शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : आंबोलीतील ग्रामस्थांचे उपोषण, पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 15:41 IST

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत आंबोली-सतीचीवाडी बंगलेवाडी येथे मंजूर असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेचे बंद असलेले काम त्वरित सुरु करावे या मागणीसाठी सतीचीवाडी बंगलेवाडी येथील ग्रामस्थांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

ठळक मुद्देआंबोलीतील ग्रामस्थांचे उपोषणनिवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत आंबोली-सतीचीवाडी बंगलेवाडी येथे मंजूर असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेचे बंद असलेले काम त्वरित सुरु करावे या मागणीसाठी सतीचीवाडी बंगलेवाडी येथील ग्रामस्थांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. या उपोषणात विलास गावडे, जगन्नाथ गावडे, शशिकांत सावंत, फटू सावंत, राजाराम गावडे, शाम गावडे, तानाजी गावडे, सोमा गावडे आदी ग्रामस्थांचा समावेश आहे. आंबोली सतीचीवाडी बंगलेवाडी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेचे काम मंजूर आहे. या योजनेंतर्गत विहिरीचे काम पूर्ण आहे. तसेच पाईपलाईनचेही काम पूर्ण आहे.मात्र, नवीन बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या जागेवरून वाद असल्याने ही योजना सुरु करण्यात आली नव्हती. पाण्याची आवश्यकता पाहता जुन्या पाण्याच्या टाकीमधून पाणी पुरवठा करावा अशी मागणी या ग्रामस्थांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व ग्रामपंचायत आंबोली कार्यालयाचे वारंवार लक्ष वेधले आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

ही योजना सुरु न झाल्याने या वाडीतील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तसेच काही दिवसांनी पाणीटंचाई ला सामोरे जावे लागणार आहे. याबद्दल नागरिकांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती. तरीही ठोस अशी उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थ नाराज आहेत.

त्यामुळे प्रशासने या ठिकाणी निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई पाहता या आंबोली सतीचीवाडी, बंगलेवाडी नळपाणी योजनेचे बंद असलेले काम त्वरित सुरु करावे व ग्रामस्थांना पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी आंबोली सतीचीवाडी बंगलेवाडी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.

पाण्याअभावी चाकरमान्यांची गावाकडे पाठआंबोली-सतीचीवाडी बंगलेवाडी येथे मंजूर असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेचे काम गेली ५ वर्षे बंद आहे. त्यामुळे या ठिकाणच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या पाण्यासाठी सहन कराव्या लागणाऱ्या त्रासामुळे येथील मुंबईतील चाकरमानी गावाकडे फिरकत नसल्याचे या ग्रामस्थांनी स्पष्ट केले. गावात पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पायपीटमुळे ग्रामस्थांबरोबरच चाकरमान्यांमध्येही नाराजीचे सूर आहेत 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWaterपाणीcollectorतहसीलदार