शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कणकवलीत 'त्या' इतिहासाची पुनरावृत्ती होणार, संदेश पारकर यांची नितेश राणेंवर टीका

By सुधीर राणे | Updated: October 10, 2023 15:37 IST

सत्ता आणि पैशाच्या गुर्मीतूनच देवगड येथे सरकारी रुग्णालयाच्या दुरवस्थेचा जाब विचारणाऱ्या शिवसैनिकांना मारहाणीचा प्रयत्न

कणकवली: सत्ता आणि पैशाच्या गुर्मीतूनच देवगड येथे सरकारी रुग्णालयाच्या दुरवस्थेचा जाब विचारणाऱ्या शिवसैनिकांना मारहाणीचा प्रयत्न झाला आहे. मात्र, कोकणात कुणाचाही माज जास्त काळ चालत नाही. हे राणे यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये अनुभवले आहे. २०२४ मध्ये कणकवलीत त्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार असून नितेश राणेंना आता जनताच धडा शिकवेल असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी लगावला. याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लोकशाहीत जनतेचे प्रश्न मांडणे हे प्रत्येक राजकीय पक्षाचे काम आहे. आमच्या शिवसैनिकांनी ते काम केले. नांदेडसारखी घटना  देवगड, कणकवली किंवा सिंधुदुर्गात घडू नये, अशी आमची भूमिका आहे. मात्र जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या शिवसैनिकांना नितेश राणे यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली. आमदार स्वतः आमच्या शिवसैनिकाला खेचून गाडीत घेऊन जात होते. त्यांच्या सुरक्षा रक्षकांची दांडगाई सुरु होती. तर पोलिस बघ्याची भूमिका घेत होते. सिंधुदुर्ग मागास होत असल्याचे हे निदर्शक आहे. पण, शिवसेना तसे कधीही घडू देणार नाही, हे लक्षात ठेवावे. यात पोलिसांनी जी भूमिका घेतली, ती संशयास्पद आहे. पोलिस निरीक्षकांसमोरच देवगड युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांच्या  अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आमदारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? याचा जाब आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षकांना विचारणार आहोत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःच्या खात्याच्या शिस्तीचा टेंभा मिरवीत असतात. मात्र  देवगडमध्ये त्यांच्या खात्याची अब्रू त्यांच्याच आमदाराने धुळीस मिळवली आहे. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तर असे शेकडो गणेश गावकर गावागावात तयार होतील आणि कामाचा जाब विचारतील, हे लक्षात ठेवावे.जनतेचे प्रश्न आमदारांसमोर मांडायचे नाहीत तर काय अमेरिकेच्या अध्यक्षासमोर मांडायचे का? हे राणे यांनी स्पष्ट करावे. जनतेचा आवाज उठवणाऱ्या शिवसैनिकांना झालेली मारहाण आम्ही कदापिही सहन करणार नाही. संपूर्ण  महाराष्ट्रातील शिवसेना आम्ही देवगडच्या शिवसैनिकांच्या पाठीशी उभी करू. देवगडला समंजस नेतृत्वाची परंपरा आहे. आप्पासाहेब गोगटे, अमृतराव राणे अशा सुसंस्कृत लोकांनी देवगडचे प्रतिनिधित्व केले आहे. आम्हाला त्या आमदारांचा अभिमान आहे. मात्र, नितेश राणे यांनी त्या गौरवशाली परंपरेला छेद दिला आहे. शांतताप्रिय देवगड तालुक्यातील जनतेने हे लक्षात घ्यावे. तसेच भाजपला आगामी निवडणुकीत धडा शिकवावा. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Kankavliकणकवली