शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टातून तार आली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, सिंधुदुर्गातील वीरपत्नी सरस्वती राजगे यांनी ऐकवली युद्धाची दाहकता

By अनंत खं.जाधव | Updated: May 10, 2025 18:04 IST

अनंत जाधव सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठरावीक गावे आहेत ज्या गावांना सैनिकी परंपरा लाभली आहे. त्यात प्रामुख्याने नाव ...

अनंत जाधवसावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठरावीक गावे आहेत ज्या गावांना सैनिकी परंपरा लाभली आहे. त्यात प्रामुख्याने नाव घ्यावे असे गाव म्हणजे कलंबिस्त. हे गाव निर्सगाच्या सान्निध्यात वसले असून, या गावातील अनेक मुले ही देशप्रेमाने भारावून जात सैन्यात भरती झाली होती. त्यातीलच एक नाव होतं बाबली राजगे यांचे. राजगे यांच्या कुटुंबात सैन्यात पूर्वी कोणी नव्हते. बाबली राजगे हे कुटुंबातील पहिलेच जे सैन्यात भरती झाले होते.

याच काळात म्हणजेच १९६५ मध्ये भारत-पाकिस्तानयुद्ध झाले आणि शत्रूच्या हल्ल्यात हवालदार बाबली राजगे हे शहीद झाले. पाकिस्ताननेभारतीय सैनिकांवर बॉम्बचा वर्षाव केला होता. त्यात बाबली राजगे हे शहीद झाले होते. विशेष म्हणजे शहीद राजगे यांचे पार्थिव घरी न आणता फक्त अंगावरील सैनिकी पोषाख घरी आणण्यात आला होता. यावरून १९६५ च्या युद्धाची भीषणता आजही आठवली तरी राजगे कुटुंबीयांचा कंठ दाटून येतो.शहीद राजगे यांच्या वीर पत्नी सरस्वती राजगे यांनी तर हा प्रसंग माझ्यासाठी आभाळ कोसळल्यासारखा होता, असे सांगितले. वयाच्या ९१ वर्षीही मला हा प्रसंग चांगला आठवतो. “तिकडे भारत-पाकिस्तान युद्ध सुरू आहे एवढंच माहीत होतं. पण, टीव्ही, मोबाइल नाही, पेपर नाही. त्यामुळे युद्ध थांबलं की सुरू आहे हे सांगायला पण कोणी येत नव्हतं. अशातच एके दिवशी दुपारच्या वेळी पोस्टातून तार आली आणि सर्व काही संपलं.”

त्यांना शेवटचं बघायलाही मिळालं नाहीमग पुढील दोन-चार दिवसांत त्यांचा पोशाख आला. पण, आम्हाला काही त्यांना शेवटचं बघायला मिळालं नाही. माझी मुलं लहान होती. एक पहिलीत होता तर मुलगी शाळेत जात नव्हती. अशा प्रसंगात ते दु:ख पचवत स्वत:ला सावरत उभे राहिलो आणि आज हे दिवस पाहतो आहोत. आमच्या घरात तसे पूर्वी सैन्यात कोणीही नव्हतं आणि आजही नाहीत. पण, त्यांना देशसेवेची आवड होती त्यातून ते पुढे पुढे गेले. आमचे शिक्षणही जेमतेम पण ते मागे हटले नाहीत. तेव्हा भारत-पाकिस्तानचे युद्ध मोठे झाले होते. त्याच अगोदर काही वर्षे ते सैन्यात भरती झाले होते, असे शहीद राजगे यांच्या पत्नी सरस्वती राजगे यांनी सांगितले.

मुलांच्या शिक्षणासाठी झटल्याआपले पती देशसेवेत शहीद झाले. तरी सरस्वती राजगे यांनी धीर सोडला नाही. मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटत राहिल्या हे विशेष आहे. मी शिकली नाही; पण, माझी दोन्ही मुले शिकली पाहिजेत, अशा त्या नेहमी म्हणत असत.

आठवणी ताज्याभारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या १९६५च्या लढाईनंतर तब्बल ६० वर्षांनी पुन्हा एकदा सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यानिमित्ताने वीर पत्नीने आपल्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गIndiaभारतPakistanपाकिस्तानwarयुद्ध