शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'तो' फलक लावण्याचे काम उद्धव सेनेचे, दीपक केसरकर यांचा आरोप

By अनंत खं.जाधव | Updated: May 4, 2024 19:46 IST

सावंतवाडी : उद्धव शिवसेनेकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही ते फक्त आग लावायची आणि स्वतःची पोळी भाजून घेण्याचा उद्योग करत ...

सावंतवाडी : उद्धव शिवसेनेकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही ते फक्त आग लावायची आणि स्वतःची पोळी भाजून घेण्याचा उद्योग करत आहेत. काजू बागायतदार शेतकरी यांचा फलक लावण्यात आलेले आहे तो उद्धव शिवसेनेचे उद्योग आहेत असा आरोप शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केला. सावंतवाडीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.केसरकर म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे आहेत. ते एकट्या कुणाचे नाही असा टोला उद्धव ठाकरे यांना केसरकर यांना लगावला. अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांनी कोकण, महाराष्ट्रासाठी काही केले नाही. त्यामुळे खोटे नाटे आरोप करत आहेत. काजू बागायतदारा बाबत जो फलक लावण्यात आला आहे त्याबद्दल केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. काजू बागायतदार शेतकरी आणि बागायतदार संघाचे प्रतिनिधी यांची आणि कारखानदार यांच्यात समन्वय घडवून आणला आणि काजू दराबाबत निश्चिती केली. तसेच काजू बी प्रतिकिलो अनुदान १० रूपये दिले. मात्र आचारसंहितेमुळे ते निवडणुकीनंतर होईल असेही केसरकर यांनी सांगितले.काजू बोर्ड स्थापन करून पुढील वर्षी काजू खरेदीला प्राधान्य दिले जाईल. काजू उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. जनतेसोबत आम्ही आहोत, त्यामुळे उध्दव शिवसेना फक्त आग लावायचा धंदा करत आहे असा आरोप ही केसरकर यांनी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Farmerशेतकरी