शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
4
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
5
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
6
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
7
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
8
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
9
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
10
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
11
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
12
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
13
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
14
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
15
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
16
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
17
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
18
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
19
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
20
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

सिंधुदुर्ग : आंबोलीतील ग्रामस्थांचे उपोषण, पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 15:41 IST

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत आंबोली-सतीचीवाडी बंगलेवाडी येथे मंजूर असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेचे बंद असलेले काम त्वरित सुरु करावे या मागणीसाठी सतीचीवाडी बंगलेवाडी येथील ग्रामस्थांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

ठळक मुद्देआंबोलीतील ग्रामस्थांचे उपोषणनिवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत आंबोली-सतीचीवाडी बंगलेवाडी येथे मंजूर असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेचे बंद असलेले काम त्वरित सुरु करावे या मागणीसाठी सतीचीवाडी बंगलेवाडी येथील ग्रामस्थांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. या उपोषणात विलास गावडे, जगन्नाथ गावडे, शशिकांत सावंत, फटू सावंत, राजाराम गावडे, शाम गावडे, तानाजी गावडे, सोमा गावडे आदी ग्रामस्थांचा समावेश आहे. आंबोली सतीचीवाडी बंगलेवाडी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेचे काम मंजूर आहे. या योजनेंतर्गत विहिरीचे काम पूर्ण आहे. तसेच पाईपलाईनचेही काम पूर्ण आहे.मात्र, नवीन बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या जागेवरून वाद असल्याने ही योजना सुरु करण्यात आली नव्हती. पाण्याची आवश्यकता पाहता जुन्या पाण्याच्या टाकीमधून पाणी पुरवठा करावा अशी मागणी या ग्रामस्थांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व ग्रामपंचायत आंबोली कार्यालयाचे वारंवार लक्ष वेधले आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

ही योजना सुरु न झाल्याने या वाडीतील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तसेच काही दिवसांनी पाणीटंचाई ला सामोरे जावे लागणार आहे. याबद्दल नागरिकांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती. तरीही ठोस अशी उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थ नाराज आहेत.

त्यामुळे प्रशासने या ठिकाणी निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई पाहता या आंबोली सतीचीवाडी, बंगलेवाडी नळपाणी योजनेचे बंद असलेले काम त्वरित सुरु करावे व ग्रामस्थांना पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी आंबोली सतीचीवाडी बंगलेवाडी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.

पाण्याअभावी चाकरमान्यांची गावाकडे पाठआंबोली-सतीचीवाडी बंगलेवाडी येथे मंजूर असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेचे काम गेली ५ वर्षे बंद आहे. त्यामुळे या ठिकाणच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या पाण्यासाठी सहन कराव्या लागणाऱ्या त्रासामुळे येथील मुंबईतील चाकरमानी गावाकडे फिरकत नसल्याचे या ग्रामस्थांनी स्पष्ट केले. गावात पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पायपीटमुळे ग्रामस्थांबरोबरच चाकरमान्यांमध्येही नाराजीचे सूर आहेत 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWaterपाणीcollectorतहसीलदार