शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

सिंधुदुर्ग : काजूगर विक्रीचे दर घसरले, निर्यात घसरल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 14:11 IST

काजूगर निर्यातीचा दर कमी झाल्याने व निर्यात घसरल्याने देशात काजूगर विक्रीचे दर घसरले आहेत. महाराष्ट्रातील काजू उद्योग सावरण्यासाठी महाराष्ट्र कॅश्यु असोसिएशनतर्फे शासनाकडे मागणी केली. सर्वंकष काजू उद्योगाचे धोरण ताबडतोब अमलात आणल्यास महाराष्ट्रातील काजू उद्योग सावरू शकेल, असे मत महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे काजूगर विक्रीचे दर घसरले, निर्यात घसरल्याचा परिणाम सर्वंकष काजू उद्योग धोरण अमलात आणण्याची मागणी

सिंधुदुर्ग : काजूगर निर्यातीचा दर कमी झाल्याने व निर्यात घसरल्याने देशात काजूगर विक्रीचे दर घसरले आहेत. महाराष्ट्रातील काजू उद्योग सावरण्यासाठी महाराष्ट्र कॅश्यु असोसिएशनतर्फे शासनाकडे मागणी केली. सर्वंकष काजू उद्योगाचे धोरण ताबडतोब अमलात आणल्यास महाराष्ट्रातील काजू उद्योग सावरू शकेल, असे मत महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी व्यक्त केले आहे.काजू उद्योगाला निर्यातदर घसरल्याने मोठा फटका बसला आहे. याबाबत सुरेश बोवलेकर म्हणाले, यावर्षीच्या म्हणजे २०१८ च्या सुरुवातीला काजूगर निर्यातीचा दर घटला. व्हीएतनामकडून होणारा निर्यात काजूगर अमेरिका व इतर देशांनी क्वालिटी चांगली नसल्याने कमी निर्यात झाला. त्याचा परिणाम काजू बीच्या जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. त्यामुळे यावर्षी गतवर्षातील सर्वात कमी दर काजू बीला मिळत आहे आणि काजू उद्योगासाठी ते धोक्याचे आहे.आर्थिक संकटाची भीती व्यक्तकाजू बीचा मुळातच खरेदीचा जास्त दर, वाळविण्याची तूट यामुळे उत्पादन किंमत वाढली गेल्याने आणि इतर राज्यातून म्हणजेच कर्नाटक, आंध्रप्रदेश, ओरिसा, तामिळनाडू येथून कमी दराने येणारा काजूगर यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे कमी दराचा काजूगर विक्री होऊ लागला आहे.

त्याचबरोबर निर्यात काजूगराचा दर मोठ्या प्रमाणात उतरल्यामुळे तो काजूगर महाराष्ट्रात तसेच देशाच्या अन्य राज्यात विक्रीसाठी कमी दराने उपलब्ध होत आहे. त्यामुळे अर्थातच महाराष्ट्रात मोठ्या दराने काजू बी घेतलेल्या उद्योगांकडे त्यांच्या निर्मितीच्या किमतीच्या कमी दराने काजूगर विकावा लागल्याने आर्थिक संकटाची भीती व्यक्त होत आहे. 

काजू बी खरेदीमध्ये मोठमोठे प्रक्रिया उद्योग मागे सरले. मात्र, महाराष्ट्रातील काजू पीक कमी या गोष्टीमुळे व खरेदीच्या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील काजू बीचा दर वाढत गेला. यासाठी काजूबद्दल सर्वंकष विकासाचे धोरण शासनाने त्वरित अमलात आणून काजू उद्योगांना नवसंजीवनी प्राप्त करून द्यावी.- सुरेश बोवलेकर, काजू असो. अध्यक्ष 

टॅग्स :fruitsफळेsindhudurgसिंधुदुर्ग