शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

सिंधुदुर्ग : रासायनिक शेती हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार : सुधीर सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 2:23 PM

सध्याच्या वाढत्या रासायनिक शेतीमुळे विषारी अन्न निर्माण होत असून मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. लोकांना विषमुक्त अन्न मिळून जिल्ह्यातील रासायनिक शेती हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देरासायनिक शेती हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार : सुधीर सावंतसुभाष पाळेकर यांच्या उपस्थितीत ३०, ३१ ला नैसर्गिक शेती कार्यशाळा

सिंधुदुर्गनगरी : सध्याच्या वाढत्या रासायनिक शेतीमुळे विषारी अन्न निर्माण होत असून मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. लोकांना विषमुक्त अन्न मिळून जिल्ह्यातील रासायनिक शेती हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नैसर्गिक शेतीचे प्रणेते पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांची ३० व ३१ आॅक्टोबर रोजी आंबा, काजू, नारळ, कोकम व भाजीपाला या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कोकणातील तसेच कोल्हापूर येथून शेकडो शेतकरी उपस्थित राहणार आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकरी व बागायतदारांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही सावंत यांनी केले आहे.नैसर्गिक शेती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी ओरोस येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी सचिव दिनानाथ वेरणेकर, उन्मेश बागवे, सुप्रिया निकम, मंदार गीते, विलास सावंत, आशिष पाटील, रेखा खांडेकर, शिरोडकर आदी उपस्थित होते.यावेळी सुधीर सावंत म्हणाले, शेतकऱ्यांचे जीवन आनंदी आणि समृद्ध करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान उत्तम काम करीत आहे. कृषी संशोधन, शिक्षण, विस्तार व सल्ला सेवा या क्षेत्रात गेली २० वर्षे ही संस्था कार्यरत आहे. दिवसेंदिवस बदलत्या हवामानाचा शेती उद्योगावर मोठा परिणाम होताना दिसून येत आहे.

असंतुलित रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे विषारी अन्न निर्माण होत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. जमिनीचे आरोग्यही बिघडत चालले असून पिकांच्या उत्पादनात घट होताना दिसून येत आहे.स्वावलंबी ग्रामस्वराज्य मोहीम हातीसध्याच्या शेतीत रासायनिक खतांचा वाढता वापर आहे. हा वाढता वापर आरोग्यास हानिकारक ठरत आहे. परिणामी कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यासारखे असंख्य आजार यामुळे होत आहेत. या सर्व आजारांना पळवून लावण्यासाठी नैसर्गिक शेती हा एकमेव पर्याय असून त्यासाठी आपण झोकून देऊन काम करणार आहोत.

भविष्यात रसायनिक शेती जिल्ह्यातून हद्दपार करणार. नैसर्गिक शेतीचे खूप फायदे आहेत. नैसर्गिक शेतीमुळे आयुर्मान उंचावते, जमीन सुपीक बनते, खर्च कमी व उत्पादन जास्त मिळते. सध्याच्या सरकारने शेती नाकारत औद्योगिकतेवर जास्त भर दिल्याचे दिसून येत आहे. म्हणून शेती व शेतीमालावर प्रक्रिया हा केंद्रबिंदू ठेवून स्वावलंबी ग्रामस्वराज्य या तत्त्वावर भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था उभी करण्याची मोहीम हाती घेतली आहे, असेही सुधीर सावंत म्हणाले. 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग