शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 10:59 IST

उन्हाळी सुट्टीत होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर १९ एप्रिल ते ११ मे या कालावधीत आणखी दोन उन्हाळी विशेष गाड्या धावणार आहेत. या मार्गावर पर्यटक तसेच प्रवाशांची गर्दी वाढत चालल्याने रेल्वेने मुंबई - सीएटी मार्गावर या दोन गाड्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देकोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी गाड्यारेल्वे प्रशासनाकडून जाहीर

कणकवली : उन्हाळी सुट्टीत होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर १९ एप्रिल ते ११ मे या कालावधीत आणखी दोन उन्हाळी विशेष गाड्या धावणार आहेत. या मार्गावर पर्यटक तसेच प्रवाशांची गर्दी वाढत चालल्याने रेल्वेने मुंबई - सीएटी मार्गावर या दोन गाड्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.रेल्वे प्रशासनाकडून नव्याने जाहीर करण्यात आलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांपैकी मुंबई सीएसटी-करमाळी (०१००३/०१००४) ही गाडी १९ एप्रिल ते १० मे या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. सीएसटीहून ही गाडी रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी सुटेल. आणि गोव्यात करमाळी स्थानकावर ती दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २१ एप्रिल ते १२ मे २०१९ या कालावधीत दर रविवारी करमाळी-मुंबई मार्गावर धावेल.

करमाळीहून ही गाडी दुपारी १२.५० वाजता सुटेल . दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२० वाजता मुंबईत सीएसटी स्थानकावर पोहोचेल. दुसरी विशेष गाडी (०१००६/०१००५) ही देखील करमाळी ते सीएसटी मार्गावर धावणार आहे. २० एप्रिल ते ११ मे २०१९ या कालावधीत ही गाडी दर शनिवारी करमाळीहून दुपारी १२.५० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री ११ वाजता ५५ मिनिटांनी मुंबईत सीएसटीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २१ एप्रिल ते १२ मे २०१९ या कालावधीत दर रविवारी धावणार आहे. ही गाडी सीएसटीहून रात्री १२.४५ वाजता सुटून त्याच दिवशी ती दुपारी १२.२० वाजता करमाळीला पोहोचेल.या दोन्ही अतिरिक्त गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थीवी स्थानकांवर थांबणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर नव्याने जाहीर करण्यात आलेल्या या दोन गाड्यांच्या १६ फेऱ्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावर जून महिन्यापर्यंत धावणाºया स्पेशल गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या आता तब्बल १८० वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरी