शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Sindhudurg: ठाकरे गट शिवसेना, भाजप पदाधिकारी एकमेकांना भिडले; पावशी गावात तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 13:41 IST

वादंग चालू असताना आमदार वैभव नाईक यांनी नळपाणी योजनेचे भूमिपूजन केले

कुडाळ : पावशी गावात जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेच्या भूमिपूजनावेळी ठाकरे गट शिवसेना व भाजप पदाधिकारी एकमेकांना भिडले. यावेळी मोठ्या प्रमाणात शाब्दिक बाचाबाची झाली. दोन्हीही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.याबाबत सविस्तर वृत्त असे की, पावशी मिटक्याची वाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेतील कामांच्या भूमिपूजनासाठी आमदार वैभव नाईक आले होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, बाळा कोरगावकर, सरपंच वैशाली  पावसकर, उपसरपंच लक्ष्मीकांत तेली, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, युवा सेना उपतालुकाप्रमुख सागर भोगटे, कृष्णा तेली, संतोष अडूलकर, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.यावेळी उपस्थित असलेले भाजपाचे पदाधिकारी व पावशीचे माजी सरपंच श्रीपाद तवटे, रुणाल कुंभार, रमेश कुंभार, स्वरूप वाळके, राजन जाधव, ओंकार करगुटकर, हेमंत तवटे, समीर तेली, राजा चव्हाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी येथील काम बंद आदेश आहे. त्यामुळे भूमिपूजन करू नका, असे सांगितले, यानंतर ठाकरे गट व भाजप पदाधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. यानंतर काही वेळाने आमदार नाईक यांनी या कामाचे भूमिपूजन केले.यासंदर्भात भाजपचे पदाधिकारी व पावशीचे माजी सरपंच श्रीपाद तवटे यांनी सांगितले की, या ठिकाणी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेतून फक्त पाइपलाइन मंजूर आहे; परंतु येथील धनगर माळावरती असलेल्या मुख्य पाइपलाइनने पाणी या ठिकाणी पोहोचत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी वारंवार येथील नळ पाणी योजनेची पाइपलाइन घालू नये याकरिता ग्रामपंचायत तसेच लोकप्रतिनिधींकडे "काम बंद' करण्याची मागणी केली होती. ज्या विभागाकडून काम चालू आहे. त्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून काम बंद'चे आदेश तोंडी देण्यात आले होते.असे असतानाही आमदार वैभव नाईक हे या ठिकाणी काम सुरू करण्यासाठी उपस्थित होते. येथील कामाचे भूमिपूजन केल्यावर ते काम चालू होईल अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु या ठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांनी याला मोठ्या प्रमाणात विरोध केला. ग्रामस्थ व त्या ठिकाणी आलेले लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांमध्ये वादंग चालू असताना आमदारांनी पाठीमागे गुपचूप नारळ वाढवून, भूमिपूजन करून ते निघून गेले, अशी प्रतिक्रिया श्रीपाद तवटे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा