शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

न्यायालयीन कोठडीत न जाण्यासाठीच दुखणे, सतीश सावंतांची नितेश राणेंवर टीका; ..मग समजेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 19:07 IST

मग त्यानंतर त्यांना समजेल कुणाचा बीपी वाढतो

कणकवली : संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांची सशर्त जामिनावर सुटका झाली आहे. अजून त्या दाव्याचा निकाल लागलेला नाही. मात्र, अशा परिस्थितीमध्ये त्यांचा कार्यकर्त्यांकडून स्वागताचा जो कार्यक्रम सुरू आहे तो सुसंस्कार संपत चालल्याचा एक भाग आहे. विकासाचा मुद्दा बाजूला ठेवत इतर मुद्यावरून राजकारण करायचे असे सत्र नितेश राणे यांनी सुरू केले आहे. अशी टीका सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केली आहे. 

नितेश राणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर ते आजारी पडले.  केवळ न्यायालयीन कोठडीत न जाण्यासाठीच त्यांचे दुखणे होते असी जळजळीत टीकाही त्यांनी यावेळी नितेश राणे यांच्यावर केली.कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नगरसेवक कन्हैया पारकर, सचिन सावंत, संतोष परब, रूपेश आमडोसकर व अन्य शिवसैनिक उपस्थित होते. 

सतीश सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय दृष्ट्या नेहमीच वैशिष्टपूर्ण राहिला आहे. पण अप्पासाहेब पटवर्धन यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तींच्या पदस्पर्शाने संस्कारित झालेल्या भूमीत घडत असलेल्या आताच्या राजकीय घटना पाहता समाजाच्या मानसिकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते.  खर तर जिल्ह्यातील सुसंस्कारित जनतेने आता जागे व्हायलाच हवे.  नाहीतर येथील आप्पासाहेब पटवर्धन, बॅ. नाथ पै , मधु दंडवते यांचे आदर्श नव्या पिढीला समजणार नाहीत. 

न्याय देवते समोर सगळे समान आहेत हे दिसून आलेले आहे. नितेश राणेंचा घडलेल्या चुकीच्या घटनेशी काहीही संबंध नसेल तर त्यांनी घाबरायचे काहीच कारण नाही. पण सिंधुदुर्गातील जनता सुज्ञ आहे. ती योग्य वेळी न्याय केल्याशिवाय राहणार नाही. विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. खून, मारामारी दहशतीने नाही. 

नारायण राणे यांना फक्त आपल्या कुटुंबाची काळजी आहे.  ते या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांच्या तब्बेतीची साधी चौकशी करण्याचे सौजन्य राणे यांनी दाखवले नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री असूनही जिल्ह्यातील जनतेची त्यांना काळजी नाही हे दिसून आले. ते लोकसेवक असते तर निश्चितपणे संतोष परब यांची विचारपूस करण्यासाठी  गेले असते.

तसेच निदान या घटनेने तरी नितेश राणे  सुधारतील असे आम्हाला वाटले होते. परंतु त्यांच्यात कोणतीच सुधारणा झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे . त्यामुळे नितेश राणे यांनी तोंड उघडावेच. मग त्यानंतर त्यांना समजेल कुणाचा बीपी वाढतो ते असेही सतीश सावंत यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे