शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग बाहेरून गेल्याचा सावंतवाडीवर परिणाम नाही, केसरकर-साळगावकर यांचे एकमत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:38 IST

शहरातून रस्ता न जाता तो बाहेरून गेल्यामुळे बाजारपेठेवर कोणताही परिणाम झाला नाही. रोजगार आला की विकास आपणच होतो, असे उद्गार नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी काढले. त्याला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत साळगावकरांचीच री पुढे ओढली.

 सावंतवाडी - शहरातून रस्ता न जाता तो बाहेरून गेल्यामुळे बाजारपेठेवर कोणताही परिणाम झाला नाही. रोजगार आला की विकास आपणच होतो, असे उद्गार नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी काढले. त्याला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत साळगावकरांचीच री पुढे ओढली. यापुढे सावंतवाडी उद्योगात रोल मॉडेल असेल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच साळगावकरांच्या संकल्पनेतील विकास परिषद आपल्या अध्यक्षतेखाली होण्यासही मंत्री केसरकर यांनी हिरवा कंदिल दर्शविला आहे.

एका खासगी कार्यक्रमासाठी मंत्री दीपक केसरकर यांच्यासह नगराध्यक्ष बबन साळगावकर हे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी गेल्या सत्तर वर्षात विकास झाला नाही. तो विकास आता होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन विकासाची दिशा ठरवूया, असे सांगितले. तसेच सावंतवाडीच्या बाहेरून रस्ता गेला म्हणजे सावंतवाडीतील धंदा कमी झाला असे होत नाही. आता नव्याने वेगवेगळे प्रकल्प येत आहेत. ते प्रकल्प रोजगाराबरोबरच विकासाला दिशा देणारे ठरतील, अशी अपेक्षाही साळगावकर यांनी व्यक्त करत आम्ही विकास परिषद घेतो ती तुमच्या अध्यक्षतेखाली व्हावी, अशी अपेक्षा व्यकत केली.यावेळी बोलतना मंत्री केसरकर म्हणाले, सिंधुदुर्गमध्ये रोजगाराचे एक नवे पर्व सुरू होत आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. सावंतवाडीजवळ चष्म्याचा कारखाना तसेच डाटा सेंटरही सुरू करण्यात येणार आहे. यातून थेट पाचशे महिलांना सावंतवाडीत रोजगार मिळेल. तर इतर ठिकाणी रोजगार मिळेल तो वेगळाच आहे. त्या शिवाय आपला आयएएस व आयएपीएस सेंटरही लवकरच मार्गी लागणार आहे. सिंधुदुर्गचा झपाट्याने विकास होत असताना चिपीमध्ये पहिले विमान १२ सप्टेंबरलाच येणार आहे. माल्टातून पहिले विमान चिपीला येईल, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले. सिंधुदुर्ग पर्यटनात अग्रेसर असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.सावंतवाडी ही विकासाचे रोल मॉडेल करत असतानाच बाहेरून रस्ता गेला म्हणजे धंदा होत नाही असे नाही. मात्र आता ती मानसिकता सर्वांनी सोडून देऊन नवीन स्वीकारण्याची तयारी ठेवूया. रोजगारातून विकास साधूया, असे सांगत यापुढे सावंतवाडीतील शिल्पग्राम तसेच हेल्थ फार्म सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.  ७२ कोटीचा निधी मागे जाणार होतासिंधुदुर्गमध्ये मागील वर्षातील ७२ कोटीचा निधी मागे जाणार होता. पण तो मी दोन महिन्यांसाठी थांबवला आणि तो खर्ची पडत आहे. हे मी अर्थराज्य मंत्री असल्याने शक्य झाले, अन्यथा निधी मागे गेला असता. अधिकाºयांनीही आता चांगले काम केले पाहिजे, अशी अपेक्षाही मंत्री केसरकर यांनी यावेळी व्यक्त 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्गnewsबातम्या