पर्यटकांच्या सुरक्षिततेवर उपाययोजना करा, अजिंक्य पाताडे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 05:04 PM2020-01-08T17:04:39+5:302020-01-08T17:08:55+5:30

पर्यटनामुळे मालवणचे नाव देशाच्या नकाशावर झळकत आहे. मात्र, अलीकडच्या काळात पर्यटन करताना होणाऱ्या दुर्घटनांमुळे पर्यटनाची मोठी हानी होत असून राज्यातून येणाºया पर्यटकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेवर प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी पंचायत समितीचे सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांनी बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांच्याकडे केली.

Take measures on the safety of tourists, demands Ajinkya Patade | पर्यटकांच्या सुरक्षिततेवर उपाययोजना करा, अजिंक्य पाताडे यांची मागणी

पर्यटक दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर यांनी बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांना निवेदन सादर केले.

Next
ठळक मुद्देपर्यटकांच्या सुरक्षिततेवर उपाययोजना करा, अजिंक्य पाताडे यांची मागणी वाढत्या दुर्घटनांनी पर्यटनाची हानी

मालवण : पर्यटनामुळे मालवणचे नाव देशाच्या नकाशावर झळकत आहे. मात्र, अलीकडच्या काळात पर्यटन करताना होणाऱ्या दुर्घटनांमुळे पर्यटनाची मोठी हानी होत असून राज्यातून येणाºया पर्यटकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेवर प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी पंचायत समितीचे सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांनी बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांच्याकडे केली.

मालवण, दांडी, देवबाग किनारी गेल्या महिनाभरात पाच दुर्घटना घडल्या. त्यात दोघा पर्यटकांना जीव गमवावा लागला. त्या पार्श्वभूमीवर बंदर विभाग व संबंधित प्रशासनाला जागे करण्यासाठी सभापती, उपसभापती यांनी बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली.

पर्यटकांच्या वाढत्या अपघातांमुळे पर्यटनावर संक्रात येऊ शकते. त्यामुळे पर्यटकांना दर्जेदार सोयी-सुविधा देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. पर्यटकांना मार्गदर्शक आणि धोक्याच्या सूचना देण्यासाठी तसेच आपत्कालीन स्थितीत त्यांचे प्राण वाचवण्यासाठी पर्यटकांची वर्दळ असलेल्या किनाऱ्यावर जीवरक्षकांची नेमणूक केली जावी.

पर्यटन क्षेत्रात होणारे अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असून पर्यटकांनाचा जीव गेल्यावर अ‍ॅक्शन घेण्यापेक्षा त्यांचे लाखमोलाचे जीव वाचविणे आपले कर्तव्य आहे, असे पाताडे व वराडकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्यावतीने मुंबईत दोन दिवसांत महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आल्याचे बंदर निरीक्षक ताम्हणकर यांनी सांगितले. वाढत्या दुर्घटनांमुळे मालवणच्या पर्यटनाबाबत चुकीचा संदेश राज्यभर पोहोचत असल्याने त्या बैठकीत आम्ही मांडलेल्या सूचना मांडण्यात याव्यात.

येथील पर्यटन बहरावे, अपघात होऊ नयेत, पर्यटकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यात याव्यात, अशी आमची भूमिका असल्याचे परुळेकर यांनी सांगितले.

 

Web Title: Take measures on the safety of tourists, demands Ajinkya Patade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.