शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

सिंधुदुर्ग : 'निपाहच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीती, पालिकेने वटवाघळांचा बंदोबस्त करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 15:49 IST

निपाह या साथीच्या रोगाने केरळमध्ये थैमान घातले असताना हा रोग ज्या प्राण्यामुळे मनुष्यात पसरतो, त्या वटवाघळांचा प्रश्न सावंतवाडी-खासकीलवाडा परिसरात निर्माण झाला असून, नागरिकांमधून भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे'निपाहच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीपालिकेने वटवाघळांचा बंदोबस्त करावा

सावंतवाडी : निपाह या साथीच्या रोगाने केरळमध्ये थैमान घातले असताना हा रोग ज्या प्राण्यामुळे मनुष्यात पसरतो, त्या वटवाघळांचा प्रश्न सावंतवाडी-खासकीलवाडा परिसरात निर्माण झाला असून, नागरिकांमधून भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, याबाबत स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी नाराजी व्यक्त केली असून, या ठिकाणी स्थिरावलेल्या वटवाघळामुळे आजार निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न करीत पालिकेने तत्काळ ठोस पाऊले उचलत या वटवाघळांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.येथील खासकीलवाडा भागात राजवाडा परिसराच्या मागे तसेच आरेकर कॉलनी, दीपदर्शन अपार्टमेंट परिसरात तसेच वारंग कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात वटवाघळांचा वावर आहे. दरम्यान त्यांची संख्या कमी करण्यासाठी पालिकेने अद्यापपर्यंत कोणतीही उपाययोजना केलेली नाही.दरम्यान, याबाबत बुधवारी तालुकाध्यक्ष परब यांनी आक्रमक भूमिका घेत याबाबत पत्रकारांना घटनास्थळी नेऊन माहिती दिली. यावेळी पंचायत समिती सभापती रवी मडगावकर, माजी नगरसेवक सुदन आरेकर आदी उपस्थित होते.यावेळी परब म्हणाले. निपाह हा आजार अगदी गोव्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. असे असताना शहरात मोठ्या प्रमाणात असलेल्या या वटवाघळांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेने कोणतीही उपाययोजना केलेली नाही.

सद्यस्थिती लक्षात घेता लहान मुले आंबे, जाम आदी फळे बाहेर पडलेली खातात. त्यामुळे त्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढे होणारे परिणाम लक्षात घेता पालिकेने योग्य ती भूमिका घ्यावी. अन्यथा पक्षाकडून आंदोलन केले जाईल.दरम्यान, माजी नगरसेवक आरेकर म्हणाले, वटवाघळांचे प्रमाण लक्षात घेता प्रश्न गंभीर आहे. याबाबत योग्य ते आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात यावेत, अशी मागणी आपण पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे करणार आहे. खासकीलवाडा परिसरात स्थिरावलेल्या वटवाघळांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येणार आहे 

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूsindhudurgसिंधुदुर्ग