शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

सिंधुदुर्ग : काजूगर विक्रीचे दर घसरले, निर्यात घसरल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 14:11 IST

काजूगर निर्यातीचा दर कमी झाल्याने व निर्यात घसरल्याने देशात काजूगर विक्रीचे दर घसरले आहेत. महाराष्ट्रातील काजू उद्योग सावरण्यासाठी महाराष्ट्र कॅश्यु असोसिएशनतर्फे शासनाकडे मागणी केली. सर्वंकष काजू उद्योगाचे धोरण ताबडतोब अमलात आणल्यास महाराष्ट्रातील काजू उद्योग सावरू शकेल, असे मत महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे काजूगर विक्रीचे दर घसरले, निर्यात घसरल्याचा परिणाम सर्वंकष काजू उद्योग धोरण अमलात आणण्याची मागणी

सिंधुदुर्ग : काजूगर निर्यातीचा दर कमी झाल्याने व निर्यात घसरल्याने देशात काजूगर विक्रीचे दर घसरले आहेत. महाराष्ट्रातील काजू उद्योग सावरण्यासाठी महाराष्ट्र कॅश्यु असोसिएशनतर्फे शासनाकडे मागणी केली. सर्वंकष काजू उद्योगाचे धोरण ताबडतोब अमलात आणल्यास महाराष्ट्रातील काजू उद्योग सावरू शकेल, असे मत महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी व्यक्त केले आहे.काजू उद्योगाला निर्यातदर घसरल्याने मोठा फटका बसला आहे. याबाबत सुरेश बोवलेकर म्हणाले, यावर्षीच्या म्हणजे २०१८ च्या सुरुवातीला काजूगर निर्यातीचा दर घटला. व्हीएतनामकडून होणारा निर्यात काजूगर अमेरिका व इतर देशांनी क्वालिटी चांगली नसल्याने कमी निर्यात झाला. त्याचा परिणाम काजू बीच्या जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. त्यामुळे यावर्षी गतवर्षातील सर्वात कमी दर काजू बीला मिळत आहे आणि काजू उद्योगासाठी ते धोक्याचे आहे.आर्थिक संकटाची भीती व्यक्तकाजू बीचा मुळातच खरेदीचा जास्त दर, वाळविण्याची तूट यामुळे उत्पादन किंमत वाढली गेल्याने आणि इतर राज्यातून म्हणजेच कर्नाटक, आंध्रप्रदेश, ओरिसा, तामिळनाडू येथून कमी दराने येणारा काजूगर यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे कमी दराचा काजूगर विक्री होऊ लागला आहे.

त्याचबरोबर निर्यात काजूगराचा दर मोठ्या प्रमाणात उतरल्यामुळे तो काजूगर महाराष्ट्रात तसेच देशाच्या अन्य राज्यात विक्रीसाठी कमी दराने उपलब्ध होत आहे. त्यामुळे अर्थातच महाराष्ट्रात मोठ्या दराने काजू बी घेतलेल्या उद्योगांकडे त्यांच्या निर्मितीच्या किमतीच्या कमी दराने काजूगर विकावा लागल्याने आर्थिक संकटाची भीती व्यक्त होत आहे. 

काजू बी खरेदीमध्ये मोठमोठे प्रक्रिया उद्योग मागे सरले. मात्र, महाराष्ट्रातील काजू पीक कमी या गोष्टीमुळे व खरेदीच्या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील काजू बीचा दर वाढत गेला. यासाठी काजूबद्दल सर्वंकष विकासाचे धोरण शासनाने त्वरित अमलात आणून काजू उद्योगांना नवसंजीवनी प्राप्त करून द्यावी.- सुरेश बोवलेकर, काजू असो. अध्यक्ष 

टॅग्स :fruitsफळेsindhudurgसिंधुदुर्ग