शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

सिंधुदुर्ग : स्वतंत्र कोकण विद्यापीठ न झाल्यास आंदोलन :  महेंद्र नाटेकर यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 14:11 IST

रत्नागिरी येथे स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्यात यावे. येत्या दोन महिन्यात याबाबत कार्यवाही नाही झाली तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी, पालकांसह स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटना मुंबई - गोवा महामार्गावर तीव्र आंदोलन करेल.असा इशारा प्रा. महेंद्र नाटेकर यांनी शासनाला दिला आहे.

ठळक मुद्देस्वतंत्र कोकण विद्यापीठ न झाल्यास आंदोलन महेंद्र नाटेकर यांचा कणकवलीतील सभेत इशारा

कणकवली : सुमारे सात लाख विद्यार्थी असलेल्या मुंबई विद्यापीठात अनागोंदी कारभार चालला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. यासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र कोकणविद्यापीठ स्थापन करण्यात यावे. येत्या दोन महिन्यात याबाबत कार्यवाही नाही झाली तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी, पालकांसह स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटना मुंबई - गोवा महामार्गावर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा प्रा. महेंद्र नाटेकर यांनी शासनाला दिला आहे.याबाबत प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कणकवली येथील स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटनेच्या कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रा. नाटेकर बोलत होते.यावेळी मोतीराम गोठिवरेकर, ए.आय.चिलवान, प्रा.सुभाष गोवेकर, दिलीप लाड, जे.जे.दळवी , वाय. जी.राणे, रमेश सावंत आदी उपस्थित होते.प्रा. नाटेकर पुढे म्हणाले, मुंबई विद्यापीठात पदवी प्रमाणपत्रे व गुणपत्रिका हजारो रूपये घेऊन विकल्या जात आहेत. विद्यापीठाच्या बेजबाबदार कारभारामुळे लाखो विद्यार्थ्याना अकारण अनुतीर्ण केले जात आहे.

बनावट गुणपत्रिका व प्रमाणपत्रांचा घोटाळा गाजत असताना केटी लागलेल्या एका विद्यार्थिनीची दीड वर्ष उत्तरपत्रिका न तपासल्याने तीने सर्वोच्च न्यायालयात विद्यापीठाला खेचले आहे. ही गंभीर बाब आहे.कोकणा बरोबरच संपूर्ण भारतातील तसेच परदेशातील विद्यार्थी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतात. फोर्ट, कालिना व रत्नागिरी अशी तिन केंद्रे आहेत. हा सर्व व्याप एका कुलगुरुने सांभाळणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे भ्रष्टाचार फोफावला आहे. रत्नागिरी येथील उपकेंद्रात चाळीस विद्यार्थ्यांना एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने आपल्या सही , शिक्क्यानिशी काही हजारात गुणपत्रिका विकल्याचे समोर आले आहे.त्यातील सहा जणाना अटक करण्यात आली. दरवर्षी परीक्षेच्या वेळापत्रकात घोळ घातलेला असतो. प्रश्न पत्रिकेत असंख्य चुका असतात. मूल्य मापनाबरोबरच पुनर्मूल्यमापनात चुका असतात. निकाल वेळच्या वेळी लागत नाहीत. यावर्षी अनेक विद्यार्थी चुकून नापास केल्याचे समोर आले आहे. हा विद्यार्थ्यांच्या जीवनाशीच खेळ आहे. ही सर्व भयावह परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने रत्नागिरी येथे स्वतंत्र कोकण विद्यापीठ निर्मिती करण्याचा निर्णय त्वरीत जाहिर करावा. तसेच त्याची कार्यवाही करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असेही प्रा. नाटेकर यांनी यावेळी जाहिर केले. इतर उपस्थित सदस्यानी त्याला दुजोरा दिला. तसेच आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला. असेही या पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :konkanकोकणuniversityविद्यापीठsindhudurgसिंधुदुर्ग