शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

सिंधुदुर्ग : काजूगर विक्रीचे दर घसरले, निर्यात घसरल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 14:11 IST

काजूगर निर्यातीचा दर कमी झाल्याने व निर्यात घसरल्याने देशात काजूगर विक्रीचे दर घसरले आहेत. महाराष्ट्रातील काजू उद्योग सावरण्यासाठी महाराष्ट्र कॅश्यु असोसिएशनतर्फे शासनाकडे मागणी केली. सर्वंकष काजू उद्योगाचे धोरण ताबडतोब अमलात आणल्यास महाराष्ट्रातील काजू उद्योग सावरू शकेल, असे मत महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे काजूगर विक्रीचे दर घसरले, निर्यात घसरल्याचा परिणाम सर्वंकष काजू उद्योग धोरण अमलात आणण्याची मागणी

सिंधुदुर्ग : काजूगर निर्यातीचा दर कमी झाल्याने व निर्यात घसरल्याने देशात काजूगर विक्रीचे दर घसरले आहेत. महाराष्ट्रातील काजू उद्योग सावरण्यासाठी महाराष्ट्र कॅश्यु असोसिएशनतर्फे शासनाकडे मागणी केली. सर्वंकष काजू उद्योगाचे धोरण ताबडतोब अमलात आणल्यास महाराष्ट्रातील काजू उद्योग सावरू शकेल, असे मत महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी व्यक्त केले आहे.काजू उद्योगाला निर्यातदर घसरल्याने मोठा फटका बसला आहे. याबाबत सुरेश बोवलेकर म्हणाले, यावर्षीच्या म्हणजे २०१८ च्या सुरुवातीला काजूगर निर्यातीचा दर घटला. व्हीएतनामकडून होणारा निर्यात काजूगर अमेरिका व इतर देशांनी क्वालिटी चांगली नसल्याने कमी निर्यात झाला. त्याचा परिणाम काजू बीच्या जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. त्यामुळे यावर्षी गतवर्षातील सर्वात कमी दर काजू बीला मिळत आहे आणि काजू उद्योगासाठी ते धोक्याचे आहे.आर्थिक संकटाची भीती व्यक्तकाजू बीचा मुळातच खरेदीचा जास्त दर, वाळविण्याची तूट यामुळे उत्पादन किंमत वाढली गेल्याने आणि इतर राज्यातून म्हणजेच कर्नाटक, आंध्रप्रदेश, ओरिसा, तामिळनाडू येथून कमी दराने येणारा काजूगर यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे कमी दराचा काजूगर विक्री होऊ लागला आहे.

त्याचबरोबर निर्यात काजूगराचा दर मोठ्या प्रमाणात उतरल्यामुळे तो काजूगर महाराष्ट्रात तसेच देशाच्या अन्य राज्यात विक्रीसाठी कमी दराने उपलब्ध होत आहे. त्यामुळे अर्थातच महाराष्ट्रात मोठ्या दराने काजू बी घेतलेल्या उद्योगांकडे त्यांच्या निर्मितीच्या किमतीच्या कमी दराने काजूगर विकावा लागल्याने आर्थिक संकटाची भीती व्यक्त होत आहे. 

काजू बी खरेदीमध्ये मोठमोठे प्रक्रिया उद्योग मागे सरले. मात्र, महाराष्ट्रातील काजू पीक कमी या गोष्टीमुळे व खरेदीच्या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील काजू बीचा दर वाढत गेला. यासाठी काजूबद्दल सर्वंकष विकासाचे धोरण शासनाने त्वरित अमलात आणून काजू उद्योगांना नवसंजीवनी प्राप्त करून द्यावी.- सुरेश बोवलेकर, काजू असो. अध्यक्ष 

टॅग्स :fruitsफळेsindhudurgसिंधुदुर्ग