शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

Sindhudurg: ठाकरे गट शिवसेना, भाजप पदाधिकारी एकमेकांना भिडले; पावशी गावात तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 13:41 IST

वादंग चालू असताना आमदार वैभव नाईक यांनी नळपाणी योजनेचे भूमिपूजन केले

कुडाळ : पावशी गावात जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेच्या भूमिपूजनावेळी ठाकरे गट शिवसेना व भाजप पदाधिकारी एकमेकांना भिडले. यावेळी मोठ्या प्रमाणात शाब्दिक बाचाबाची झाली. दोन्हीही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.याबाबत सविस्तर वृत्त असे की, पावशी मिटक्याची वाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेतील कामांच्या भूमिपूजनासाठी आमदार वैभव नाईक आले होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, बाळा कोरगावकर, सरपंच वैशाली  पावसकर, उपसरपंच लक्ष्मीकांत तेली, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, युवा सेना उपतालुकाप्रमुख सागर भोगटे, कृष्णा तेली, संतोष अडूलकर, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.यावेळी उपस्थित असलेले भाजपाचे पदाधिकारी व पावशीचे माजी सरपंच श्रीपाद तवटे, रुणाल कुंभार, रमेश कुंभार, स्वरूप वाळके, राजन जाधव, ओंकार करगुटकर, हेमंत तवटे, समीर तेली, राजा चव्हाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी येथील काम बंद आदेश आहे. त्यामुळे भूमिपूजन करू नका, असे सांगितले, यानंतर ठाकरे गट व भाजप पदाधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. यानंतर काही वेळाने आमदार नाईक यांनी या कामाचे भूमिपूजन केले.यासंदर्भात भाजपचे पदाधिकारी व पावशीचे माजी सरपंच श्रीपाद तवटे यांनी सांगितले की, या ठिकाणी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेतून फक्त पाइपलाइन मंजूर आहे; परंतु येथील धनगर माळावरती असलेल्या मुख्य पाइपलाइनने पाणी या ठिकाणी पोहोचत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी वारंवार येथील नळ पाणी योजनेची पाइपलाइन घालू नये याकरिता ग्रामपंचायत तसेच लोकप्रतिनिधींकडे "काम बंद' करण्याची मागणी केली होती. ज्या विभागाकडून काम चालू आहे. त्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून काम बंद'चे आदेश तोंडी देण्यात आले होते.असे असतानाही आमदार वैभव नाईक हे या ठिकाणी काम सुरू करण्यासाठी उपस्थित होते. येथील कामाचे भूमिपूजन केल्यावर ते काम चालू होईल अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु या ठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांनी याला मोठ्या प्रमाणात विरोध केला. ग्रामस्थ व त्या ठिकाणी आलेले लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांमध्ये वादंग चालू असताना आमदारांनी पाठीमागे गुपचूप नारळ वाढवून, भूमिपूजन करून ते निघून गेले, अशी प्रतिक्रिया श्रीपाद तवटे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा