शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

सिंधुदुर्ग : आंबोलीतील ग्रामस्थांचे उपोषण, पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 15:41 IST

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत आंबोली-सतीचीवाडी बंगलेवाडी येथे मंजूर असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेचे बंद असलेले काम त्वरित सुरु करावे या मागणीसाठी सतीचीवाडी बंगलेवाडी येथील ग्रामस्थांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

ठळक मुद्देआंबोलीतील ग्रामस्थांचे उपोषणनिवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत आंबोली-सतीचीवाडी बंगलेवाडी येथे मंजूर असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेचे बंद असलेले काम त्वरित सुरु करावे या मागणीसाठी सतीचीवाडी बंगलेवाडी येथील ग्रामस्थांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. या उपोषणात विलास गावडे, जगन्नाथ गावडे, शशिकांत सावंत, फटू सावंत, राजाराम गावडे, शाम गावडे, तानाजी गावडे, सोमा गावडे आदी ग्रामस्थांचा समावेश आहे. आंबोली सतीचीवाडी बंगलेवाडी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेचे काम मंजूर आहे. या योजनेंतर्गत विहिरीचे काम पूर्ण आहे. तसेच पाईपलाईनचेही काम पूर्ण आहे.मात्र, नवीन बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या जागेवरून वाद असल्याने ही योजना सुरु करण्यात आली नव्हती. पाण्याची आवश्यकता पाहता जुन्या पाण्याच्या टाकीमधून पाणी पुरवठा करावा अशी मागणी या ग्रामस्थांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व ग्रामपंचायत आंबोली कार्यालयाचे वारंवार लक्ष वेधले आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

ही योजना सुरु न झाल्याने या वाडीतील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तसेच काही दिवसांनी पाणीटंचाई ला सामोरे जावे लागणार आहे. याबद्दल नागरिकांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती. तरीही ठोस अशी उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थ नाराज आहेत.

त्यामुळे प्रशासने या ठिकाणी निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई पाहता या आंबोली सतीचीवाडी, बंगलेवाडी नळपाणी योजनेचे बंद असलेले काम त्वरित सुरु करावे व ग्रामस्थांना पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी आंबोली सतीचीवाडी बंगलेवाडी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.

पाण्याअभावी चाकरमान्यांची गावाकडे पाठआंबोली-सतीचीवाडी बंगलेवाडी येथे मंजूर असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेचे काम गेली ५ वर्षे बंद आहे. त्यामुळे या ठिकाणच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या पाण्यासाठी सहन कराव्या लागणाऱ्या त्रासामुळे येथील मुंबईतील चाकरमानी गावाकडे फिरकत नसल्याचे या ग्रामस्थांनी स्पष्ट केले. गावात पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पायपीटमुळे ग्रामस्थांबरोबरच चाकरमान्यांमध्येही नाराजीचे सूर आहेत 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWaterपाणीcollectorतहसीलदार