शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

सिंधुदुर्ग : काजूगर विक्रीचे दर घसरले, निर्यात घसरल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 14:11 IST

काजूगर निर्यातीचा दर कमी झाल्याने व निर्यात घसरल्याने देशात काजूगर विक्रीचे दर घसरले आहेत. महाराष्ट्रातील काजू उद्योग सावरण्यासाठी महाराष्ट्र कॅश्यु असोसिएशनतर्फे शासनाकडे मागणी केली. सर्वंकष काजू उद्योगाचे धोरण ताबडतोब अमलात आणल्यास महाराष्ट्रातील काजू उद्योग सावरू शकेल, असे मत महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे काजूगर विक्रीचे दर घसरले, निर्यात घसरल्याचा परिणाम सर्वंकष काजू उद्योग धोरण अमलात आणण्याची मागणी

सिंधुदुर्ग : काजूगर निर्यातीचा दर कमी झाल्याने व निर्यात घसरल्याने देशात काजूगर विक्रीचे दर घसरले आहेत. महाराष्ट्रातील काजू उद्योग सावरण्यासाठी महाराष्ट्र कॅश्यु असोसिएशनतर्फे शासनाकडे मागणी केली. सर्वंकष काजू उद्योगाचे धोरण ताबडतोब अमलात आणल्यास महाराष्ट्रातील काजू उद्योग सावरू शकेल, असे मत महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी व्यक्त केले आहे.काजू उद्योगाला निर्यातदर घसरल्याने मोठा फटका बसला आहे. याबाबत सुरेश बोवलेकर म्हणाले, यावर्षीच्या म्हणजे २०१८ च्या सुरुवातीला काजूगर निर्यातीचा दर घटला. व्हीएतनामकडून होणारा निर्यात काजूगर अमेरिका व इतर देशांनी क्वालिटी चांगली नसल्याने कमी निर्यात झाला. त्याचा परिणाम काजू बीच्या जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. त्यामुळे यावर्षी गतवर्षातील सर्वात कमी दर काजू बीला मिळत आहे आणि काजू उद्योगासाठी ते धोक्याचे आहे.आर्थिक संकटाची भीती व्यक्तकाजू बीचा मुळातच खरेदीचा जास्त दर, वाळविण्याची तूट यामुळे उत्पादन किंमत वाढली गेल्याने आणि इतर राज्यातून म्हणजेच कर्नाटक, आंध्रप्रदेश, ओरिसा, तामिळनाडू येथून कमी दराने येणारा काजूगर यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे कमी दराचा काजूगर विक्री होऊ लागला आहे.

त्याचबरोबर निर्यात काजूगराचा दर मोठ्या प्रमाणात उतरल्यामुळे तो काजूगर महाराष्ट्रात तसेच देशाच्या अन्य राज्यात विक्रीसाठी कमी दराने उपलब्ध होत आहे. त्यामुळे अर्थातच महाराष्ट्रात मोठ्या दराने काजू बी घेतलेल्या उद्योगांकडे त्यांच्या निर्मितीच्या किमतीच्या कमी दराने काजूगर विकावा लागल्याने आर्थिक संकटाची भीती व्यक्त होत आहे. 

काजू बी खरेदीमध्ये मोठमोठे प्रक्रिया उद्योग मागे सरले. मात्र, महाराष्ट्रातील काजू पीक कमी या गोष्टीमुळे व खरेदीच्या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील काजू बीचा दर वाढत गेला. यासाठी काजूबद्दल सर्वंकष विकासाचे धोरण शासनाने त्वरित अमलात आणून काजू उद्योगांना नवसंजीवनी प्राप्त करून द्यावी.- सुरेश बोवलेकर, काजू असो. अध्यक्ष 

टॅग्स :fruitsफळेsindhudurgसिंधुदुर्ग