शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

सिंधुदुर्ग :  वैभववाडीतील चक्रीवादळ : महावितरणला सर्वाधिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 3:11 PM

चक्रीवादळासह मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा ५० लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. महसूल विभागाकडे प्राप्त झालेल्या पंचनाम्यानुसार घरे व गोठ्यांंचे सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे. तर अनेक गावातील इमारतींच्या नुकसानीचे पंचनामे शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत झाले नव्हते.

ठळक मुद्देवैभववाडीतील चक्रीवादळ : महावितरणला सर्वाधिक फटकाखांबाळेत ३५0 काजू झाडे उद्ध्वस्त, नुकसान ५0 लाखांच्या घरात

वैभववाडी : चक्रीवादळासह मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा ५० लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. महसूल विभागाकडे प्राप्त झालेल्या पंचनाम्यानुसार घरे व गोठ्यांंचे सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे. तर अनेक गावातील इमारतींच्या नुकसानीचे पंचनामे शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत झाले नव्हते.

चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला. तालुक्यातील ३७ खांब मोडून पडल्याने १५ लाखांचे नुकसान झाले आहे. तर खांबाळेतील रमेश अनाजी परब यांची ३५० काजूंची बाग उद्ध्वस्त झाली. वादळी पावसाने गुरुवारी खंडित झालेला वैभववाडी शहरातील वीजपुरवठा शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरळीत झाला नव्हता. त्याचा फटका विविध आस्थापनांसह शासकीय कार्यालयांना बसला.वैभववाडी तालुक्यातील अनेक गावात गुरुवारी सायंकाळी वादळी पावसाने दाणादाण उडवून दिली. त्याचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला. तालुक्याच्या विविध भागातील ३७ खांब मोडून पडले. तर १५० गाळ्यातील वीजवाहिन्या तुटल्याने सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले.

त्यामुळे संपूर्ण तालुक्यात गुरुवारी रात्री अंधाराचे साम्राज्य होते. खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि खासगी कंत्राटदारांचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरु होते. मात्र, शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.वैभववाडी शहरातील इमारतींच्या छप्परांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, त्यापैकी बहुतांश नोंद महसूलकडे झालेली नाही. शुक्रवारी सायंकाळपर्यंत महसूलकडे प्राप्त माहितीनुसार नावळे गावातील नुकसानग्रस्त मालमत्तांची संख्या जास्त आहे.

नावळेमधील भैरु गुरखे (९००), सावित्री सावंत (१५२५०), दिगंबर गुरव (२५००), मारुती शेळके (४२०५), लक्ष्मण शेळके (२४३५) ग्रामपंचायत कार्यालय व धनगरवाडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेलाही देखील या वादळाचा तडाखा बसला.सडुरे येथील भगवान बोडेकर (१०००), रवींद्र पवार (१२००), दिलीप राणे (१२००), काशीनाथ राणे (१२००), आचिर्णे येथील सावित्री झोरे(१००००), सुहास दर्डे(५००००), खांबाळेतील शिवाजी कोर्लेकर (४००००), महेंद्र बोडेकर (२००००), प्रकाश दळवी (७०००), वाभवेतील सुहास राणे (९००००), अंकुश परब (१२०००), नारकरवाडीतील दाजी बर्गे (५३७५), खांबलवाडीतील यशवंत तानवडे (२५००), मौदेतील अनंत कांबळे (३०००), सोनाळीतील अंबिका पाडावे (१२०००), पुष्पलता पाडावे (४०००), श्रीकांत पाडावे (१४०००), सदाशिव पाडावे (१३०००) यांचे घर व गोठा यांचे नुकसान झाले.

खांबाळे येथील रमेश अनाजी परब यांच्या बागेतील सुमारे ३५० काजू उन्मळून पडल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. मांगवली लोकमवाडी येथील अनंत सुतार यांच्या घराचे संपूर्ण छप्पर वादळात उडाले. त्यामुळे छप्पराखाली सापडून दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले.

करुळ गावातील काही इमारतींचे नुकसान झाले आहे. मात्र, उशिरापर्यंत महसूलकडे आकडेवारी उपलब्ध नव्हती. त्यामुळे नुकसानीचा आकडा ५० लाखांच्यावर जाण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पाऊस व वादळाने तालुक्यात मोठी नुकसानी झाली आहे. त्यामुळे शेतकरी, बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.अधिकाऱ्यांची भेटनावळे येथे भेट देऊन चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची उपविभागीय अधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नायब तहसीलदार जी.आर. गावीत होते. तसेच महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एस. बी. लोथे यांनी तुटलेले खांब आणि वीजवाहिन्यांची पाहणी करुन वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर यंत्रणा कार्यान्वित केली होती. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस