शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

धुक्यात हरवला सिंधुदुर्ग; आंबा, काजू फळांना बसणार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 11:01 IST

सिंधुदुर्ग : गेले आठवडाभर कडाक्याची थंडी अनुभवणाऱ्या सिंधुदुर्गकरांची आज, शनिवारची पहाट दाट धुक्याची दुलई घेऊनच उगवली. सलग दुसऱ्या दिवशी ...

सिंधुदुर्ग : गेले आठवडाभर कडाक्याची थंडी अनुभवणाऱ्या सिंधुदुर्गकरांची आज, शनिवारची पहाट दाट धुक्याची दुलई घेऊनच उगवली. सलग दुसऱ्या दिवशी पडलेल्या या धुक्यात रिमझिम पडणाऱ्या पावसासारखे दव अंगावर झेलतच अनेकांनी धुक्यातून भटकंतीचा अनुभव घेतला. या दाट धुक्यामुळे वीस फुटाच्या अंतरावरील स्पष्ट दिसत नव्हते. सकाळी नऊनंतर सूर्यदर्शन होत नव्हते. तोपर्यंत अवघी सृष्टी दवांनी चिंब झाली होती. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासूनच धुक्याचे आगमन होते. पण यावर्षी पावसाळाच लांबल्याने किरकोळ दिवसाचा अपवाद वगळता दाट असे धुके पडलेच नव्हते.

शुक्रवारी मात्र अचानक धुक्याने एंट्री केली. शनिवारी यापेक्षा दाट धुके पडले. सलग दुसऱ्या दिवशी धुक्याचा आनंद घेण्यासाठी हौशी नागरिकांनी पाणवठे गाठले. सावंतवाडी शहरातील मोती तलावकाठी धुक्याचे विलोभनीय दर्शन होत होते. आंबा मोहोर गळणार- या धुक्याने आंबा, काजू पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मागील आठवडाभर पडत असलेल्या थंडीमुळे आंबा, काजू पिकाला पोषक वातावरण होते. उरलेला सुरलेला आंबा मोहोरायला सुरूवात झाली होती. मात्र, आता गेले दोन दिवस पडत असलेल्या धुक्यामुळे आंबा, काजू मोहोर धुक्याने जळून जाणार आहे.- यासाठी काही खबरदारी घेण्याचे आवाहन मुळदे कृषी संशोधन केंद्रातर्फे करण्यात आले आहे. त्यानुसार बागेत रात्रीच धुर करावा. जेणेकरून उष्णता राहून मोहरगळ कमी होईल.

वाहने लाईट लावूनच- दाट धुके असल्याने वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत होती.- नदीजवळ, ओहोळ, तलावाजवळ तर धुके इतके होते की पाच फुटांवरचेही स्पष्ट दिसत नव्हते. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गweatherहवामान