शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

सिंधुदुर्ग : गृहराज्यमंत्र्यांचा निषेध, मराठा आंदोलनावेळी खोटे गुन्हे : मालवण पंचायत समिती मासिक सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 16:36 IST

मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत स्वाभिमानच्या दहा तर शिवसेनेच्या एका सदस्याने गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांचा निषेधाचा ठराव मांडला.

ठळक मुद्देगृहराज्यमंत्र्यांचा निषेध, मराठा आंदोलनावेळी खोटे गुन्हे मालवण पंचायत समिती मासिक सभेत निषेधाचा ठराव

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. मात्र पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याने मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत स्वाभिमानच्या दहा तर शिवसेनेच्या एका सदस्याने गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांचा निषेधाचा ठराव घेतला. हा निषेधाचा ठराव सुनील घाडीगावकर यांनी मांडला.दरम्यान, मालवणात वीज वितरण, दूरसंचार, सार्वजनिक बांधकाम या तीन प्रमुख विभागांचा कारभार मनमानीपणाचा होत आहे. याठिकाणी कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना मराठीही नीट येत नाही. त्यामुळे अनेक महिने तक्रारी प्रलंबित राहिलेल्या आहेत. याला सर्वस्वी पालकमंत्री, खासदार, आमदार हे जबाबदार आहेत, असे सांगत लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेच्या निषेधाचाही ठराव घेण्यात आला.मालवण पंचायत समितीची मासिक सभा सभापती मनिषा वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीराजे सभागृहात झाली. यावेळी उपसभापती अशोक बागवे, गटविकास अधिकारी राजेंद्र्र कांबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय गोसावी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.यावेळी पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, विनोद आळवे, सागरिका लाड, सोनाली कोदे, राजू परूळेकर, गायत्री ठाकूर आदी सदस्यांनी आपल्या विभागातील समस्या सभागृहात मांडल्या.

देवबागमध्ये एका हॉटेलला बसविण्यात आलेल्या ट्रान्सफार्मरच्या चुकीच्या जोडणीमुळे गावातील अनेक ग्रामस्थांची विद्युत उपकरणे जळून लाखो रुपयांचे नुकसानझाले. या साऱ्या प्रकाराला वीज वितरण कंपनी जबाबदार असून बाजारभावाने ग्रामस्थांची नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी मधुरा चोपडेकर यांनी केली.वीज कनेक्शन देण्यास टाळाटाळअसरोंडी येथील सुनील शेलार यांनी वीज वितरणकडे वीज जोडणीसाठी पैसे भरल्यानंतर आवश्यक असणारे वीज खांब व वीज वाहिन्यांची जोडणी करण्यात आली. मात्र गेले वर्षभर वीज कनेक्शन देण्यात आलेले नाही.

लगतच्या ग्रामस्थांचा विरोध असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र जर वीज खांब उभारताना विरोध झाला नाही तर मग आता कनेक्शन देताना कसल्या अडचणी? असा संतप्त सवाल सुनील घाडीगावकर यांनी उपस्थित करत आचरा वीज वितरण विभागाच्या कामकाजावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग