शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सिंधुदुर्ग : यशवंत पंचायत राज पुरस्कारांचे वितरण, राज्यपालांच्या हस्ते गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 12:17 IST

यशवंत पंचायत राज अभियान २०१७-१८ मध्ये यशस्वी ठरलेल्या राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना पुरस्कार वितरण शुक्रवारी मुंबई येथील रविंद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. राज्यपाल सी विद्यासागरराव व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

ठळक मुद्देयशवंत पंचायत राज पुरस्कारांचे वितरण, राज्यपालांच्या हस्ते गौरवसिंधुदुर्ग जिल्हा परिषद व कुडाळ, मालवण पंचायत समित्यांचा सन्मान

सिंधुदुर्गनगरी : यशवंत पंचायत राज अभियान २०१७-१८ मध्ये यशस्वी ठरलेल्या राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना पुरस्कार वितरण शुक्रवारी मुंबई येथील रविंद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. राज्यपाल सी विद्यासागरराव व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय द्वितीय, कुडाळ पंचायत समितीला राज्यस्तरीय द्वितीय व कोकण विभाग प्रथम, तर मालवण पंचायत समितीला कोकण विभाग द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदअध्यक्षा रेश्मा सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी हा पुरस्कार स्विकारला.जिल्हा परिषदेच्या पुरस्कार स्विकारण्यासाठी अध्यक्षा रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजीत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरीश जगताप, वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, महिला व बालकल्याण समिती सभापती सायली सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, कमलाकर रणदिवे, जिल्हा परिषद सदस्य राजलक्ष्मी डिचवलकर आदी उपस्थित होते.कुडाळ पंचायत समिती चा पुरस्कार स्विकारण्यासाठी सभापती राजन जाधव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, उपसभापती श्रेया परब, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, पंचायत समिती सदस्या राऊळ, रविंद्र पोवार, तात्या पवार, रतन कदम, अमित तेंडुलकर उपस्थित होते. मालवण पंचायत समिती चा पुरस्कार स्विकारण्यासाठी सभापती सोनाली कोदे, तत्कालीन सभापती मनीषा वराडकर, उपसभापती अशोक बागवे, अतिरिक्त गटविकास अधिकारी संजय गोसावी, कक्ष अधिकारी शिवाजी पवार, विठ्ठल मालंडकर आदी उपस्थित होते.पुरस्कारांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बोलबालाग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी पंचायत राज सस्थांचे योगदान मोठे असते. राज्यातील विकासाच्या प्रमुख योजना पंचायत राज सस्थामार्फत राबविल्या जातात. अशाप्रकारे चांगले काम करणाऱ्या पंचायत राज संस्थाना प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी शासनाने २००५-०६ पासून यशवंत पंचायत राज अभियान सुरु केले. त्यानुसार २०१७-१८ साठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व कुडाळ, मालवण पंचायत समिती यांनी या वित्तीय वर्षात सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रधान सचिव असीम गुप्ता, कोकण आयुक्त डॉ जगदीश पाटील, उपायुक्त गणेश चौधरी आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेला १७ लाख रुपये, कुडाळ पंचायत समितीला राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचे १५ लाख रुपये व कोकण विभाग प्रथम क्रमांकाचे ९ लाख रुपये तर कोकण विभाग द्वितीय क्रमांक आलेल्या मालवण पंचायत समिती ला ७ लाख रुपये तसेच सर्वांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. 

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग