शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

न्यायालयीन कोठडीत न जाण्यासाठीच दुखणे, सतीश सावंतांची नितेश राणेंवर टीका; ..मग समजेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 19:07 IST

मग त्यानंतर त्यांना समजेल कुणाचा बीपी वाढतो

कणकवली : संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांची सशर्त जामिनावर सुटका झाली आहे. अजून त्या दाव्याचा निकाल लागलेला नाही. मात्र, अशा परिस्थितीमध्ये त्यांचा कार्यकर्त्यांकडून स्वागताचा जो कार्यक्रम सुरू आहे तो सुसंस्कार संपत चालल्याचा एक भाग आहे. विकासाचा मुद्दा बाजूला ठेवत इतर मुद्यावरून राजकारण करायचे असे सत्र नितेश राणे यांनी सुरू केले आहे. अशी टीका सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केली आहे. 

नितेश राणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर ते आजारी पडले.  केवळ न्यायालयीन कोठडीत न जाण्यासाठीच त्यांचे दुखणे होते असी जळजळीत टीकाही त्यांनी यावेळी नितेश राणे यांच्यावर केली.कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नगरसेवक कन्हैया पारकर, सचिन सावंत, संतोष परब, रूपेश आमडोसकर व अन्य शिवसैनिक उपस्थित होते. 

सतीश सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय दृष्ट्या नेहमीच वैशिष्टपूर्ण राहिला आहे. पण अप्पासाहेब पटवर्धन यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तींच्या पदस्पर्शाने संस्कारित झालेल्या भूमीत घडत असलेल्या आताच्या राजकीय घटना पाहता समाजाच्या मानसिकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते.  खर तर जिल्ह्यातील सुसंस्कारित जनतेने आता जागे व्हायलाच हवे.  नाहीतर येथील आप्पासाहेब पटवर्धन, बॅ. नाथ पै , मधु दंडवते यांचे आदर्श नव्या पिढीला समजणार नाहीत. 

न्याय देवते समोर सगळे समान आहेत हे दिसून आलेले आहे. नितेश राणेंचा घडलेल्या चुकीच्या घटनेशी काहीही संबंध नसेल तर त्यांनी घाबरायचे काहीच कारण नाही. पण सिंधुदुर्गातील जनता सुज्ञ आहे. ती योग्य वेळी न्याय केल्याशिवाय राहणार नाही. विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. खून, मारामारी दहशतीने नाही. 

नारायण राणे यांना फक्त आपल्या कुटुंबाची काळजी आहे.  ते या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांच्या तब्बेतीची साधी चौकशी करण्याचे सौजन्य राणे यांनी दाखवले नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री असूनही जिल्ह्यातील जनतेची त्यांना काळजी नाही हे दिसून आले. ते लोकसेवक असते तर निश्चितपणे संतोष परब यांची विचारपूस करण्यासाठी  गेले असते.

तसेच निदान या घटनेने तरी नितेश राणे  सुधारतील असे आम्हाला वाटले होते. परंतु त्यांच्यात कोणतीच सुधारणा झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे . त्यामुळे नितेश राणे यांनी तोंड उघडावेच. मग त्यानंतर त्यांना समजेल कुणाचा बीपी वाढतो ते असेही सतीश सावंत यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे