शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ ऑगस्ट रोजी शहीद मेजर कौस्तुभ राणे मानवंदना यात्रा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 12:08 IST

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या रक्षा कलश दर्शन व मानवंदना यात्रेचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे, अशी माहिती शहीद मेजर कौस्तुभ राणे अभिवादन समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ ऑगस्ट रोजी मानवंदना यात्रा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहीद राणे रक्षा कलश दर्शन

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण पिढीमध्ये देशसेवेची ओढ़ निर्माण व्हावी तसेच शहीद जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या रक्षा कलश दर्शन व मानवंदना यात्रेचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे, अशी माहिती शहीद मेजर कौस्तुभ राणे अभिवादन समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेच्यावेळी मानवंदना यात्रेच्या संयोजिका सुलेखा राणे, विनायक मेस्त्री, दिलीप रावराणे, शाम सावंत, एस.टी.सावंत, निवृत्त सुभेदार अशोक कदम, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अर्जुन राणे, प्रभाकर सावंत, अवधूत मालणकर, प्रताप भोसले, संदीप सावंत, अनूप वारंग, विनायक सापळे आदी उपस्थित होते.यावेळी सुलेखा राणे म्हणाल्या, निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग जिल्हा हा कलावंतांचा, समाजसेवकांचा, राजकारण्यांचा अशा ओळखी बरोबरच या जिल्ह्याला देश सेवेचा मोठा वारसा आहे. या जिल्ह्यातील अनेकांनी भारतीय लष्करात भरती होऊन विविध पदावर काम करताना देशसेवा केली आहे.

प्रसंगी देशासाठी हौतात्म्य पत्करून प्राणांची बाजी लावून देशरक्षणाचे काम करताना या जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या जिल्ह्यातील काही गाव सैनिकांचे म्हणून प्रसिध्द आहेत. हा समर्थ वारसा पुन्हा एकदा शहीद मेजर कौस्तुभ राणे यांनी अधोरेखित केला आहे.आठ ऑगस्ट रोजी आतंकवादी हल्ल्यात वैभववाडी तालुक्यातील सडुरेचे सुपुत्र असलेले मेजर कौस्तुभ राणे यांना शत्रुशी लढताना विरमरण प्राप्त झाले. त्यांचा हा वारसा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरुन त्यांच्यात देशसेवेची ओढ़ निर्माण होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शहीद जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या रक्षा कलश दर्शन व मानवंदना यात्रेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजन करण्यात आले आहे.21 ऑगस्ट रोजी मेजर कौस्तुभ राणे यांच्या मूळ गावापासून या मानवंदना यात्रेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर वैभववाडी, लोरे, फोंडा असे मार्गक्रमण करीत ही यात्रा कणकवलीत सकाळी 8.30 वाजता पोहचेल. कणकवलीतील पू. अप्पासाहेब पटवर्धन चौकातुन बाजारपेठ मार्गे तेलीआळीतून ही यात्रा कणकवली महावि

द्यालयात पोहोचेल. त्याठिकाणी नागरिकांना दर्शनासाठी रक्षा कलश ठेवण्यात येणार आहे. तिथुन ही यात्रा कसाल, कुडाळ ,सावंतवाड़ी, वेंगुर्ले, मालवण, आचरा मार्गे सायंकाळी 6 वाजता कुणकेश्वर येथे पोहचेल. त्यानंतर रक्षा कलशाचे विसर्जन करण्यात येईल.कणकवली येथे जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात येईल. या यात्रेत विविध ठिकाणी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार नीतेश राणे, आमदार वैभव नाईक तसेच इतर राजकीय व प्रतिष्ठित व्यक्ति सहभागी होणार आहेत.

या यात्रा आयोजन व नियोजनासाठी प्रशासकीय यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्य करणार आहे. या यात्रेत जिल्ह्यातील नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.शाश्वत कार्याची गरज !शहीदाना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहन्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाश्वत कार्याची गरज आहे. ओरोस सारख्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्ह्यातील तरुणांना मार्गदर्शन करून लष्करात अधिकारी पदावर कार्यरत करणे.

देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबाना पुढील काळात मदत होऊ शकेल असे एखादे केंद्र स्थापन करणे आवश्यक असून त्यासाठी जिल्हा वासियानी आता पुढे येणे आवश्यक आहे. या मानवंदना यात्रेच्या निमित्ताने तसा संकल्प करून कामाला लागणे ही काळाची गरज आहे, असे विनायक मेस्त्री यानी यावेळी सांगितले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग