शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

सिंधुदुर्ग :आंबा पिकावर होणार विपरीत परिणाम, बागायतदार धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 19:02 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह देवगड तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण व काही ठिकाणी रिमझिम तुरळक प्रमाणात पाऊस पडल्याने तुडतुडे व कीटकांचे प्रमाण वाढून आंबा पिकावर विपरीत परिणाम होणार असल्याचे मत आंबा बागायतदारांमधून व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देआंबा पिकावर होणार विपरीत परिणाम, बागायतदार धास्तावले ढगाळ वातावरण, पाऊस पडल्याने तुडतुडे, कीटकांचे प्रमाण वाढणार

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह देवगड तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण व काही ठिकाणी रिमझिम तुरळक प्रमाणात पाऊस पडल्याने तुडतुडे व कीटकांचे प्रमाण वाढून आंबा पिकावर विपरीत परिणाम होणार असल्याचे मत आंबा बागायतदारांमधून व्यक्त केले जात आहे.बुधवारी सकाळी देवगड तालुक्यातील काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडला. तर दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. याचा मोठा परिणाम आंबा पिकावरती होणार आहे.सध्या तालुक्यामधील शेवटच्या टप्प्यातील आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर आला आहे. तर पहिल्या टप्प्यातील आलेल्या मोहोरावरती झालेली फळधारणा त्याच कलमांना पुन्हा आंबा मोहोर आल्याने त्या झाडांवरील फळांची घळ झाली होती.अशा चिंताजनक परिस्थितीत बुधवारी तालुक्यामधील वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी तुरळक पाऊस पडल्याने आंबा पीक मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहे.ओखी चक्रीवादळामुळे डिसेंबर महिन्यामध्ये पडलेल्या पावसामुळे आंबा पिकावरती मोठा परिणाम झाला होता. यामुळे पहिल्या टप्प्यातील आंबा कलमांना मोहोर आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील डिसेंबर महिन्यातील आंबा कलमांना येणारा मोहोर लांबणीवरती जाऊन तो जानेवारी महिन्याच्या शेवटी व फेब्रुवारीमध्ये आला.

आंबा कलमांना मोहोर उशिरा आल्यामुळे यावर्षी देवगड हापूसचा हंगाम एप्रिल व मे महिना अशा दोन महिन्यांमध्ये राहणार आहे. या ढगाळ वातावरणामुळे व तुरळक रिमझिम पडलेल्या पावसामुळे आंबा मोहोरावरती तुडतुड्यांचे, कीटकांचे, बुरशीचे व खारीचे प्रमाण वाढणार असल्याने कृषी सल्ल्यानुसारच फवारणी करण्यात यावी असे कृषीतज्ज्ञांचे मत आहे.

उत्पादनाच्या बाबतीत चिंतेची बाबगतवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये काही प्रमाणात तर मार्च, एप्रिल, मे महिन्यांमध्ये असा साडेतीन महिने देवगड हापूसचा हंगाम राहिला होता. गेल्या सात ते आठ वर्षांमधील सातत्याने होत असलेली आंबा पिकाची घट गेल्यावर्षी रोखली होती व उत्कृष्ट नसलेतरी समाधानकारक असे देवगड हापूसचे उत्पादन मिळाले होते.

यामुळे यावर्षीदेखील देवगड हापूसचे पीक समाधानकारक असणार असे दिसून येत असतानाच वातावरणामधील अचानक होत असलेला बदल ही उत्पादनाच्या बाबतीत फार मोठी चिंतेची बाब ठरणार आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTemperatureतापमानfruitsफळेFarmerशेतकरी