शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात विंचूदंशाचे प्रमाण वाढले

By admin | Updated: October 29, 2014 00:09 IST

आरोग्य विभाग : सर्पदंशाचे प्रमाण मात्र सर्वांत कमी

राजेश कांबळे - अडरे -चिपळूण तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या ग्रामीण भागातील परिसरात सप्टेंबरअखेर अनेकांना विंचूदंश, सर्पदंश व श्वानदंश झाल्याची नोंद आहे. यामध्ये ३३२ जणांना विंचूदंश, २७५ जणांना श्वानदंश, सर्पदंश ७३ झाला आहे. यातील एकही रुग्ण दगावलेला नाही, अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.चिपळूण तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांंतर्गत एप्रिल ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत या परिसरातील ग्रामीण भागात विंचू, श्वान व सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात पायवाटांना धुरळा पडतो. शिवाय वातावरणात उष्णता अधिक असल्याने विंचूदंशाचे प्रमाण वाढते. कौलारु घरांचाही विंचू आधार घेतात. तर उष्ण हवामान असल्याने सरपटणारे प्राणी फारसे रस्त्यावर येत नाहीत. त्यामुळे सर्पदंशाचे प्रमाण कमी होते. सध्या मोकाट व भटक्या श्वानांचे प्रमाण वाढले आहे. श्वानांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने किंवा ते मारले जात नसल्याने भटक्या श्वानदंशाचे प्रमाण अधिक आहे. कोकणातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांना विंचूदंश होण्याच्या घटना घडत असतात. वातावरणात बदल किंवा शेतीपूर्व मशागत, लावणीच्या कामाच्या वेळी, इतर कामानिमित्त शेतकरी व इतरांना विंचूदंश होतो. तसेच ग्रामीण भागात जंगलाचे प्रमाणही जास्त असल्याने शेतकरी सकाळी पहाटेपासून ते सायंकाळपर्यंत काम करत असतात. यावेळी अचानक दंश होण्याच्या घटना घडत असतात. श्वान, सर्प व विंचूदंश झालेल्या रुग्णास प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत दाखल करुन त्यांच्यावर औषधोपचार व इंजेक्शन देवून त्या रूग्णांना बरे केले जाते. यासाठी रुग्ण कल्याण समितीच्या मंजुरीने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत स्नेकबाईट व विंचूदंशाची इंजेक्शन उपलब्ध केली जातात. त्यामुळे विंचू किंवा सर्पदंश झाल्याने दगावण्याचे प्रमाण ० टक्के आहे. चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात विंचूदंशाचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाल्याने आता विंचूदंश झाल्यानंतर त्याला प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे. दरवर्षी याच हंगामात विंचू दंशावरील लस उपलब्ध नसल्याचे समोर येत असताना ही लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी आरोग्य विभागाकडे केली आहे. चपळूण तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या आकडेवारीनुसार विंचूदंशाच्या प्रमाणात वाढ.उन्हाळ्यात वाढते सर्पदंशाचे प्रमाण. एकही रूग्ण दगावला नसल्याचे स्पष्ट. उपाययोजना आवश्यक असल्याचे स्पष्ट.