शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : स्वतंत्र कोकण विद्यापीठ न झाल्यास आंदोलन :  महेंद्र नाटेकर यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 14:11 IST

रत्नागिरी येथे स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्यात यावे. येत्या दोन महिन्यात याबाबत कार्यवाही नाही झाली तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी, पालकांसह स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटना मुंबई - गोवा महामार्गावर तीव्र आंदोलन करेल.असा इशारा प्रा. महेंद्र नाटेकर यांनी शासनाला दिला आहे.

ठळक मुद्देस्वतंत्र कोकण विद्यापीठ न झाल्यास आंदोलन महेंद्र नाटेकर यांचा कणकवलीतील सभेत इशारा

कणकवली : सुमारे सात लाख विद्यार्थी असलेल्या मुंबई विद्यापीठात अनागोंदी कारभार चालला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. यासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र कोकणविद्यापीठ स्थापन करण्यात यावे. येत्या दोन महिन्यात याबाबत कार्यवाही नाही झाली तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी, पालकांसह स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटना मुंबई - गोवा महामार्गावर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा प्रा. महेंद्र नाटेकर यांनी शासनाला दिला आहे.याबाबत प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कणकवली येथील स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटनेच्या कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रा. नाटेकर बोलत होते.यावेळी मोतीराम गोठिवरेकर, ए.आय.चिलवान, प्रा.सुभाष गोवेकर, दिलीप लाड, जे.जे.दळवी , वाय. जी.राणे, रमेश सावंत आदी उपस्थित होते.प्रा. नाटेकर पुढे म्हणाले, मुंबई विद्यापीठात पदवी प्रमाणपत्रे व गुणपत्रिका हजारो रूपये घेऊन विकल्या जात आहेत. विद्यापीठाच्या बेजबाबदार कारभारामुळे लाखो विद्यार्थ्याना अकारण अनुतीर्ण केले जात आहे.

बनावट गुणपत्रिका व प्रमाणपत्रांचा घोटाळा गाजत असताना केटी लागलेल्या एका विद्यार्थिनीची दीड वर्ष उत्तरपत्रिका न तपासल्याने तीने सर्वोच्च न्यायालयात विद्यापीठाला खेचले आहे. ही गंभीर बाब आहे.कोकणा बरोबरच संपूर्ण भारतातील तसेच परदेशातील विद्यार्थी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतात. फोर्ट, कालिना व रत्नागिरी अशी तिन केंद्रे आहेत. हा सर्व व्याप एका कुलगुरुने सांभाळणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे भ्रष्टाचार फोफावला आहे. रत्नागिरी येथील उपकेंद्रात चाळीस विद्यार्थ्यांना एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने आपल्या सही , शिक्क्यानिशी काही हजारात गुणपत्रिका विकल्याचे समोर आले आहे.त्यातील सहा जणाना अटक करण्यात आली. दरवर्षी परीक्षेच्या वेळापत्रकात घोळ घातलेला असतो. प्रश्न पत्रिकेत असंख्य चुका असतात. मूल्य मापनाबरोबरच पुनर्मूल्यमापनात चुका असतात. निकाल वेळच्या वेळी लागत नाहीत. यावर्षी अनेक विद्यार्थी चुकून नापास केल्याचे समोर आले आहे. हा विद्यार्थ्यांच्या जीवनाशीच खेळ आहे. ही सर्व भयावह परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने रत्नागिरी येथे स्वतंत्र कोकण विद्यापीठ निर्मिती करण्याचा निर्णय त्वरीत जाहिर करावा. तसेच त्याची कार्यवाही करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असेही प्रा. नाटेकर यांनी यावेळी जाहिर केले. इतर उपस्थित सदस्यानी त्याला दुजोरा दिला. तसेच आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला. असेही या पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :konkanकोकणuniversityविद्यापीठsindhudurgसिंधुदुर्ग