शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिल्लीच्या तख्तावरही भगव्याची प्रतिष्ठापना करू - उद्धव ठाकरे 

By सुधीर राणे | Updated: February 5, 2024 17:49 IST

'आता एकच नारा द्यायचा, अब की बार, भाजप तडीपार'

कणकवली: युद्ध जिंकायची असतील तर फक्त तलवारीने जिंकता येत नाहीत. तर त्यासाठी मनगटात ताकद हवी, मनही खंबीर हवे. आगामी निवडणूक आपल्या भवितव्याची निवडणूक आहे. भाजपला सत्तेतून दूर करून आपणाला पुन्हा एकदा भगव्याची  प्रतिष्ठापणा विधानसभेतच नव्हे तर दिल्लीच्या तख्तावरही करावी लागेल असे प्रतिपादन ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या जनसंवाद यात्रे निमित्तच्या  जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत, युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई, आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक, आमदार रमेश कोरगावकर, उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर, मुंबईचे  माजी महापौर दत्ता दळवी, सिंधुदुर्गचे संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, कणकवली विधानसभा मतदारसंघप्रमुख सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.ठाकरे म्हणाले,  भाजपवाले आता नारा देत आहेत, 'अब की बार चारसो पार' , मग त्यांच्यात हिंमत असेल तर स्वतःच्या हिमतीवर त्यांनी तेवढे खासदार निवडून आणावे. चारसो पारची खात्री असेल तर का फोडाफोडी करता? तिकडे नितीशकुमारना फोडले, सोरेनना अटक करता, ईडी, सीबीआय पाठी लावता, म्हणूनच यावेळी आता एकच नारा द्यायचा, अब की बार, भाजप तडीपार'. कोकणच्या या दौऱ्यात भगवे वादळ दिसत असून ते दिल्लीच्या दिशेने पुढे सरकत आहे, तुमची साथ अशीच असेल तर भारताच्या लोकशाहीचा गोवर्धन मी उचलल्याशिवा राहणार नाही.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा