शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग एस टी विभाग सज्ज, परतीच्या प्रवासासाठी जादा सात गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 16:24 IST

गणेशोत्सवासाठी मुंबई तसेच इतर भागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भविकांच्या सेवेसाठी एस.टी. सज्ज झाली आहे. जिल्हा अंतर्गत वाहतुकीबरोबरच परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्ग विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग एस टी विभाग सज्ज, परतीसाठी जादा सात गाड्याऑनलाईन बुकिंग सुरु : प्रकाश रसाळ यांची माहिती 

कणकवली : गणेशोत्सवासाठी मुंबई तसेच इतर भागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भविकांच्या सेवेसाठी एस.टी. सज्ज झाली आहे. जिल्हा अंतर्गत वाहतुकीबरोबरच परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्ग विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. मुंबईतील विविध भागात जाण्यासाठी सात जादा गाड़यांची सोय करण्यात आली असून त्यांचे ऑनलाईन बुकिंग सूरू झाले आहे.अशी माहिती एस.टी.चे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली.येथील विभागीय कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी अभिजीत पाटील तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकाश रसाळ म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी अनेक भाविक मुंबई, पुणे आदी भागातून येत असतात.

परतीचा प्रवास करताना त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून एस टी प्रशासनाने नियोजन केले आहे. 18 ते 23 ऑगस्ट या कालावधीत मुंबईच्या विविध भागात सिंधुदूर्गातील विविध आगारातून सात जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये विजयदुर्ग - बोरीवली सायंकाळी 4 वाजता, सावंतवाड़ी -बोरीवली दुपारी 3.30 वाजता, कणकवली - बोरीवली सायंकाळी 5 वाजता, कणकवली - मुंबई सायंकाळी 4 वाजता, फोंडा- बोरीवली सायंकाळी 5 वाजता, देवगड - बोरीवली दुपारी 3.30 वाजता व सायंकाळी 4.45 वाजता . या गाड्यांचा समावेश आहे.या जादा गाडयांचे आरक्षण सुरु झाले असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या गाडयांचे आरक्षण फुल्ल झाल्यानंत्तर आणखीन जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसे नियोजन करण्यात आले आहे.गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांमुळे एस.टी.च्या जिल्हाअंतर्गत सेवा देणाऱ्या गाडयाना गर्दी असते. ही बाब लक्षात घेऊन चांगले भारमान असलेल्या मार्गावर जादा गाड्या सोडण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. भविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न असल्याचेही प्रकाश रसाळ यांनी यावेळी सांगितले.ते पुढे म्हणाले, ठाणे येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी आतापर्यन्त 61 गाडयांचे बुकिंग झाले असून या गाड़यांची संख्या आणखिन वाढणार आहे. मुंबईच्या इतर भागातूनहि गाडयांचे आरक्षण झाले आहे.त्यांचा नेमका आकड़ा येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.असेही ते यावेळी म्हणाले.प्रवाशांच्या मागणीनुसार गाड़यांची सोय !परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार गाड़यांची सोय करण्यात येणार आहे. प्रवाशानी मागणी केल्यास त्यांच्या विशिष्ट गावातून अथवा वाडीतून ग्रुप बुकिंग द्वारे गाडी उपलब्ध करून दिली जाईल. असेही प्रकाश रसाळ यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवstate transportराज्य परीवहन महामंडळ