शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना सतीश सावंत यांनी दिला सन्मान : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 19:42 IST

Banking Sector Deepk kesrkar SIndhudurg : राजकारणापलीकडे जाऊन कसे काम करावे हे सतीश सावंत यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर राहून दाखवून दिले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सहकार क्षेत्रात चांगले काम करतानाच शेतकऱ्यांना सन्मान देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी गुरुवारी बँकेच्या ३८व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

ठळक मुद्देजिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना सतीश सावंत यांनी दिला सन्मान : दीपक केसरकर बँकेचा ३८व्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रतिपादन

ओरोस : राजकारणापलीकडे जाऊन कसे काम करावे हे सतीश सावंत यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर राहून दाखवून दिले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सहकार क्षेत्रात चांगले काम करतानाच शेतकऱ्यांना सन्मान देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी गुरुवारी बँकेच्या ३८व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ३८व्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्यावतीने कोरोनामध्ये दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना आर्थिक मदत, जास्त भातविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान कार्यक्रम जिल्हा बँकेच्या सभागृहात जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आम. वैभव नाईक, उपाध्यक्ष सुरेश दळवी, संचालक मंडळ अधिकारी आदी उपस्थित होते. सुरुवातीला बँकेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच गेल्या खरीप हंगामात जास्तीत जास्त भातविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना शाल, श्रीफळ, जांभूळ झाड देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी सतीश सावंत म्हणाले की, बँकेचे चांगले काम आणि चांगल्या योजना यामुळेच बँकेचा एनपीए शून्य टक्के राहण्यास मदत झाली आहे. बँकेच्या सभासदांना १०.६० टक्के लाभांश देणारी राज्यातील एकमेव बँक आहे. बँकेने यांत्रिकीकरणासाठी मदत केल्यानेच जिल्ह्यात भात शेतीक्षेत्र व उत्पादन वाढले आहे. ही बँक शेतकऱ्यांची असल्याने शेतकऱ्यांसाठी आणखी काही करता येईल का, यासाठी आपले प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार वैभव नाईक म्हणाले की, शेतकऱ्यांना फायदा होईल हे बँकेचे उद्दिष्ट आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळेच या बँकेने अनेक पुरस्कार मिळविले आहेत. छोट्या योजनांसाठी कर्ज पुरवठा बँकेने केल्याने यांत्रिकीकरण वाढून शेतकरी समृध्द झाला आहे. शेतकऱ्यांना सन्मान देण्याचे काम बँक करीत असून यापुढेही हे कार्य सुरू राहील.देर आये दुरुस्त आयेचांदा ते बांदा योजना चांगली होती. मात्र या योजनेची राष्ट्रीयीकृत बँकांनी योग्य प्रकारे अंमलबजावणी केली नाही. त्यावेळी जिल्हा बँक ही योजना आपल्याकडे मागत होती. मात्र त्यावेळी सतीश सावंत हे दुसऱ्या पक्षात होते. परंतु आता ते आमच्या पक्षात आहेत. चांदा ते बांदाऐवजी सिंधुरत्न योजना सुरू झाली आहे. देर आये दुरुस्त आये असे सांगत सिंधुरत्न योजनेत जिल्हा बँकेच्या माध्यमातून चांगले काम करण्याची आमदार दीपक केसरकर यांनी ग्वाही दिली. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रDeepak Kesarkarदीपक केसरकर Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्गSatish Sawantसतीश सावंत