहे . दलाल माजल्यामुळे भारत बंद चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला . मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी जवान व किसान असल्यामुळेच कोकण व मुंबईत भारत बंदचा फज्जा उडाला आहे.केंद्र सरकारने आणलेल्या कायद्यातील तरतुदीनुसार जर ठेकेदाराने अटी - शर्ती पाळल्या नाहीत तर त्याला शिक्षा होऊ शकते . यामुळे दलालांचे धाबे दणाणले आहेत . शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून हे विधेयक आणण्यात आले . त्याला शेतकऱ्यांकडूनही पाठिंबा मिळायला हवा .भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे १८ ते २० डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत . या तीन दिवसांच्या दौऱ्यात २० डिसेंबर रोजी दौऱ्याच्या संदर्भातील नियोजनाच्या बाबीमध्ये माझ्यावर एक दिवसाचा दिन प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे .त्यामुळे कोकणाचा हा सन्मान करण्यात आला आहे. असेही जठार यावेळी म्हणाले.जनतेला ठरवू दे प्रकल्प हवा की नको !जनता विकास कामांबाबत प्रगल्भता दाखवते . मात्र तिच प्रगल्भता शिवसेनेच्या खासदारांकडे नाही. जर रिफायनरी प्रकल्प झाला असता तर रोजगारा नसल्याने कोकणातल्या तरुणावर उपासमारीची वेळ आली नसती . खासदार प्रकल्प हवा की नको ते ठरवत आहेत . मात्र , मुख्यमंत्र्यांनी याबाबत अधिसूचना काढावी मग जनतेला ठरवू दे प्रकल्प हवा की नको ते , असे प्रमोद जठार यावेळी म्हणाले . 

 

 

 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाKankavliकणकवलीPramod Jatharप्रमोद जठार