शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

सिंधुदुर्ग : पालकमंत्र्यांचा थंड दहशतवाद : सतीश सावंत यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 3:41 PM

गेल्या साडेतीन वर्षांत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तीन जिल्हाधिकारी व दोन जिल्हा पोलीस अधिकारी यांची बदली केली आहे. आपल्या मर्जीप्रमाणे अधिकारी वागावेत असा केसरकर यांचा थंड दहशतवाद आहे. याला उदय चौधरी यांच्यासह पाच आयपीएस अधिकाऱ्यांचा बळी गेला आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा थंड दहशतवाद : सतीश सावंत यांची टीका केसरकरांमुळेच जिल्हाधिकाऱ्यांची बदलीआयपीएस अधिकाऱ्यांचाही बळी

सिंधुदुर्गनगरी : गेल्या साडेतीन वर्षांत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तीन जिल्हाधिकारी व दोन जिल्हा पोलीस अधिकारी यांची बदली केली आहे. आपल्या मर्जीप्रमाणे अधिकारी वागावेत असा केसरकर यांचा थंड दहशतवाद आहे. याला उदय चौधरी यांच्यासह पाच आयपीएस अधिकाऱ्यांचा बळी गेला आहे.

चौधरी यांचे काम शेतकऱ्यांच्या हिताचे होते. त्यामुळे केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन राजकारण करणाऱ्या केसरकर यांना २०१९ मध्येच सिंधुदुर्गची जनता बदलेल, असे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षातील पत्रकार परिषदेत सांगितले.ते म्हणाले, जिल्हाधिकारी उदय चौधरी हे कार्यतत्पर व कार्यक्षम अधिकारी होते. मात्र पालकमंत्र्यांनी त्यांची बदली केल्याचे बोलले जात आहे. चौधरी यांनी अल्प कालावधीत केलेली कामगिरी शेतकरी हिताची होती. त्यांनी एमआरईजीएसमध्ये वृक्ष लागवडीचे केलेले काम लक्षवेधी आहे.

नर्सरीमध्ये गतवर्षी काजू कलमे शिल्लक नव्हती. जिल्हा नियोजनाचा झालेला खर्च चौधरी यांच्यामुळेच होऊ शकला. परंतु पालकमंत्री काम करताना अडचणी आणत होते. प्रस्ताव मंजूर करीत नव्हते. जिल्ह्यातील जनता त्यांच्यापेक्षा जिल्हाधिकाऱ्यांना सन्मान देत होती. त्याचा राग केसरकरांना होता.

केसरकर हे सावंतवाडीच्या पुढे जाऊ शकले नाहीत. तसेच चांदा ते बांदा योजनेत ६५ बैठकांच्या पुढे गेले नाहीत. काम करणारे अधिकारी नकोत. त्यांना केवळ बैठक घेणारे अधिकारी हवेत, असा आरोप सावंत यांनी केला.जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या जिल्ह्याच्या विकासाला खो घालणाऱ्या आहेत. त्यामुळे आपण याबाबत खेद व्यक्त करून जाहीर निषेध करतो, असे सांगत सावंत म्हणाले की, उदय चौधरी यांच्यासारखा चांगला अधिकारी पालकमंत्र्यांच्या थंड दहशतवादाला कंटाळला होता.

त्यामुळे बुधवारी आपली बदली झाल्याचे समजताच त्यांनी तत्काळ आपला पदभार अतिरिक्त जिल्हाधिकाºयांकडे देत स्वत:ला कार्यमुक्त करून घेतले. भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे. त्यामुळे भाजपने केसरकरांची ही वृत्ती रोखली पाहिजे, असे आवाहन यावेळी सावंत यांनी केले.नारायण राणे यांच्याकडून शिकून घ्यावे; सावंत यांचा सल्लाकेसरकर यांचा प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही. मर्जीतील अधिकारी आणूनसुद्धा त्यांना अंकुश ठेवता आलेला नाही. याला कारण म्हणजे त्यांचा प्रशासकीय अभ्यास, अनुभव नाही. त्यामुळे प्रशासकीय अभ्यास कसा असावा? प्रशासनावर अंकुश कसा ठेवावा? याची गरज असल्यास माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांच्याकडून शिकून घ्यावे, असा सल्ला यावेळी सावंत यांनी दिला.केसरकर यांचे पटणार तरी कोणाशी?पालकमंत्री केसरकर यांचे जिल्ह्यातील राजकारण्यांशी पटत नाही. त्याचबरोबर अधिकाऱ्यांशी पटत नाही. त्यांचे पटणार तरी कोणाशी ? असा प्रश्न यावेळी सावंत यांनी केला. त्यांना आपल्या मर्जीत राहणारे अधिकारी पाहिजेत. त्यांनी एकदाच ठरवावे. कोणते अधिकारी आपले ऐकणार, त्यानुसार एकदाच काय तो निर्णय घ्यावा, असेही आवाहन सावंत यांनी यावेळी केले.

टॅग्स :Satish Sawantसतीश सावंतDeepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग