शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

‘चिपी’वर १२ सप्टेंबरला विमानाचे ‘टेक आॅफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:04 IST

वेंगुर्ले : चिपी विमानतळ सुरू होण्यासाठी आता कोणत्याही त्रुटी राहिल्या नसून, येत्या १२ सप्टेंबरला प्रायोगिक तत्त्वावर पहिले ‘टेक आॅफ’ करण्यात येईल. त्यानंतर माल्टा येथून पहिले आंतरराष्ट्रीय पातळीवरील विमान उतरले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले येथील पत्रकार परिषदेत दिली.दोन दिवसांच्या वेंगुर्ले तालुका दौऱ्यादरम्यान पालकमंत्री केसरकर यांनी शनिवारी परुळे, ...

वेंगुर्ले : चिपी विमानतळ सुरू होण्यासाठी आता कोणत्याही त्रुटी राहिल्या नसून, येत्या १२ सप्टेंबरला प्रायोगिक तत्त्वावर पहिले ‘टेक आॅफ’ करण्यात येईल. त्यानंतर माल्टा येथून पहिले आंतरराष्ट्रीय पातळीवरील विमान उतरले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले येथील पत्रकार परिषदेत दिली.दोन दिवसांच्या वेंगुर्ले तालुका दौऱ्यादरम्यान पालकमंत्री केसरकर यांनी शनिवारी परुळे, भोगवे येथील पर्यटनक्षेत्रांना भेट दिली. तर रविवारी चिपी विमानतळ, फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले, आरवली व आरोंदा अशा पर्यटनक्षेत्रांना भेट दिली. त्यानंतर येथील सागर बंगला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी केसरकर यांनी केंद्रीय हवाईमंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस या सर्वांच्या सहकार्यामुळे चिपीमध्ये विमानतळ होण्याचे आपले स्वप्न पूर्ण होत आहे, असे सांगितले. विमानतळाचे सर्व काम पूर्ण झाले असून, लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे. यासंदर्भात आपण आयआरबीला सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.माल्टावरून पहिले आंतरराष्ट्रीय पातळीवरील विमान उतरणार आहे. तसेच आठवड्यातून तीन दिवस आंतरराष्ट्रीय विमान उतरण्यासाठी एका कंपनीशी चर्चा झाली आहे. चिपी विमानतळाची धावपट्टी अडीच किलोमीटरची आहे व ती पुढे सव्वातीन किलोमीटर केली जाणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.महिन्याभरात जिल्ह्यातील बारापैकी आठ कॉयर कारखाने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा सधन जिल्हा होणार आहे. ‘जय जवान, जय किसान’ अंतर्गत आंबा, काजू, नारळ उत्पादक शेतकºयांना यांत्रिकी सुविधा पुरविण्यात येतील. सावंतवाडी येथे एमपीएससी, यूपीएससी अभ्यासक्रम सेंटर सुरू करण्यात येत आहे. ज्या युवकांना हॉटेल क्षेत्रात काम करायचे असेल अशांसाठी वेंगुर्ले व आंबोली येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. आपण ५० सीटच्या पाणबुडीची मागणी केली होती. मात्र, सध्या परदेशात २६ सीटची पाणबुडी तयार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत देशातील पहिलीच २६ सीटर पाणबुडी वेंगुर्ले येथे दाखल होईल, अशी माहिती त्यांनी दिली.पर्यटन, चिपी विमानतळ तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संपूर्ण किनारपट्टीवरील भागात विकासकामे केली जातील. मच्छिमारांसाठी ८०० पैकी ४०० बोटींना आऊटबोट इंजिन देण्यात येणार असून, पिंजºयातील मत्स्यशेती करणाºया गटांना ५० टक्के अनुदानावर कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मासळी बाहेर पाठविण्यासाठी वातानुकूलित वाहन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व बंदरांचे आधुनिकीकरण करणार असल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.लघुउद्योगासाठी कर्जयेत्या तीन महिन्यांच्या कालावधीत चिपी विमानतळ परिसरात ३०० ते ४०० कॉटेजीस उभे करण्यात येणार आहेत. येथील स्थानिकांच्या घराघरांमध्ये छोट्या स्वरूपाचे कॉटेज सुरू ंकरून त्याद्वारे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी ज्या स्थानिकांच्या जमिनी विमानतळासाठी संपादित झालेल्या आहेत, त्यांनी पुढे यावे. त्यांना ५० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती केसरकर यांनी दिली.