शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ ऑगस्ट रोजी शहीद मेजर कौस्तुभ राणे मानवंदना यात्रा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 12:08 IST

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या रक्षा कलश दर्शन व मानवंदना यात्रेचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे, अशी माहिती शहीद मेजर कौस्तुभ राणे अभिवादन समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ ऑगस्ट रोजी मानवंदना यात्रा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहीद राणे रक्षा कलश दर्शन

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण पिढीमध्ये देशसेवेची ओढ़ निर्माण व्हावी तसेच शहीद जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या रक्षा कलश दर्शन व मानवंदना यात्रेचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे, अशी माहिती शहीद मेजर कौस्तुभ राणे अभिवादन समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेच्यावेळी मानवंदना यात्रेच्या संयोजिका सुलेखा राणे, विनायक मेस्त्री, दिलीप रावराणे, शाम सावंत, एस.टी.सावंत, निवृत्त सुभेदार अशोक कदम, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अर्जुन राणे, प्रभाकर सावंत, अवधूत मालणकर, प्रताप भोसले, संदीप सावंत, अनूप वारंग, विनायक सापळे आदी उपस्थित होते.यावेळी सुलेखा राणे म्हणाल्या, निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग जिल्हा हा कलावंतांचा, समाजसेवकांचा, राजकारण्यांचा अशा ओळखी बरोबरच या जिल्ह्याला देश सेवेचा मोठा वारसा आहे. या जिल्ह्यातील अनेकांनी भारतीय लष्करात भरती होऊन विविध पदावर काम करताना देशसेवा केली आहे.

प्रसंगी देशासाठी हौतात्म्य पत्करून प्राणांची बाजी लावून देशरक्षणाचे काम करताना या जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या जिल्ह्यातील काही गाव सैनिकांचे म्हणून प्रसिध्द आहेत. हा समर्थ वारसा पुन्हा एकदा शहीद मेजर कौस्तुभ राणे यांनी अधोरेखित केला आहे.आठ ऑगस्ट रोजी आतंकवादी हल्ल्यात वैभववाडी तालुक्यातील सडुरेचे सुपुत्र असलेले मेजर कौस्तुभ राणे यांना शत्रुशी लढताना विरमरण प्राप्त झाले. त्यांचा हा वारसा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरुन त्यांच्यात देशसेवेची ओढ़ निर्माण होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शहीद जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या रक्षा कलश दर्शन व मानवंदना यात्रेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजन करण्यात आले आहे.21 ऑगस्ट रोजी मेजर कौस्तुभ राणे यांच्या मूळ गावापासून या मानवंदना यात्रेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर वैभववाडी, लोरे, फोंडा असे मार्गक्रमण करीत ही यात्रा कणकवलीत सकाळी 8.30 वाजता पोहचेल. कणकवलीतील पू. अप्पासाहेब पटवर्धन चौकातुन बाजारपेठ मार्गे तेलीआळीतून ही यात्रा कणकवली महावि

द्यालयात पोहोचेल. त्याठिकाणी नागरिकांना दर्शनासाठी रक्षा कलश ठेवण्यात येणार आहे. तिथुन ही यात्रा कसाल, कुडाळ ,सावंतवाड़ी, वेंगुर्ले, मालवण, आचरा मार्गे सायंकाळी 6 वाजता कुणकेश्वर येथे पोहचेल. त्यानंतर रक्षा कलशाचे विसर्जन करण्यात येईल.कणकवली येथे जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात येईल. या यात्रेत विविध ठिकाणी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार नीतेश राणे, आमदार वैभव नाईक तसेच इतर राजकीय व प्रतिष्ठित व्यक्ति सहभागी होणार आहेत.

या यात्रा आयोजन व नियोजनासाठी प्रशासकीय यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्य करणार आहे. या यात्रेत जिल्ह्यातील नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.शाश्वत कार्याची गरज !शहीदाना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहन्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाश्वत कार्याची गरज आहे. ओरोस सारख्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्ह्यातील तरुणांना मार्गदर्शन करून लष्करात अधिकारी पदावर कार्यरत करणे.

देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबाना पुढील काळात मदत होऊ शकेल असे एखादे केंद्र स्थापन करणे आवश्यक असून त्यासाठी जिल्हा वासियानी आता पुढे येणे आवश्यक आहे. या मानवंदना यात्रेच्या निमित्ताने तसा संकल्प करून कामाला लागणे ही काळाची गरज आहे, असे विनायक मेस्त्री यानी यावेळी सांगितले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग