शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानची २६ पासून विश्वास यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 11:52 IST

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत विश्वास यात्रा २०१८ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देनारायण राणेंच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानची २६ पासून विश्वास यात्राशेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास सरकार अपयशी : दत्ता सामंत 

सिंधुदुर्गनगरी : महागाई वाढ, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे. सत्तेमध्ये असलेल्या पालकमंत्री, खासदार आमदार यांचा प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावरचा जनतेचा विश्वास उडाला आहे.

जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी, जनतेला आधार देण्यासाठी तसेच विद्यमान सत्ताधाऱ्यांनी जिल्ह्याचा भकास कसा केला आहे हे पटवून देण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत विश्वास यात्रा २०१८ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.सामंत म्हणाले की, गेली चार वर्षे राज्यात युती शासनाची सत्ता आहे. मात्र या कालावधीत महागाई वाढत आहे. शेतकºयांच्या समस्या जैसे थे आहेत. गॅसचे भाव वाढत आहेत. विज बिलांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. आणि या समस्या सोडविण्यास महाराष्ट्र सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे असा आरोपही दत्ता सामंत यांनी केला आहे.त्याशिवाय सत्ताधाऱ्यांमध्ये असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांचा जिल्ह्याच्या प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही. या सत्ताधाऱ्यांवर जनतेने टाकलेला विश्वास ते सार्थकी लावू शकलेले नाहीत.

त्यामुळे त्यांच्यावरील जनतेचा विश्वास उडालेला आहे. त्यामुळे जनतेला आधार देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये आपल्या पक्षाचा विश्वास निर्माण करण्यासाठी तसेच सत्ताधाऱ्यांनी जिल्ह्याचा केलेला भकास जनतेला दाखविण्यासाठी स्वाभिमान पक्षाच्यावतीने पक्षाचे संस्थापक खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात विश्वास यात्रा २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे.आगामी निवडणूकीत स्वाभिमानचीच लाट : दत्ता सामंतसत्तेत असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार व आमदार यांनी जनतेचा विश्वास घात केला आहे. त्यामुळे पक्षाच्या विश्वास यात्रेद्वारे जनतेमध्ये स्वाभिमान पक्षाचा विश्वास निर्माण केला जाणार आहे. आगामी निवडणुकीत स्वाभिमान पक्षाची लाट असणार असून जिल्ह्यातील तिन्ही आमदार व खासदार हा स्वाभिमान पक्षाच असणार असल्याचा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग