शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

सिंधुदुर्ग : रासायनिक शेती हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार : सुधीर सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 14:26 IST

सध्याच्या वाढत्या रासायनिक शेतीमुळे विषारी अन्न निर्माण होत असून मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. लोकांना विषमुक्त अन्न मिळून जिल्ह्यातील रासायनिक शेती हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देरासायनिक शेती हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार : सुधीर सावंतसुभाष पाळेकर यांच्या उपस्थितीत ३०, ३१ ला नैसर्गिक शेती कार्यशाळा

सिंधुदुर्गनगरी : सध्याच्या वाढत्या रासायनिक शेतीमुळे विषारी अन्न निर्माण होत असून मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. लोकांना विषमुक्त अन्न मिळून जिल्ह्यातील रासायनिक शेती हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नैसर्गिक शेतीचे प्रणेते पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांची ३० व ३१ आॅक्टोबर रोजी आंबा, काजू, नारळ, कोकम व भाजीपाला या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कोकणातील तसेच कोल्हापूर येथून शेकडो शेतकरी उपस्थित राहणार आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकरी व बागायतदारांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही सावंत यांनी केले आहे.नैसर्गिक शेती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी ओरोस येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी सचिव दिनानाथ वेरणेकर, उन्मेश बागवे, सुप्रिया निकम, मंदार गीते, विलास सावंत, आशिष पाटील, रेखा खांडेकर, शिरोडकर आदी उपस्थित होते.यावेळी सुधीर सावंत म्हणाले, शेतकऱ्यांचे जीवन आनंदी आणि समृद्ध करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान उत्तम काम करीत आहे. कृषी संशोधन, शिक्षण, विस्तार व सल्ला सेवा या क्षेत्रात गेली २० वर्षे ही संस्था कार्यरत आहे. दिवसेंदिवस बदलत्या हवामानाचा शेती उद्योगावर मोठा परिणाम होताना दिसून येत आहे.

असंतुलित रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे विषारी अन्न निर्माण होत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. जमिनीचे आरोग्यही बिघडत चालले असून पिकांच्या उत्पादनात घट होताना दिसून येत आहे.स्वावलंबी ग्रामस्वराज्य मोहीम हातीसध्याच्या शेतीत रासायनिक खतांचा वाढता वापर आहे. हा वाढता वापर आरोग्यास हानिकारक ठरत आहे. परिणामी कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यासारखे असंख्य आजार यामुळे होत आहेत. या सर्व आजारांना पळवून लावण्यासाठी नैसर्गिक शेती हा एकमेव पर्याय असून त्यासाठी आपण झोकून देऊन काम करणार आहोत.

भविष्यात रसायनिक शेती जिल्ह्यातून हद्दपार करणार. नैसर्गिक शेतीचे खूप फायदे आहेत. नैसर्गिक शेतीमुळे आयुर्मान उंचावते, जमीन सुपीक बनते, खर्च कमी व उत्पादन जास्त मिळते. सध्याच्या सरकारने शेती नाकारत औद्योगिकतेवर जास्त भर दिल्याचे दिसून येत आहे. म्हणून शेती व शेतीमालावर प्रक्रिया हा केंद्रबिंदू ठेवून स्वावलंबी ग्रामस्वराज्य या तत्त्वावर भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था उभी करण्याची मोहीम हाती घेतली आहे, असेही सुधीर सावंत म्हणाले. 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग