शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

सिंधुदुर्गात १६ पैकी ४ प्रकल्पांवर फक्त चौकीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 20:14 IST

Irrigation Projects Konkan : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटीच्या घटनेला दोन वर्षे उलटली. मात्र, यातून प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक लघु पाटबंधारे प्रकल्पांची सुरक्षा बेभरवशाचीच असल्याचे दिसत असून, १६ पाटबंधारे प्रकल्पांपैकी ४ प्रकल्पांवरच चौकीदार नेमण्यात आले आहेत. तर उर्वरित धरणांवर पाणी सोडण्यापुरते नामधारी असल्याचे दिसत असून शासनस्तरावर याची दखल घेऊन पावसाच्या तोंडावर चौकीदार नेमणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देलघुपाटबंधारे प्रकल्पांची सुरक्षा रामभरोसेतिवरेच्या दुर्घटनेनंतर धडाच घेतला नाही

अनंत जाधवसावंतवाडी : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटीच्या घटनेला दोन वर्षे उलटली. मात्र, यातून प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. रत्नागिरीप्रमाणेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक लघु पाटबंधारे प्रकल्पांची सुरक्षा बेभरवशाचीच असल्याचे दिसत असून, १६ पाटबंधारे प्रकल्पांपैकी ४ प्रकल्पांवरच चौकीदार नेमण्यात आले आहेत. तर उर्वरित धरणांवर पाणी सोडण्यापुरते नामधारी असल्याचे दिसत असून शासनस्तरावर याची दखल घेऊन पावसाच्या तोंडावर चौकीदार नेमणे गरजेचे आहे. अन्यथा शासन रामभरासे कारभारामुळे भविष्यात मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकते एवढे नक्की म्हणावे लागेल.रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणफुटीची घटना ताजी असतानाच जलसंपदाच्या लघुपाटबंधारे विभागाने धरण प्रकल्पावर असलेले चौकीदार सेवानिवृत्त झाल्यानंतर ती पदेच भरली नसल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत.

तिवरे प्रकल्प मध्यरात्री फुटला. त्यानंतर त्यातील अनेक दोष समोर आले. त्यात विशेषत: धरणाच्या देखभालीचा विषय आल्याचे दिसून आले. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात पाटबंधारे विभागाने चोवीस तास धरणावर करडी नजर ठेवण्यासाठी दोन व्यक्तींची निवड केली होती. ती कंत्राटी पद्धतीची आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याच्या उलट पावसाळी कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची नामधारी व्यवस्था करण्यात आली असून, अतिवृष्टीमुळे धरण ओव्हरफ्लो होते.कायमस्वरूपी चौकीदार हवायातील काही प्रकल्प हे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्या धरणांना पाणीगळती लागलेली आहे. त्यामुळे अशा प्रकल्पांवर कायमस्वरूपी चौकीदार नेमला जावा, अन्यथा रामभरोसे कारभारामुळे पुन्हा एकदा तिवरेसारखी घटना घडू नये एवढेच यातून दिसते आहे. तसेच अतिवृष्टीमुळे धरण ओव्हरफ्लो झाल्यास यावेळी माणसाची गरज भासणार आहे. त्यामुळे तशी मागणी आता जोर धरत आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पsindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरी