शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

सिंधुदुर्ग : तेंडोलीत आंबा, काजू कलम बागेला आग, ३0 एकर क्षेत्र खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 7:02 PM

कुडाळ तालुक्यातील तालुक्यातील तेंडोली येथील सुमारे ३० एकर जमीन क्षेत्रातील काजू, आंबा कलम बागेला आग लागून अठराशे काजू आणि आंबा कलमांसह बाराशे मीटरची पाईप लाईन खाक झाली. यात पाच ते सहा बागायतदारांचे सुमारे २५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे तेंडोलीत आंबा, काजू कलम बागेला आग, ३0 एकर क्षेत्र खाक  बाराशे मिटरची पाईप लाईनही जळाली, २५ लाखांचे नुकसान

कुडाळ : तालुक्यातील तालुक्यातील तेंडोली येथील सुमारे ३० एकर जमीन क्षेत्रातील काजू, आंबा कलम बागेला आग लागून अठराशे काजू आणि आंबा कलमांसह बाराशे मीटरची पाईप लाईन खाक झाली. यात पाच ते सहा बागायतदारांचे सुमारे २५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.सध्या वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे जिल्ह्यातील सुकलेल्या गवताला आग लागून आंबा-काजू बागायती भस्मसात होण्याचे प्रकार वाढले आहेत. यात बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

तेंडोली-कुंभारवाडी येथील सुमारे ३० एकर जमीन क्षेत्रातील बागायतीला बुधवारी दुपारी आग लागली. येथील बागायतदार सायमंड डिसोजा, प्रकाश राऊळ, किशोर मुणनकर, यशवंत तेंडोलकर, यशवंत परब तसेच यांची सुमारे ८०० आंबा कलमे, १००० काजू कलमे तसेच १२०० मीटर पाईप लाईन  खाक झाली.आग लागल्याचे तेथील ग्रामस्थ व जवळच्या बागेत काम करणाऱ्या कामगारांच्या लक्षात येताच या सर्वांनी तत्काळ घटनास्थळी जात आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र रणरणते ऊन आणि वाऱ्यामुळे आग पसरत जाऊन काही वेळातच सुमारे ३० एकर परिसरात पसरली.

तेंडोलीच्या तलाठ्यांनी नुकसानीचा पंचनामा केला. लोकप्रतिनिधींनी भेट देत पाहणी केली. दरम्यान, आंबा आणि काजू कलमांवरील फळे काढणीयोग्य झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होणार होता. मात्र सर्व कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने बागायतदारांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआग