शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
4
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
5
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
6
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
7
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
8
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
9
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
10
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
11
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
12
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
13
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
14
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
15
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
16
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
17
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
18
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
19
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
20
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग एस टी विभाग सज्ज, परतीच्या प्रवासासाठी जादा सात गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 16:24 IST

गणेशोत्सवासाठी मुंबई तसेच इतर भागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भविकांच्या सेवेसाठी एस.टी. सज्ज झाली आहे. जिल्हा अंतर्गत वाहतुकीबरोबरच परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्ग विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग एस टी विभाग सज्ज, परतीसाठी जादा सात गाड्याऑनलाईन बुकिंग सुरु : प्रकाश रसाळ यांची माहिती 

कणकवली : गणेशोत्सवासाठी मुंबई तसेच इतर भागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भविकांच्या सेवेसाठी एस.टी. सज्ज झाली आहे. जिल्हा अंतर्गत वाहतुकीबरोबरच परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्ग विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. मुंबईतील विविध भागात जाण्यासाठी सात जादा गाड़यांची सोय करण्यात आली असून त्यांचे ऑनलाईन बुकिंग सूरू झाले आहे.अशी माहिती एस.टी.चे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली.येथील विभागीय कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी अभिजीत पाटील तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकाश रसाळ म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी अनेक भाविक मुंबई, पुणे आदी भागातून येत असतात.

परतीचा प्रवास करताना त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून एस टी प्रशासनाने नियोजन केले आहे. 18 ते 23 ऑगस्ट या कालावधीत मुंबईच्या विविध भागात सिंधुदूर्गातील विविध आगारातून सात जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये विजयदुर्ग - बोरीवली सायंकाळी 4 वाजता, सावंतवाड़ी -बोरीवली दुपारी 3.30 वाजता, कणकवली - बोरीवली सायंकाळी 5 वाजता, कणकवली - मुंबई सायंकाळी 4 वाजता, फोंडा- बोरीवली सायंकाळी 5 वाजता, देवगड - बोरीवली दुपारी 3.30 वाजता व सायंकाळी 4.45 वाजता . या गाड्यांचा समावेश आहे.या जादा गाडयांचे आरक्षण सुरु झाले असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या गाडयांचे आरक्षण फुल्ल झाल्यानंत्तर आणखीन जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसे नियोजन करण्यात आले आहे.गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांमुळे एस.टी.च्या जिल्हाअंतर्गत सेवा देणाऱ्या गाडयाना गर्दी असते. ही बाब लक्षात घेऊन चांगले भारमान असलेल्या मार्गावर जादा गाड्या सोडण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. भविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न असल्याचेही प्रकाश रसाळ यांनी यावेळी सांगितले.ते पुढे म्हणाले, ठाणे येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी आतापर्यन्त 61 गाडयांचे बुकिंग झाले असून या गाड़यांची संख्या आणखिन वाढणार आहे. मुंबईच्या इतर भागातूनहि गाडयांचे आरक्षण झाले आहे.त्यांचा नेमका आकड़ा येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.असेही ते यावेळी म्हणाले.प्रवाशांच्या मागणीनुसार गाड़यांची सोय !परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार गाड़यांची सोय करण्यात येणार आहे. प्रवाशानी मागणी केल्यास त्यांच्या विशिष्ट गावातून अथवा वाडीतून ग्रुप बुकिंग द्वारे गाडी उपलब्ध करून दिली जाईल. असेही प्रकाश रसाळ यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवstate transportराज्य परीवहन महामंडळ