शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
3
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
4
मराठा आरक्षण आंदोलन पेटणार, मनोज जरांगे पाटील ४ जून पासून पुन्हा उपोषण करणार 
5
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?
6
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
7
शमिता शेट्टी रुग्णालयात दाखल, बहिणीनेच रेकॉर्ड केला Video; नक्की झालं काय?
8
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
9
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
10
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
11
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वाद? हार्दिक सरावाला येताच रोहितसह तिघांनी मैदान सोडले
12
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
14
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
15
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...
16
'या' IPO चं जबरदस्त लिस्टिंग, पहिल्याच दिवशी शेअरला अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
17
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
18
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्ट्रात कधी बरसणार?
19
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
20
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'

सिंधुदुर्ग : सरकार शेतकऱ्यांना आत्महत्येस उद्युक्त करते : रघुनाथ दादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 4:20 PM

शेतकरी नांगरणीपासून मशागतीपर्यंत अनेक कामांसाठी सरकारला टॅक्स भरत असतो पण सरकार शेतकऱ्यांला हमीभावही देत नाही व निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना अधोगतीला आणले आहे. पयार्याने शेतकऱ्यांला हे सरकार आत्महत्या करण्यास उद्युक्तच करत आहे असा घणाघाती आरोप शेतकरी सुकाणू समितीचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी सिंधुदुर्गात केला.

ठळक मुद्देसरकार शेतकऱ्यांना आत्महत्येस उद्युक्त करते : रघुनाथ दादा पाटील

सिंधुदुर्गनगरी : शेतकरी नांगरणीपासून मशागतीपर्यंत अनेक कामांसाठी सरकारला टॅक्स भरत असतो पण सरकार शेतकऱ्यांला हमीभावही देत नाही व निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना अधोगतीला आणले आहे. पयार्याने शेतकऱ्यांला हे सरकार आत्महत्या करण्यास उद्युक्तच करत आहे असा घणाघाती आरोप शेतकरी सुकाणू समितीचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी सिंधुदुर्गात केला.शेतकरी सुकाणू समितीच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रभर हुतात्मा अभिवादन व शेतकरी जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रातीसिंह मासाहेब पाटील यांच्या गावातून सुरू केलेली ही जागर यात्रा सिंधुदुर्गात दाखल झाली.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची जागर सभा झाली. यानंतर पत्रकांशी ते बोलत होते. यावेळी सत्यशोधक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दीपक जगताप, राज्य संघटक किशोर ढमाले, आम आदमी पक्षाचे विवेक राणे, आनंद डिचोलकर , नैना कुºहाडे, दीपक सावंत आदी उपस्थित होते.रघूनाथदादा पाटील यांनी या जागर यात्रेची माहिती देताना सांगितले की १९ मार्चपासून ही यात्रा सुरू झाली आहे. या सरकारकडुन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी मिळावी व शेतमालाला हमीभाव मिळावा अशा शेतकरी हिताच्या मागण्या होत्या. मात्र अगोदरच्या सरकारने काय किंवा या सरकारने काय शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या हा आहे.भारताचे धोरण आज शेतमाल निर्यात बंदीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन घेऊनही आपल्या मालाला दर घेता येत नाही. भारतात आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतमाल निर्माण होतो मात्र त्याला योग्य हमीभाव मिळत नाही. उलट शेतकरी मात्र डिझेल म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा सर्वाधिक थेट कर सरकारला भरत असतो.३० एप्रिल रोजी जेलभरोरघुनाथदादा म्हणाले, कर्जमाफी जाहीर केली गेली मात्र त्यातही एवढा घोळ घातला गेला की शेतकऱ्यांच्या हाती निराशाच आली. त्याचेच पर्यावसान अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये होत आहे.

यासाठी सरसकट कर्जमाफी ही आमची आग्रही मागणी आहे. या जगात यात्रेच्या शेवटी ३० एप्रिलला शासनाच्या शेतकरी धोरण विरोधात सविनय कायदेभंग म्हणून जेलभरो आंदोलन केले जाणार आहे.या सत्याग्रहामुळे महाराष्ट्रातील तुरूंग अपुरे पडतील.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी