शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

सिंधुदुर्गात शिंदेसेनाच मोठा भाऊ - उदय सामंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 18:48 IST

कुडाळमधील आभार मेळाव्यात नीलेश राणेंचे तोंड भरून कौतुक

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठला मोठा पक्ष असेल तर तो आमदार दीपक केसरकर व आमदार नीलेश राणे यांचा शिंदेसेना आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्रीउदय सामंत यांनी कुडाळ येथील आभार मेळाव्यात गुरुवारी रात्री केले.‎ यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, आमदार नीलेश राणे, आमदार किरण सामंत, प्रवक्त्या ज्योती वाघमारे, बाळा चिंदरकर, संजय आंग्रे, दत्ता सामंत, आनंद शिरवलकर, संजू परब, वर्षा कुडाळकर, ॲड. नीता कवीटकर, संजय पडते तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‎यावेळी उदय सामंत यांनी सांगितले की, काही संबंध नसताना काही गोष्टी घडवायच्या. एखादी दुर्घटना घडल्यानंतर एखादी गोष्ट घडल्यानंतर त्याला थेट नीलेश राणेंचा संबंध जोडायचा, हे राजकारण कार्यकर्ते थांबवण्यासाठी जर कोण करत असतील तर आज या सभेला तुम्ही उत्तर दिलेला आहे. एमआयडीसी तून ५० कोटींचा निधी नीलेश राणे यांना देणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.ज्योती वाघमारे, संजय पडते, अपूर्वा सामंत, बाळा चिंदरकर, दीपलक्ष्मी पडते, अशोक दळवी, दादा साईल, प्रेमानंद देसाई यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले. उबाठा सेनेतून सुमारे दीड हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी विविध गीत सादर करण्यात आली. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचे कार्य अधोरेखित करणारे व्हिडिओ दाखवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले.

मला पराभूत करण्यासाठी २५ वर्षे वाट पाहा‎नीलेश राणे म्हणाले, पाच महिने आम्ही इथे ठिकाणी मेहनत घेतली, जे काय कष्ट घेतले, पक्ष उभा केला. गावागावामध्ये इतर सगळे पक्ष बिथरले की हा कुठला पक्ष लोक बांधतायत? हा जर पक्ष बांधला गेला तर इतर कुठल्या पक्षाला संधी मिळणार नाही. असा पक्ष आम्ही इकडे उभा केला. तुम्हाला आज या व्यासपीठावरून विश्वास देतो. विरोधक माझ्यावर टीका करतात. पण मला इकडे परत पराभूत करण्यासाठी २५ वर्ष तुम्हाला वाट बघावी लागेल. तुम्हाला मी लोकप्रतिनिधी व्हायला देणार नाही. या जिल्ह्यातून तरी होणार नाही. कुठून तरी आयात करून काय जर आणलं तर मला माहीत नाही. पण या जिल्ह्यातून निवडून याल अशी परिस्थिती ठेवणार नाही एवढे विरोधकांनी लक्षात ठेवावे.

घरी बसेन, पण शिंदेंना सोडणार नाही‎काही लोक म्हणतात नीलेश राणे आता दुसऱ्या पक्षात जाणार. आयुष्यात कधी जाणार नाही. ज्या शिंदे साहेबांनी या कपाळाला गुलाल लावला, दहा वर्षांच्या काळानंतर कपाळाला गुलाल लागला नव्हता, ते शिंदे साहेबांनी लावला हे उपकार त्यांचा मी कधी आयुष्यात विसरणार नाही. कशाला जाऊ मी दुसरीकडे? अरे घरी बसेन, पण माझ्या शिंदे साहेबांना सोडणार नाही. मी या सरकारमध्ये दुसरा कोणालाच फोन लावत नाही. मी फक्त उदय सामंतांना फोन लावतो. बाकी कोणाला फोन लावत नाही. कधी कोणाकडे जात नाही. मदत मागितली तर या माणसाकडे मागतो. काय विचारायचं झालं तर या माणसाला विचारतो. दुसरा कोणाकडे जात नाही. कधी जायची गरजच पडली नाही. म्हणून सामंत असेच प्रेम आमच्यावर ठेवा. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर ठेवा.

नीलेश राणेंना मंत्रिपद द्यावे : दत्ता सामंत‎दत्ता सामंत म्हणाले, येथील जनतेचा आशीर्वाद आमदार नीलेश राणे यांच्या पाठीशी कायमचा राहिला पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यांमध्ये कुठल्याही तालुक्यामध्ये नीलेश राणे गेले तर हजारो संख्येच्या माध्यमातून कुठल्याही जिल्ह्यामध्ये सभा घेऊ शकतात. अशी ताकद मुंबई ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. एक दमदार असा कार्यकर्ता शिंदेसेनेला मिळालेला आहे. शिंदेसेना ही एक नंबर करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. शिंदेसेना भक्कम करण्यासाठी नीलेश राणे यांना मंत्रिपद द्यावे, अशी मागणी दत्ता सामंत यांनी केले. त्यांना मंत्रिपद मिळाले तर २०२९ च्या निवडणुकीत शिंदेसेनेला अजून यश मिळेल, असा विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंतministerमंत्री