शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात प्रादेशिक तर केंद्रात राष्ट्रीय पक्ष असावेत : राज ठाकरे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 15:43 IST

मोदीमुक्त भारत झालाच पाहिजे, ही काळाची गरज आहे. पालघरमध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आणून हिंदूंची मते काही बदलणार नाहीत, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला लगावला. राज्यात प्रादेशिक तर केंद्रात राष्ट्रीय पक्षांची सत्ता असावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. मात्र शिवसेनेबरोबर युती करण्याबाबत त्यांनी यावेळी मौन पाळले.

ठळक मुद्देराज्यात प्रादेशिक तर केंद्रात राष्ट्रीय पक्ष असावेत : राज ठाकरे यांचे मतमोदीमुक्त भारत झालाच पाहिजेप्रलंबित प्रश्नांसाठी कोकणी जनतेने हिसका दाखवावा

सिंधुदुर्ग : मोदीमुक्त भारत झालाच पाहिजे, ही काळाची गरज आहे. पालघरमध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आणून हिंदूंची मते काही बदलणार नाहीत, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला लगावला. राज्यात प्रादेशिक तर केंद्रात राष्ट्रीय पक्षांची सत्ता असावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. मात्र शिवसेनेबरोबर युती करण्याबाबत त्यांनी यावेळी मौन पाळले.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मंगळवारपासून नियोजित कोकण दौरा सुरू झाला आहे. त्यांनी सावंतवाडी येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कुडाळ येथे पत्रकारांशी संवाद साधत वेगवेगळ््या विषयांवर रोखठोक मते मांडली. कोकणी जनतेने हिसका दाखविला तरच येथील प्रलंबित प्रश्न सुटतील, असेही त्यांनी सांगितले.यावेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई, मनसेचे कोकण नेते शिरीष सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष धीरज परब, राजन दाभोलकर, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी, महिला तालुकाध्यक्षा सुप्रिया मेहता, बाबल गावडे, दीपक गावडे, राजू टंगसाळी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.आपल्या ठाकरे शैलीत राज यांनी पत्रकारांच्या वेगवेगळ््या प्रश्नांना रोखठोक उत्तरे दिली. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना या ठिकाणी अपघात होऊन पाच जणांचे बळी गेले, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र याकडे महामार्ग प्रशासन व ठेकेदार कंपनी दुर्लक्ष करीत आहे. यावर ठाकरे म्हणाले की, जर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी रहात असते तर येथील महामार्गाचे काम लवकर झाले असते.बुलेट ट्रेन व मुंबई-बडोदा महामार्ग यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जात आहेत. सहा ते सात वर्षे हे काम सुरू आहे, त्याचे काय? कोकणी जनतेने हिसका दाखविला पाहिजे. तो दाखविला जात नसल्यानेच येथील प्रश्न प्रलंबित आहेत, असे त्यांनी सांगितले.पालघर येथे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचारासाठी येत आहेत, या प्रश्नावर आदित्यनाथांच्या कुठेही जाण्याने काहीही फरक पडत नाही. हिंदू मतांचा काय संबंध? योगी हिंदू मते फिरवू शकतात का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसच्या सत्ता स्थापनेवर राज म्हणाले की, केंद्र्रात काहीही होऊ दे, पण राज्यात प्रादेशिक पक्षच हवा. कारण प्रादेशिक पक्षांनाच राज्याच्या अस्मितेची आणि येथील प्रश्नांची जाण असते. त्यामुळे राज्यात राष्ट्रीय पक्षांना स्थान मिळता कामा नये. सिद्धरामय्यांनी कर्नाटकात जे करून दाखविले ती हिंमत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का दाखवित नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.प्रादेशिक पक्षाचा महाराष्ट्रात विचार झाला असता, तर नाणारमध्ये परप्रांतीयांच्या जमिनी घेण्याची हिंमत झाली नसती. मनसेचे सरकार असते तर अशी हिंमत परप्रांतीयांनी केली असती का, असा सवालही त्यांनी केला.मोदींची लाट ओसरली असे वाटते का? असा थेट सवाल ठाकरे यांना केला असता ते म्हणाले, मोदीमुक्त भारत हवाच. गुजरातमधील निकालावरून मोदींची लाट ओसरली असे वाटते. माझा त्या ई.व्ही.एम. मशीनवर संशय आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीतही या मशीनबाबत संशय होता, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRaj Thackerayराज ठाकरे