शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

सिंधुदुर्ग : पाणीटंचाई आराखडे कागदावर नको : नीतेश राणे, प्रशासनाला सुनावले खडे बोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 18:16 IST

सत्ताधाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे टँकर लावण्याची वेळ येईल़ त्यामुळे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय ठेवून पाणी टंचाईची कामे पुर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना आमदार नीतेश राणे यांनी दिल्या़

ठळक मुद्दे पाणीटंचाई आराखडे कागदावर नको : नीतेश राणेप्रशासनाला आमदारांनी सुनावले खडे बोल

सिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी हा टँकरमुक्त जिल्हा केला आहे़ पुन्हा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे टँकर लावण्याची वेळ येईल़ त्यामुळे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय ठेवून पाणी टंचाईची कामे पुर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना आमदार नीतेश राणे यांनी दिल्या.

पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीमध्ये नियोजनाचा अभाव दिसून येत आहे़ दरवर्षी पाणी टंचाईचे आराखडे केवळ कागदावरच बनविले जातात़ पाणी टंचाईची कामे कार्यारंभ आदेश देऊन कामे सुरू होईपर्यंत पाऊस सुरू होतो़ अनेक कामे उशिरा झाल्यामुळे टंचाईच्या कालावधीत सर्वसामान्यांना त्याचा लाभ होत नाही़, अशा शब्दात नीतेश राणे यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. कणकवली तालुका पंचायत समिती पाणी टंचाई आढावा बैठक एचपीसीएल सभागृहात नीतेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडली.

 या बैठकीला सभापती सुजाता हळदिवे राणे, उपसभापती सुचिता दळवी, जिल्हा परिषद सदस्या संजना सावंत, स्वरूपा विखाळे, श्रेया सावंत, सायली सावंत, डिचवलकर, बाळा जठार, तहसिलदार संजय पावसकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले, सहाय्यक गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता गुरसाळे आदींसह पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते़. पाणी टंचाई आढावा बैठकी प्रारंभी गतवेळच्या कामांचा आढावा घेण्यात आला़ बिडवाडी, बोर्डवे या गावांसह अन्य गावांमधील बक्षीसपत्राअभावी पाणी टंचाईतील कामे झाली नाहीत़ त्याबाबत आमदारांनी गावचे सरपंच, ग्रामसेवक यांच्याशी चर्चा केली़ जमिनदारांनी बक्षिसपत्र देण्यास टाळाटाळ केल्यास समोर आले़ यावेळी ओटव सरपंच हेमंत परुळेकर यांनी ग्रामपंचायतीला आवश्यक असलेल्या पाणी टंचाईतील जमिनींसाठी ग्रामपंचायतच्या ठरावावर जमीन मिळाली पाहिजे, असा ठराव घ्या, अशी मागणी केली़ त्यावर राणे यांनी ठरावास मान्यता दिली़.सन २०१८-१९ कणकवली तालुका पाणी टंचाई आराखड्यात १७७ कामे सुचविण्यात आली आहेत़ त्याचा अंदाजीत आराखडा १ कोटी १६ लाख ३७ हजार रूपयांचा करण्यात आला आहे़ अन्य कामे येत्या दोन दिवसात संबंधित ग्रामपंचायतमधून पंचायत समितीला सादर करण्यात यावीत़ प्रपत्र अ व ग्रामपंचायत ठराव मागणी करण्यात यावी, अशी माहिती उपअभियंता गुरसाळे यांनी दिली़.

त्यावर आमदारांनी तुमच्या सोईनुसार आराखडा करू नका़ टंचाईतील कामे फेब्रुवारी, मार्चपर्यंत सुरू होण्याच्यादृष्टीने आत्तापासूनच कामाला लागा़ पाणी टंचाईची पुन्हा २६ व २७ जानेवारीला आढावा बैठक घ्या, अशा सूचना केल्या़.

या बैठकीत जुन्या व नवीन कामांबाबत तालुक्यातील सरपंचांनी आपल्या भूमिका मांडल्या़ तसेच तक्रारीही करण्यात आल्या़ महसूल विभागाकडून आलेल्या तक्रारींबाबत तहसिलदारांना चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना आमदारांनी केल्या़सत्ताधाऱ्यांच्या विकासाची नेमकी व्याख्या कोणतीपाण्यासारख्या महत्वाच्या विषयाच्या बैठकीला काही सरपंच अनुपस्थितीत राहतात, ही निराशाजनक बाब आहे़ प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे़ गेल्या तीन वर्षात पाणी टंचाईतील कामांसाठी पैसे आले नाहीत, ही बाब सरकार दरबारी पोहोचण्यासाठी सर्वांनीच आवाज उठवला पाहिजे़.

जिल्ह्याचे पालकमंत्री केवळ विकासाच्या वल्गना करतात़ प्रत्यक्षात मात्र निधी मिळत नाही़ त्यामुळे विकासाची नेमकी व्याख्या कोणती? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे, असे नीतेश राणे यांनी सांगितले़ 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग