शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

सिंधुदुर्ग : 'निपाहच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीती, पालिकेने वटवाघळांचा बंदोबस्त करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 15:49 IST

निपाह या साथीच्या रोगाने केरळमध्ये थैमान घातले असताना हा रोग ज्या प्राण्यामुळे मनुष्यात पसरतो, त्या वटवाघळांचा प्रश्न सावंतवाडी-खासकीलवाडा परिसरात निर्माण झाला असून, नागरिकांमधून भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे'निपाहच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीपालिकेने वटवाघळांचा बंदोबस्त करावा

सावंतवाडी : निपाह या साथीच्या रोगाने केरळमध्ये थैमान घातले असताना हा रोग ज्या प्राण्यामुळे मनुष्यात पसरतो, त्या वटवाघळांचा प्रश्न सावंतवाडी-खासकीलवाडा परिसरात निर्माण झाला असून, नागरिकांमधून भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, याबाबत स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी नाराजी व्यक्त केली असून, या ठिकाणी स्थिरावलेल्या वटवाघळामुळे आजार निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न करीत पालिकेने तत्काळ ठोस पाऊले उचलत या वटवाघळांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.येथील खासकीलवाडा भागात राजवाडा परिसराच्या मागे तसेच आरेकर कॉलनी, दीपदर्शन अपार्टमेंट परिसरात तसेच वारंग कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात वटवाघळांचा वावर आहे. दरम्यान त्यांची संख्या कमी करण्यासाठी पालिकेने अद्यापपर्यंत कोणतीही उपाययोजना केलेली नाही.दरम्यान, याबाबत बुधवारी तालुकाध्यक्ष परब यांनी आक्रमक भूमिका घेत याबाबत पत्रकारांना घटनास्थळी नेऊन माहिती दिली. यावेळी पंचायत समिती सभापती रवी मडगावकर, माजी नगरसेवक सुदन आरेकर आदी उपस्थित होते.यावेळी परब म्हणाले. निपाह हा आजार अगदी गोव्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. असे असताना शहरात मोठ्या प्रमाणात असलेल्या या वटवाघळांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेने कोणतीही उपाययोजना केलेली नाही.

सद्यस्थिती लक्षात घेता लहान मुले आंबे, जाम आदी फळे बाहेर पडलेली खातात. त्यामुळे त्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढे होणारे परिणाम लक्षात घेता पालिकेने योग्य ती भूमिका घ्यावी. अन्यथा पक्षाकडून आंदोलन केले जाईल.दरम्यान, माजी नगरसेवक आरेकर म्हणाले, वटवाघळांचे प्रमाण लक्षात घेता प्रश्न गंभीर आहे. याबाबत योग्य ते आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात यावेत, अशी मागणी आपण पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे करणार आहे. खासकीलवाडा परिसरात स्थिरावलेल्या वटवाघळांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येणार आहे 

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूsindhudurgसिंधुदुर्ग