शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

सिंधुदुर्गातील सेतू सुविधा केंद्रांचे टेंडर गुजराती कंपनीला, ठाकरे गटाचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 23:56 IST

Sindhudurg News: एकीकडे महाराष्ट्रातील उद्योग हे गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने होत असताता. दरम्यान, आता कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सेतू सुविधांचं काम गुजरातमधील कंपनीला देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

एकीकडे महाराष्ट्रातील उद्योग हे गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने होत असताता. दरम्यान, आता कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सेतू सुविधांचं काम गुजरातमधील कंपनीला देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाने गंभीर आरोप केले असून, कुडाळचे माजी आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार विनायक राऊत  यांनी महायुती सरकारचा निषेध केला आहे. 

याबाबत गंभीर आरोप करताना विनायक राऊत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हणाले की, राज्य सरकारच्या धोरणानुसार आपले सरकार सेवा केंद्र हे राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी निर्माण केलेला एक रोजगाराचा मार्ग होता. मात्र आता या भावनिक विषयाचे देखील बाजारीकरण करण्याचे धोरण राज्यातील भाजपप्रणित महायुती सरकार करत असल्याचे सिद्ध झाले आहे. गुजराती व्यापाऱ्यांसाठी महाराष्ट्रातील जमिनी एकीकडे खुलेआम मोकळ्या करणाऱ्या राज्यसरकारने आता आपले सरकार सेवा केंद्र देखील गुजराती व्यापायांच्या कंपनीला देऊ केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील आपले सरकार सेवा केंद्रे चक्क गुजराती कंपनी मे. गुजरात इन्फोटेक लि. अहमदाबाद यांच्या हवाली करण्यात आली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत या सिंधुदुर्ग जिल्हयातील भूमीपुत्रांचा न्याय हक्क हिरावून घेणाऱ्या स्वार्थी नितीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

तर वैभव नाईक यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त करताना सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्हयातील जिल्हाधिकारी कार्यालय, देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेगुर्ला, दोडामार्ग याठिकाणची एकूण ९ सेतू सुविधा केंद्रे चालविण्यासाठी मे. गुजरात इन्फोटेक लि. अहमदाबाद या गुजराती कंपनीला मंजूरी देण्यात आली आहे. दि. ०९/०१/२०२५ पासून या ९ सेतू सुविधा केंद्रांचे कामकाज सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कंपनीला वर्कऑर्डर दिली आहे. केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकार गुजरातच्या उद्योजकांच्या फायद्यासाठीच कार्यरत असून सिंधुदुर्गातील सेतू सुविधा केंद्रांचे टेंडर गुजराती कंपनीला देऊन महायुती सरकारने सिंधुदुर्गातील सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदार व कर्मचारी यांचा रोजगार हिरावला आहे. सेतू सुविधा केंद्रांसाठी लावण्यात आलेल्या निकषांमध्ये जिल्ह्यातील कंत्राटदार पात्र होणार नाहीत तसेच आपल्या मर्जीतील गुजराती कंपनीला टेंडर मिळेल अशाच पद्धतीने निकष लावण्यात आले आहेत. त्यामुळे महायुती सरकार हे अदानी,अंबानी यांच्या नंतर अजून एका गुजराती कंपनीला टेंडर मिळवून देऊन स्थानिकांवर अन्याय करत आहे. अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली.  

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार