शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

राज्यात प्रादेशिक तर केंद्रात राष्ट्रीय पक्ष असावेत : राज ठाकरे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 15:43 IST

मोदीमुक्त भारत झालाच पाहिजे, ही काळाची गरज आहे. पालघरमध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आणून हिंदूंची मते काही बदलणार नाहीत, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला लगावला. राज्यात प्रादेशिक तर केंद्रात राष्ट्रीय पक्षांची सत्ता असावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. मात्र शिवसेनेबरोबर युती करण्याबाबत त्यांनी यावेळी मौन पाळले.

ठळक मुद्देराज्यात प्रादेशिक तर केंद्रात राष्ट्रीय पक्ष असावेत : राज ठाकरे यांचे मतमोदीमुक्त भारत झालाच पाहिजेप्रलंबित प्रश्नांसाठी कोकणी जनतेने हिसका दाखवावा

सिंधुदुर्ग : मोदीमुक्त भारत झालाच पाहिजे, ही काळाची गरज आहे. पालघरमध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आणून हिंदूंची मते काही बदलणार नाहीत, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला लगावला. राज्यात प्रादेशिक तर केंद्रात राष्ट्रीय पक्षांची सत्ता असावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. मात्र शिवसेनेबरोबर युती करण्याबाबत त्यांनी यावेळी मौन पाळले.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मंगळवारपासून नियोजित कोकण दौरा सुरू झाला आहे. त्यांनी सावंतवाडी येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कुडाळ येथे पत्रकारांशी संवाद साधत वेगवेगळ््या विषयांवर रोखठोक मते मांडली. कोकणी जनतेने हिसका दाखविला तरच येथील प्रलंबित प्रश्न सुटतील, असेही त्यांनी सांगितले.यावेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई, मनसेचे कोकण नेते शिरीष सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष धीरज परब, राजन दाभोलकर, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी, महिला तालुकाध्यक्षा सुप्रिया मेहता, बाबल गावडे, दीपक गावडे, राजू टंगसाळी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.आपल्या ठाकरे शैलीत राज यांनी पत्रकारांच्या वेगवेगळ््या प्रश्नांना रोखठोक उत्तरे दिली. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना या ठिकाणी अपघात होऊन पाच जणांचे बळी गेले, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र याकडे महामार्ग प्रशासन व ठेकेदार कंपनी दुर्लक्ष करीत आहे. यावर ठाकरे म्हणाले की, जर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी रहात असते तर येथील महामार्गाचे काम लवकर झाले असते.बुलेट ट्रेन व मुंबई-बडोदा महामार्ग यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जात आहेत. सहा ते सात वर्षे हे काम सुरू आहे, त्याचे काय? कोकणी जनतेने हिसका दाखविला पाहिजे. तो दाखविला जात नसल्यानेच येथील प्रश्न प्रलंबित आहेत, असे त्यांनी सांगितले.पालघर येथे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचारासाठी येत आहेत, या प्रश्नावर आदित्यनाथांच्या कुठेही जाण्याने काहीही फरक पडत नाही. हिंदू मतांचा काय संबंध? योगी हिंदू मते फिरवू शकतात का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसच्या सत्ता स्थापनेवर राज म्हणाले की, केंद्र्रात काहीही होऊ दे, पण राज्यात प्रादेशिक पक्षच हवा. कारण प्रादेशिक पक्षांनाच राज्याच्या अस्मितेची आणि येथील प्रश्नांची जाण असते. त्यामुळे राज्यात राष्ट्रीय पक्षांना स्थान मिळता कामा नये. सिद्धरामय्यांनी कर्नाटकात जे करून दाखविले ती हिंमत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का दाखवित नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.प्रादेशिक पक्षाचा महाराष्ट्रात विचार झाला असता, तर नाणारमध्ये परप्रांतीयांच्या जमिनी घेण्याची हिंमत झाली नसती. मनसेचे सरकार असते तर अशी हिंमत परप्रांतीयांनी केली असती का, असा सवालही त्यांनी केला.मोदींची लाट ओसरली असे वाटते का? असा थेट सवाल ठाकरे यांना केला असता ते म्हणाले, मोदीमुक्त भारत हवाच. गुजरातमधील निकालावरून मोदींची लाट ओसरली असे वाटते. माझा त्या ई.व्ही.एम. मशीनवर संशय आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीतही या मशीनबाबत संशय होता, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRaj Thackerayराज ठाकरे