शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली वनविभागाची पाण्यासाठी सुरू असलेली वणवण अखेर संपली, उपवनसंरक्षकांनी लढवली शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 18:21 IST

आंबोलीत चेरापुंनंतरचा सर्वाधिक पाऊस पडत असतो. पण येथे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

अनंत जाधवसावंतवाडी : गेल्या अनेक वर्षांपासून वनविभागाला आंबोलीत पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. कोणताही प्रकल्प राबवला तरी तो पाण्याअभावी वाया जात होता. याची दखल घेत उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी गंभीर दखल घेत नैसर्गिक पाण्याचे स्रोतातून थेट पाइपलाइनने हे पाणी नाममात्र खर्चात वनविभागाच्या आवारात आणले. उपवनसंरक्षकांच्या या एका निर्णयाने वनविभाग पाण्यात स्वयंपूर्ण झाल्याचे दिसून आले आहे.

आंबोलीत चेरापुंनंतरचा सर्वाधिक पाऊस पडत असतो. पण येथे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेली अनेक वर्षे तर येथील वनविभाग पाण्यासाठी वणवण करत होता. येथे दरवर्षी कोट्यवधी रुपये हे वेगवेगळ्या विकासकामासाठी खर्च होत असतात; पण हे सर्व प्रकल्प पाण्याअभावी पडून राहात किंवा खर्च तरी वाया जातो.

येथील फुलपाखरू गार्डनवर तर दोन वेळा खर्च करण्यात आला. मात्र उन्हाळ्यात हे गार्डन करपून गेले, असे अनेक प्रकल्प आहेत. तत्कालीन अधिकाऱ्यांनी पाण्यासाठी केलेल्या उपाययोजना ही तुटपुंज्या ठरल्या. त्यामुळे आलेल्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाकडे लक्ष दिले; पण पाण्याकडे लक्षच दिले नाही.

मात्र सध्याचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर हे त्याला अपवाद ठरले असून, त्यानी आंबोलीतील निसर्गाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. तसेच कायमस्वरूपी पाण्यासाठी काय करता येईल याकडे लक्ष दिले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की आंबोलीत नैसर्गिक पाणी स्त्रोत भरपूर आहेत मग त्यातून पाणी आणले तर मोठा खर्चही येणार नाही.

म्हणून त्यांनी तेथील परिक्षित पॉइंट येथे पाण्याच्या असलेल्या झऱ्याला पाइपलाइन टाकून ते पाणी थेट आंबोली वनबागेत आणण्यात आले. तब्बल दीड किलोमीटरची पाइपलाइन आहे. या एका निर्णयामुळे आंबोलीतील वनविभागाची पाण्यासाठी होणारी वणवण कायमस्वरूपी सुटली आहे. वनविभाग पाणीप्रश्नात कायमस्वरूपी स्वयंपूर्ण बनला आहे. उपवनसंरक्षक नारनवर यांनी घेतलेला एक निर्णय फायदेशीर ठरलाच, शिवाय शासनाचे कोट्यवधीचे नुकसानही टळले आहे.

कमी खर्चाचा, कायमस्वरूपी टिकणारा प्रयोग

आंबोलीत अनेक प्रकल्प आम्ही करत होतो. पण पाणी नसल्याने हे. प्रकल्प काही दिवसातच बंद पडत होते. पाण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. पण हे सर्व प्रयोग तुटपुंजे ठरले. मात्र हा प्रयोग कमी खर्चाचा असून, कायमस्वरूपी टिकणारा आहे. - शहाजी नारनवर, उपवनसंरक्षक, सिंधुदुर्ग

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनforest departmentवनविभागWaterपाणी