शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
2
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
3
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
4
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
5
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
6
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
7
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
8
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
9
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
10
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
11
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
12
आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!
13
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
14
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
15
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
16
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
17
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
18
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
19
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
20
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी खबरदारी घ्या, नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 16:54 IST

मुंबईत तुंबणाऱ्या पाण्याबाबत आमदार नितेश राणे यांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे.

कणकवली : यावर्षी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेच्या समस्येकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच मुंबईची तुंबई होणार नाही, यासाठी खबरदारी घ्या, अशी मागणी करणारे पत्र नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.मुंबईत तुंबणाऱ्या पाण्याबाबत आमदार नितेश राणे यांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे. पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते, अशी प्रसारमाध्यमात मुंबईची ओळख आहे. या तुंबलेल्या मुंबईत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. तरीही सत्ताधारी असलेली शिवसेना काहीही करू शकलेली नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.या पत्रात म्हटले आहे की, मुंबईत ३८६ तुंबणारी धोक्याची ठिकाणे आहेत, आणि यावर्षी २२ दिवस भरतीही आहे. त्यामुळे २५० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यास २६ जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल. अशी भीती सर्वत्र आहे, असे नितेश राणे यांनी या पत्रात म्हटले आहे.या परिस्थितीत पाण्याचा उपसा करण्यासाठी कोणत्या योजना केल्या आहेत का ? राज्य सरकार व महानगरपालिका प्रशासन यावर धोरणे आखणार आहे का ? संभाव्य परिस्थितीत करायच्या उपाययोजनांबद्दल जनजागृती केली आहे का ? असे प्रश्न नितेश राणे यांनी या पत्राद्वारे उपस्थित केले आहेत. तसेच पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहनही केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMumbaiमुंबईUddhav Thackerayउद्धव ठाकरेNitesh Raneनीतेश राणे