शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

कणकवली शहराच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 20:02 IST

kankvali, shivsena, sindhudurgews, sandeshparkar, कणकवली शहराच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तसेच नगरोत्थान योजनेमधून सन २०१८-१९ मध्ये ६ कोटी २ लाखांचा निधी देण्यात आला आहे. तर सन २०२० मध्ये ५ कोटिंचा असा तब्बल ११ कोटींचा निधी शहरासाठी देण्यात आला आहे. याशिवाय अन्य कामांसाठीही निधी देण्यात आला असून आम्ही नगरपंचायतीतील सत्तेत नसलो तरी निधी देताना कोणत्याही प्रकारचा दुजाभाव करण्यात आलेला नाही. अशी माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी येथे दिली.

ठळक मुद्देकणकवली शहराच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध ! संदेश पारकर यांची माहिती ; दोन वर्षात दिला अकरा कोटिंचा निधी

कणकवली : कणकवली शहराच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तसेच नगरोत्थान योजनेमधून सन २०१८-१९ मध्ये ६ कोटी २ लाखांचा निधी देण्यात आला आहे. तर सन २०२० मध्ये ५ कोटिंचा असा तब्बल ११ कोटींचा निधी शहरासाठी देण्यात आला आहे. याशिवाय अन्य कामांसाठीही निधी देण्यात आला असून आम्ही नगरपंचायतीतील सत्तेत नसलो तरी निधी देताना कोणत्याही प्रकारचा दुजाभाव करण्यात आलेला नाही. अशी माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी येथे दिली.कणकवली येथील विजयभवनमध्ये शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, सुजित जाधव , राजू राठोड, ऍड. हर्षद गावडे, तेजस राणे, गुरू पेडणेकर, नगरसेविका मानसी मुंज, माही परुळेकर,साक्षी आमडोस्कर , प्रसाद अंधारी आदी उपस्थित होते.यावेळी संदेश पारकर म्हणाले, सन २०१८- १९ मध्ये दिलेल्या निधीमध्ये क्रीडांगण आरक्षणासाठी ४ कोटी, शहरातील रस्ते व गटार साठी ३० लाख , अग्निशामक केंद्रासाठी तसेच अन्य विकासकामांसाठी १ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी शिवसेनेने दिला आहे. तर पालकमंत्री उदय सामंत , खासदार विनायक राऊत , आमदार वैभव नाईक , आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून शहर विकासासाठी यावर्षी ५ कोटीचा निधी देण्यात आला आहे.

त्यामध्ये श्रीधर नाईक उद्यान नूतनीकरणसाठी १ कोटी , छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी व सुशोभीकरणसाठी १ कोटी तर अन्य विकासकामांसाठी ३ कोटीच्या निधीचा समावेश आहे.तसेच बस स्थानक आवारात भव्य व्यापारी संकुल निर्मितीबाबत लवकरच परिवहनमंत्री अनिल परब धोरणात्मक निर्णय घेणार आहेत. परमहंस भालचंद्र महाराज संस्थान येथे सभामंडप उभारण्यासाठीही निधी उपलब्ध करून दिला आहे.कणकवली शहराच्या विकासासाठी शिवसेना नेहमीच झुकते माप देत आहे. लवकरच या विकास कामांचे भूमिपूजन होऊन वर्षभराच्या काळात ती कामे लोकार्पणही केली जातील. महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती होत असून या वर्षातील ८ महिने कोरोना काळात गेले आहेत. उर्वरित ४ महिन्यात राज्याला विधायक दिशा देणारे विकासात्मक निर्णय ठाकरे सरकारने घेतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संवेदनशीलतेने राज्यकारभार केला आहे.जिल्हा विकासासाठीही हितावह निर्णय घेण्यात आले आहेत.कोरोनाशी सामना करताना खंबीरपणे पालकमंत्री उदय सामंत , खासदार विनायक राऊत , आमदार दीपक केसरकर , आमदार वैभव नाईक यांनी जिल्हावासीयांना साथ दिली आहे. ओरोस येथे ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात आली असून कोव्हीड -१९ च्या चाचण्याही सुरू झाल्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ९६६ कोटी निधीची मान्यता देण्यात आली आहे. तसेच तत्काळ १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.गरज पडल्यास आंदोलनही करू !कणकवली शहरातील ४५ मीटरच्या आत आरओडब्ल्यू मधील जागा आणि मालमत्ता ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या मालकीची आहे. त्या जागेत असलेली अनधिकृत बांधकामे काढण्यात येणार आहेत. आम्ही सत्तेत असलो तरी जनतेच्या प्रश्नी गरज पडल्यास निश्चितच आंदोलन करण्यात येईल. महामार्गा बाबतच्या समस्या सोडविण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. असेही संदेश पारकर यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Sandesh Parkarसंदेश पारकरKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना