शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

आंबोली वनविभागाची पाण्यासाठी सुरू असलेली वणवण अखेर संपली, उपवनसंरक्षकांनी लढवली शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 18:21 IST

आंबोलीत चेरापुंनंतरचा सर्वाधिक पाऊस पडत असतो. पण येथे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

अनंत जाधवसावंतवाडी : गेल्या अनेक वर्षांपासून वनविभागाला आंबोलीत पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. कोणताही प्रकल्प राबवला तरी तो पाण्याअभावी वाया जात होता. याची दखल घेत उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी गंभीर दखल घेत नैसर्गिक पाण्याचे स्रोतातून थेट पाइपलाइनने हे पाणी नाममात्र खर्चात वनविभागाच्या आवारात आणले. उपवनसंरक्षकांच्या या एका निर्णयाने वनविभाग पाण्यात स्वयंपूर्ण झाल्याचे दिसून आले आहे.

आंबोलीत चेरापुंनंतरचा सर्वाधिक पाऊस पडत असतो. पण येथे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेली अनेक वर्षे तर येथील वनविभाग पाण्यासाठी वणवण करत होता. येथे दरवर्षी कोट्यवधी रुपये हे वेगवेगळ्या विकासकामासाठी खर्च होत असतात; पण हे सर्व प्रकल्प पाण्याअभावी पडून राहात किंवा खर्च तरी वाया जातो.

येथील फुलपाखरू गार्डनवर तर दोन वेळा खर्च करण्यात आला. मात्र उन्हाळ्यात हे गार्डन करपून गेले, असे अनेक प्रकल्प आहेत. तत्कालीन अधिकाऱ्यांनी पाण्यासाठी केलेल्या उपाययोजना ही तुटपुंज्या ठरल्या. त्यामुळे आलेल्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाकडे लक्ष दिले; पण पाण्याकडे लक्षच दिले नाही.

मात्र सध्याचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर हे त्याला अपवाद ठरले असून, त्यानी आंबोलीतील निसर्गाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. तसेच कायमस्वरूपी पाण्यासाठी काय करता येईल याकडे लक्ष दिले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की आंबोलीत नैसर्गिक पाणी स्त्रोत भरपूर आहेत मग त्यातून पाणी आणले तर मोठा खर्चही येणार नाही.

म्हणून त्यांनी तेथील परिक्षित पॉइंट येथे पाण्याच्या असलेल्या झऱ्याला पाइपलाइन टाकून ते पाणी थेट आंबोली वनबागेत आणण्यात आले. तब्बल दीड किलोमीटरची पाइपलाइन आहे. या एका निर्णयामुळे आंबोलीतील वनविभागाची पाण्यासाठी होणारी वणवण कायमस्वरूपी सुटली आहे. वनविभाग पाणीप्रश्नात कायमस्वरूपी स्वयंपूर्ण बनला आहे. उपवनसंरक्षक नारनवर यांनी घेतलेला एक निर्णय फायदेशीर ठरलाच, शिवाय शासनाचे कोट्यवधीचे नुकसानही टळले आहे.

कमी खर्चाचा, कायमस्वरूपी टिकणारा प्रयोग

आंबोलीत अनेक प्रकल्प आम्ही करत होतो. पण पाणी नसल्याने हे. प्रकल्प काही दिवसातच बंद पडत होते. पाण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. पण हे सर्व प्रयोग तुटपुंजे ठरले. मात्र हा प्रयोग कमी खर्चाचा असून, कायमस्वरूपी टिकणारा आहे. - शहाजी नारनवर, उपवनसंरक्षक, सिंधुदुर्ग

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनforest departmentवनविभागWaterपाणी