शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सिंधुदुर्ग: आंबोली घाटातील संरक्षक कठडे दयनीय, सावंतवाडी पंचायत समितीत सदस्य आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 12:19 IST

आंबोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा. आंबोली घाटातील संरक्षक कठडे आणि साईडपट्टीची अवस्था दयनीय असून, पोलादपूरसारखा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सदस्यांकडून करण्यात आला. अधिकारीच ठेकेदार बनल्याने आंबोलीची दुरवस्था झाल्याचा आरोपही करण्यात आला.

ठळक मुद्देआंबोली घाटातील संरक्षक कठडे दयनीयपोलादपूरप्रमाणे अपघात झाल्यास जबाबदार कोण ? सावंतवाडी पंचायत समितीत सदस्य आक्रमक

आंबोली : आंबोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा. आंबोली घाटातील संरक्षक कठडे आणि साईडपट्टीची अवस्था दयनीय असून, पोलादपूरसारखा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सदस्यांकडून करण्यात आला. अधिकारीच ठेकेदार बनल्याने आंबोलीची दुरवस्था झाल्याचा आरोपही करण्यात आला.सावंतवाडी पंचायत समितीची मासिक बैठक सभापती रवींद्र्र मडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली गेळे येथील ग्रामपंचायत कक्षात पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी गजानन भोसले, व्ही. एन. नाईक, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी गावडे, एस. एस. अदाण्णवर, संदेश राणे, पंचायत समिती सदस्य संदीप तळवणेकर, मोहन चव्हाण, रुपेश राऊळ, पंकज पेडणेकर, श्रीकृष्ण सावंत, शीतल राऊळ, मेघ:श्याम काजरेकर, प्राजक्ता केळुसकर, मानसी धुरी, अक्षया खडपे, मनीषा गोवेकर, गौरी पावसकर, रेश्मा नाईक, श्रुतिका बागकर, सुनंदा राऊळ, कक्ष अधीक्षक मृणाल कार्लेकर, कक्ष अधिकारी दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते.यावेळी सदस्य मोहन चव्हाण यांनी आंबोली-कुंभवडे रस्त्यावर विद्युतवाहिन्या खाली आल्याने एसटी बस अडकून पडल्या, याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला. तसेच आंबोलीसाठी वायरमनची संख्या वाढवा. सध्या एका वायरमनवर काम सुरू आहे. वाढीव वीज बिले कमी करण्याबाबत वीज वितरण विभागाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी केली. तसा ठरावही घेण्यात आला.

आरोग्य विभागाबाबत बोलताना काही वैद्यकीय अधिकारी रुग्णालयातच खासगी सेवा देतात आणि त्या बदल्यात पैसे घेतात. अशांवर कारवाई करावी, अशी मागणी रुपेश राऊळ यांनी केली. तर गोवेकर यांनी वैद्यकीय अधिकारी एकाच मेडिकलमधून औषधे घेण्यास कसे सांगतात, त्यांना काय अधिकार, याचीही चौकशी करा, अशी मागणी केली. यावर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपण याबाबत चौकशी करून पुढील बैठकीत अहवाल सादर करू, असे सांगितले.या बैठकीत आंबोलीतील रस्ते तसेच घाटातील संरक्षक कठड्यांवरून चांगलाच वादंग झाला. बांधकामचे शाखा अभियंता इफ्तेकर मुल्ला यांना सर्वच सदस्यांनी धारेवर धरले. आंबोलीत एकही रस्ता चांगला नाही, रस्त्यावर डांबर नाही, घाटात संरक्षक कठडा नाही, साईडपट्ट्या नाहीत. त्यामुळे एखादी पोलादपूरसारखी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल करण्यात आला.आंबोलीत यावर्षी केलेले काम पुढच्या वर्षी नसते. अधिकारीच ठेकेदार झाले आहेत. रात्रीच्या वेळी वाहने घाटातून कशी चालवायची? गेळे, कावळेसाद येथे जाणाऱ्या कुठल्याही रस्त्यांना साईडपट्ट्या नाहीत. मग पैसा कुठे खर्च केला जातो? कोणाच्या घशात जातो? असा सवाल सर्वच सदस्यांनी केला.

बांधकामच्या कार्यपध्दतीवर सदस्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. सभापती मडगावकर यांनी त्यात मध्यस्थी केल्यानंतर आंबोलीतील कामाच्या चौकशीचा ठराव घेण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी उपविभागीय अभियंता विनायक चव्हाण यांना रुपेश राऊळ यांनी धारेवर धरले.या बैठकीत इतर विविध विषयांवरही चर्चा झाली. बैठकीच्या सुरुवातीला राजमाता सत्वशिलादेवी भोसले, मेजर कौस्तुभ राणे आदींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून खासदार विनायक राऊत यांनी संसदेत मराठीतून भाषण केल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. बैठकीचे नियोजन गेळे सरपंच अर्जुन कदम यांच्यासह सदस्य आणि ग्रामसेवक यांनी केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.ग्रामपंचायतीकडे नोंदीचे निर्बंध लादावेततालुक्यातील गावात कोणतेही अनधिकृतपणे कॅम्प घेतले जातात. त्याची सर्व माहिती ग्रामपंचायतीकडे असावी. अन्यथा कोणीही गावात येऊन काही करू शकतात.अशी अनोळखी व्यक्ती एखाद्याच्या घरात घुसल्यास जबाबदार कोण? असा सवाल पंचायत समिती सदस्या मनीषा गोवेकर यांनी केला. त्यावर सभापती मडगावकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंचांच्या बैठकीत याबाबत ग्रामसेवक व सरपंचांना माहिती द्यावी व गावात एखादा कॅम्प किंवा शिबिर झाल्यास त्याची नोंद ग्रामपंचायतीकडे करण्याबाबत निर्बंध लादावेत, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्गpwdसार्वजनिक बांधकाम विभाग