शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
3
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
4
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
5
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
6
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
7
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
8
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
9
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
10
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
11
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
12
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
13
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
14
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
15
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
16
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
17
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
18
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
19
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

... तर घाबरण्याचं कारण नाही, काँग्रेसच्या काळातच चौकशी संस्थांचा गैरवापर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 17:57 IST

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सोमवारी कोल्हापूरहून आंबोलीमार्गे गोव्याला खाजगी दैऱ्यानिमित्त जात असताना काही काळ सावंतवाडी येथे थांबले होते.

ठळक मुद्देविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सोमवारी कोल्हापूरहून आंबोलीमार्गे गोव्याला खाजगी दैऱ्यानिमित्त जात असताना काही काळ सावंतवाडी येथे थांबले होते.

सावंतवाडी :  ज्याच्या बद्दल तक्रारी असतील पुरावे असतील त्यांची चौकशी होते. मात्र, आपण काही केले नाही तर घाबरण्याचे कारण काय? कोणतीही एजन्सी कोणावर थेट कारवाई करू शकत नाही. भाजपने कोणत्याही चौकशी संस्थेचा गैरवापर केला नाही. काँग्रेसच्या काळातच तो अधिकचा झाला आहे, अशी टिका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली ते सावंतवाडी येथे बोलत होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सोमवारी कोल्हापूरहून आंबोलीमार्गे गोव्याला खाजगी दैऱ्यानिमित्त जात असताना काही काळ सावंतवाडी येथे थांबले होते. त्यावेळी त्यांचे भाजपच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार रविंद्र चव्हाण,नितेश राणे,जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब,अतुल काळसेकर,मनोज नाईक,उपसभापती शितल राउळ,परिमल नाईक,प्रभाकर सावंत,आनंद नेवगी,सुधीर आडिवरेकर,अमित परब, आनंद सावंत, राजू राउळ ,दिलीप भालेकर, मोहिनी मडगावकर,समृध्दी विनोडकर, उत्कर्षा सासोलकर ,दिप्ती माटेकर आदि उपस्थीत होते.

फडणवीस म्हणाले, बांधकाम क्षेत्राबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे. यातील घोटाळे मी स्वता उघडकीस आणले आहेत. त्याची चौकशी करा अन्यथा मला उच्च न्यायालयात जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच कोकणातील शेतकऱ्यांना सरकारने कोणतीही मदत केली नाही. मी अनेकांशी बोललो आहे, त्यांनीही अशी कोणतीही मदत आली नसल्याचे सांगितले. काँग्रेसने ईडीचे व भाजप कार्यालये एकत्र केली पाहिजेत, अशी टिका केली होती. त्यावर फडणवीस यांनी खुलासा केला. काँग्रेसच्या काळात सर्वात जास्त चौकशी एजन्सीचा गैरवापर झाला होता. त्यामुळे ते आता भाजपवर आरोप करत आहेत. मात्र ज्याची चौकशी होणार आहेत, त्याबाबतचे पुरावे असतील, तक्रारी असतील तर चौकशी होते. जर आपण काहीच केले नाही तर घाबरण्याचे कारण काय?असा सवाल फडणवीस यांनी केला. तसेच दोषी नसतील तर कोणतीही एजन्सी कोणावर थेट कारवाई करू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSawantwadiसावंतवाडीSanjay Rautसंजय राऊतEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय