शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

सिंधुदुर्ग : रासायनिक शेती हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार : सुधीर सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 14:26 IST

सध्याच्या वाढत्या रासायनिक शेतीमुळे विषारी अन्न निर्माण होत असून मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. लोकांना विषमुक्त अन्न मिळून जिल्ह्यातील रासायनिक शेती हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देरासायनिक शेती हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार : सुधीर सावंतसुभाष पाळेकर यांच्या उपस्थितीत ३०, ३१ ला नैसर्गिक शेती कार्यशाळा

सिंधुदुर्गनगरी : सध्याच्या वाढत्या रासायनिक शेतीमुळे विषारी अन्न निर्माण होत असून मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. लोकांना विषमुक्त अन्न मिळून जिल्ह्यातील रासायनिक शेती हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नैसर्गिक शेतीचे प्रणेते पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांची ३० व ३१ आॅक्टोबर रोजी आंबा, काजू, नारळ, कोकम व भाजीपाला या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कोकणातील तसेच कोल्हापूर येथून शेकडो शेतकरी उपस्थित राहणार आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकरी व बागायतदारांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही सावंत यांनी केले आहे.नैसर्गिक शेती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी ओरोस येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी सचिव दिनानाथ वेरणेकर, उन्मेश बागवे, सुप्रिया निकम, मंदार गीते, विलास सावंत, आशिष पाटील, रेखा खांडेकर, शिरोडकर आदी उपस्थित होते.यावेळी सुधीर सावंत म्हणाले, शेतकऱ्यांचे जीवन आनंदी आणि समृद्ध करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान उत्तम काम करीत आहे. कृषी संशोधन, शिक्षण, विस्तार व सल्ला सेवा या क्षेत्रात गेली २० वर्षे ही संस्था कार्यरत आहे. दिवसेंदिवस बदलत्या हवामानाचा शेती उद्योगावर मोठा परिणाम होताना दिसून येत आहे.

असंतुलित रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे विषारी अन्न निर्माण होत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. जमिनीचे आरोग्यही बिघडत चालले असून पिकांच्या उत्पादनात घट होताना दिसून येत आहे.स्वावलंबी ग्रामस्वराज्य मोहीम हातीसध्याच्या शेतीत रासायनिक खतांचा वाढता वापर आहे. हा वाढता वापर आरोग्यास हानिकारक ठरत आहे. परिणामी कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यासारखे असंख्य आजार यामुळे होत आहेत. या सर्व आजारांना पळवून लावण्यासाठी नैसर्गिक शेती हा एकमेव पर्याय असून त्यासाठी आपण झोकून देऊन काम करणार आहोत.

भविष्यात रसायनिक शेती जिल्ह्यातून हद्दपार करणार. नैसर्गिक शेतीचे खूप फायदे आहेत. नैसर्गिक शेतीमुळे आयुर्मान उंचावते, जमीन सुपीक बनते, खर्च कमी व उत्पादन जास्त मिळते. सध्याच्या सरकारने शेती नाकारत औद्योगिकतेवर जास्त भर दिल्याचे दिसून येत आहे. म्हणून शेती व शेतीमालावर प्रक्रिया हा केंद्रबिंदू ठेवून स्वावलंबी ग्रामस्वराज्य या तत्त्वावर भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था उभी करण्याची मोहीम हाती घेतली आहे, असेही सुधीर सावंत म्हणाले. 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग