शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

तळवडे बाजारपेठ पाण्याखाली, लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 15:37 IST

सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यातील जोरदार पावसामुळे तळवडे येथील बाजारपेठ पुर्णतः पाण्याखाली गेली आहे.

ठळक मुद्देतळवडे बाजारपेठ पाण्याखाली, लाखोंचे नुकसान१५० दुकानांत पुराचे पाणी : सावंतवाडी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती सदस्यांकडून पाहणी

तळवडे : सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे तळवडे बाजारपेठ पूर्णत: पाण्याखाली गेली होती. यात व्यापाऱ्यांहचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तळवडे बाजारपेठेतील १५० दुकानांत पुराचे पाणी शिरून व्यापाऱ्यांच्या दुकानातील सामानाचे नुकसान झाले आहे.

तळवडे बाजारपेठेचे विस्तारीकरण झाल्याने पाण्याचा मार्ग काही ठिकाणी बंद झाला आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याने तळवडेत हाहाकार माजविला. शनिवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी तळवडे बाजारपेठ पूर्णत: पाण्याखाली गेली होती.

दुकानदारांच्या दुकानात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे व्यापाºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. एका बाजूने कोरोनाचे संकट असताना आता मुसळधार पडणाºया पावसाच्या कहराने सर्वसामान्य व्यापारी आर्थिक डबघाईला आले आहेत.

तळवडे येथील पूर परिस्थितीची पाहणी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर, तळवडे सरपंच संदीप आंगचेकर, ग्रामसेवक तृप्ती राणे, तलाठी श्रुती मसुकर यांनी केली. यावेळी सर्व महसूल अधिकारी उपस्थित होते.

तळवडे गावात जी पूरस्थिती निर्माण झाली आहे त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविणार असून नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई दिली जाईल, असे आश्वासन उपस्थित अधिकाºयांनी दिले.

महसूल यंत्रणा फक्त पंचनामे करते. मात्र, नुकसान भरपाई मिळण्यासाठी व्यापाºयांना अनेक दिवस वाट पहावी लागते. अखेर शेवटी त्रुटी काढून या नुकसानग्रस्त व्यापाºयांच्या पदरी निराशा येते, अशी खंत तळवडे बाजारपेठेतील व्यापाºयांनी यावेळी व्यक्त केली.

येथील व्यापारी सर्व कर भरूनही सरकारी यंत्रणा त्यांना नुकसान भरपाई देताना मुद्यावर बोट ठेवते. नुकसान भरपाई रकमेत कपात करते. त्यामुळे पुराचे पाणी शिरून नुकसान झालेल्या व्यापाºयांना आतातरी लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तळवडे बाजारपेठेतील व्यापाºयांनी केली आहे.अहवाल पाठविणार

तळवडे बाजारपेठेतील ज्या व्यापाºयांचे नुकसान झाले आहे त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविणार आहोत. तसेच सर्वसामान्य व्यापाºयांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी यावेळी दि

 

 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्गTahasildarतहसीलदार