शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Sindhudurg: ठाकरे गट शिवसेना, भाजप पदाधिकारी एकमेकांना भिडले; पावशी गावात तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 13:41 IST

वादंग चालू असताना आमदार वैभव नाईक यांनी नळपाणी योजनेचे भूमिपूजन केले

कुडाळ : पावशी गावात जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेच्या भूमिपूजनावेळी ठाकरे गट शिवसेना व भाजप पदाधिकारी एकमेकांना भिडले. यावेळी मोठ्या प्रमाणात शाब्दिक बाचाबाची झाली. दोन्हीही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.याबाबत सविस्तर वृत्त असे की, पावशी मिटक्याची वाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेतील कामांच्या भूमिपूजनासाठी आमदार वैभव नाईक आले होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, बाळा कोरगावकर, सरपंच वैशाली  पावसकर, उपसरपंच लक्ष्मीकांत तेली, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, युवा सेना उपतालुकाप्रमुख सागर भोगटे, कृष्णा तेली, संतोष अडूलकर, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.यावेळी उपस्थित असलेले भाजपाचे पदाधिकारी व पावशीचे माजी सरपंच श्रीपाद तवटे, रुणाल कुंभार, रमेश कुंभार, स्वरूप वाळके, राजन जाधव, ओंकार करगुटकर, हेमंत तवटे, समीर तेली, राजा चव्हाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी येथील काम बंद आदेश आहे. त्यामुळे भूमिपूजन करू नका, असे सांगितले, यानंतर ठाकरे गट व भाजप पदाधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. यानंतर काही वेळाने आमदार नाईक यांनी या कामाचे भूमिपूजन केले.यासंदर्भात भाजपचे पदाधिकारी व पावशीचे माजी सरपंच श्रीपाद तवटे यांनी सांगितले की, या ठिकाणी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेतून फक्त पाइपलाइन मंजूर आहे; परंतु येथील धनगर माळावरती असलेल्या मुख्य पाइपलाइनने पाणी या ठिकाणी पोहोचत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी वारंवार येथील नळ पाणी योजनेची पाइपलाइन घालू नये याकरिता ग्रामपंचायत तसेच लोकप्रतिनिधींकडे "काम बंद' करण्याची मागणी केली होती. ज्या विभागाकडून काम चालू आहे. त्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून काम बंद'चे आदेश तोंडी देण्यात आले होते.असे असतानाही आमदार वैभव नाईक हे या ठिकाणी काम सुरू करण्यासाठी उपस्थित होते. येथील कामाचे भूमिपूजन केल्यावर ते काम चालू होईल अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु या ठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांनी याला मोठ्या प्रमाणात विरोध केला. ग्रामस्थ व त्या ठिकाणी आलेले लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांमध्ये वादंग चालू असताना आमदारांनी पाठीमागे गुपचूप नारळ वाढवून, भूमिपूजन करून ते निघून गेले, अशी प्रतिक्रिया श्रीपाद तवटे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा