शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तळवडे बाजारपेठ पाण्याखाली, लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 15:37 IST

सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यातील जोरदार पावसामुळे तळवडे येथील बाजारपेठ पुर्णतः पाण्याखाली गेली आहे.

ठळक मुद्देतळवडे बाजारपेठ पाण्याखाली, लाखोंचे नुकसान१५० दुकानांत पुराचे पाणी : सावंतवाडी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती सदस्यांकडून पाहणी

तळवडे : सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे तळवडे बाजारपेठ पूर्णत: पाण्याखाली गेली होती. यात व्यापाऱ्यांहचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तळवडे बाजारपेठेतील १५० दुकानांत पुराचे पाणी शिरून व्यापाऱ्यांच्या दुकानातील सामानाचे नुकसान झाले आहे.

तळवडे बाजारपेठेचे विस्तारीकरण झाल्याने पाण्याचा मार्ग काही ठिकाणी बंद झाला आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याने तळवडेत हाहाकार माजविला. शनिवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी तळवडे बाजारपेठ पूर्णत: पाण्याखाली गेली होती.

दुकानदारांच्या दुकानात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे व्यापाºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. एका बाजूने कोरोनाचे संकट असताना आता मुसळधार पडणाºया पावसाच्या कहराने सर्वसामान्य व्यापारी आर्थिक डबघाईला आले आहेत.

तळवडे येथील पूर परिस्थितीची पाहणी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर, तळवडे सरपंच संदीप आंगचेकर, ग्रामसेवक तृप्ती राणे, तलाठी श्रुती मसुकर यांनी केली. यावेळी सर्व महसूल अधिकारी उपस्थित होते.

तळवडे गावात जी पूरस्थिती निर्माण झाली आहे त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविणार असून नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई दिली जाईल, असे आश्वासन उपस्थित अधिकाºयांनी दिले.

महसूल यंत्रणा फक्त पंचनामे करते. मात्र, नुकसान भरपाई मिळण्यासाठी व्यापाºयांना अनेक दिवस वाट पहावी लागते. अखेर शेवटी त्रुटी काढून या नुकसानग्रस्त व्यापाºयांच्या पदरी निराशा येते, अशी खंत तळवडे बाजारपेठेतील व्यापाºयांनी यावेळी व्यक्त केली.

येथील व्यापारी सर्व कर भरूनही सरकारी यंत्रणा त्यांना नुकसान भरपाई देताना मुद्यावर बोट ठेवते. नुकसान भरपाई रकमेत कपात करते. त्यामुळे पुराचे पाणी शिरून नुकसान झालेल्या व्यापाºयांना आतातरी लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तळवडे बाजारपेठेतील व्यापाºयांनी केली आहे.अहवाल पाठविणार

तळवडे बाजारपेठेतील ज्या व्यापाºयांचे नुकसान झाले आहे त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविणार आहोत. तसेच सर्वसामान्य व्यापाºयांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी यावेळी दि

 

 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्गTahasildarतहसीलदार