शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी खबरदारी घ्या, नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 16:54 IST

मुंबईत तुंबणाऱ्या पाण्याबाबत आमदार नितेश राणे यांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे.

कणकवली : यावर्षी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेच्या समस्येकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच मुंबईची तुंबई होणार नाही, यासाठी खबरदारी घ्या, अशी मागणी करणारे पत्र नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.मुंबईत तुंबणाऱ्या पाण्याबाबत आमदार नितेश राणे यांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे. पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते, अशी प्रसारमाध्यमात मुंबईची ओळख आहे. या तुंबलेल्या मुंबईत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. तरीही सत्ताधारी असलेली शिवसेना काहीही करू शकलेली नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.या पत्रात म्हटले आहे की, मुंबईत ३८६ तुंबणारी धोक्याची ठिकाणे आहेत, आणि यावर्षी २२ दिवस भरतीही आहे. त्यामुळे २५० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यास २६ जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल. अशी भीती सर्वत्र आहे, असे नितेश राणे यांनी या पत्रात म्हटले आहे.या परिस्थितीत पाण्याचा उपसा करण्यासाठी कोणत्या योजना केल्या आहेत का ? राज्य सरकार व महानगरपालिका प्रशासन यावर धोरणे आखणार आहे का ? संभाव्य परिस्थितीत करायच्या उपाययोजनांबद्दल जनजागृती केली आहे का ? असे प्रश्न नितेश राणे यांनी या पत्राद्वारे उपस्थित केले आहेत. तसेच पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहनही केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMumbaiमुंबईUddhav Thackerayउद्धव ठाकरेNitesh Raneनीतेश राणे