शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

आंबोली वनविभागाची पाण्यासाठी सुरू असलेली वणवण अखेर संपली, उपवनसंरक्षकांनी लढवली शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 18:21 IST

आंबोलीत चेरापुंनंतरचा सर्वाधिक पाऊस पडत असतो. पण येथे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

अनंत जाधवसावंतवाडी : गेल्या अनेक वर्षांपासून वनविभागाला आंबोलीत पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. कोणताही प्रकल्प राबवला तरी तो पाण्याअभावी वाया जात होता. याची दखल घेत उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी गंभीर दखल घेत नैसर्गिक पाण्याचे स्रोतातून थेट पाइपलाइनने हे पाणी नाममात्र खर्चात वनविभागाच्या आवारात आणले. उपवनसंरक्षकांच्या या एका निर्णयाने वनविभाग पाण्यात स्वयंपूर्ण झाल्याचे दिसून आले आहे.

आंबोलीत चेरापुंनंतरचा सर्वाधिक पाऊस पडत असतो. पण येथे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेली अनेक वर्षे तर येथील वनविभाग पाण्यासाठी वणवण करत होता. येथे दरवर्षी कोट्यवधी रुपये हे वेगवेगळ्या विकासकामासाठी खर्च होत असतात; पण हे सर्व प्रकल्प पाण्याअभावी पडून राहात किंवा खर्च तरी वाया जातो.

येथील फुलपाखरू गार्डनवर तर दोन वेळा खर्च करण्यात आला. मात्र उन्हाळ्यात हे गार्डन करपून गेले, असे अनेक प्रकल्प आहेत. तत्कालीन अधिकाऱ्यांनी पाण्यासाठी केलेल्या उपाययोजना ही तुटपुंज्या ठरल्या. त्यामुळे आलेल्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाकडे लक्ष दिले; पण पाण्याकडे लक्षच दिले नाही.

मात्र सध्याचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर हे त्याला अपवाद ठरले असून, त्यानी आंबोलीतील निसर्गाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. तसेच कायमस्वरूपी पाण्यासाठी काय करता येईल याकडे लक्ष दिले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की आंबोलीत नैसर्गिक पाणी स्त्रोत भरपूर आहेत मग त्यातून पाणी आणले तर मोठा खर्चही येणार नाही.

म्हणून त्यांनी तेथील परिक्षित पॉइंट येथे पाण्याच्या असलेल्या झऱ्याला पाइपलाइन टाकून ते पाणी थेट आंबोली वनबागेत आणण्यात आले. तब्बल दीड किलोमीटरची पाइपलाइन आहे. या एका निर्णयामुळे आंबोलीतील वनविभागाची पाण्यासाठी होणारी वणवण कायमस्वरूपी सुटली आहे. वनविभाग पाणीप्रश्नात कायमस्वरूपी स्वयंपूर्ण बनला आहे. उपवनसंरक्षक नारनवर यांनी घेतलेला एक निर्णय फायदेशीर ठरलाच, शिवाय शासनाचे कोट्यवधीचे नुकसानही टळले आहे.

कमी खर्चाचा, कायमस्वरूपी टिकणारा प्रयोग

आंबोलीत अनेक प्रकल्प आम्ही करत होतो. पण पाणी नसल्याने हे. प्रकल्प काही दिवसातच बंद पडत होते. पाण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. पण हे सर्व प्रयोग तुटपुंजे ठरले. मात्र हा प्रयोग कमी खर्चाचा असून, कायमस्वरूपी टिकणारा आहे. - शहाजी नारनवर, उपवनसंरक्षक, सिंधुदुर्ग

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनforest departmentवनविभागWaterपाणी