शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

पोस्टातून तार आली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, सिंधुदुर्गातील वीरपत्नी सरस्वती राजगे यांनी ऐकवली युद्धाची दाहकता

By अनंत खं.जाधव | Updated: May 10, 2025 18:04 IST

अनंत जाधव सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठरावीक गावे आहेत ज्या गावांना सैनिकी परंपरा लाभली आहे. त्यात प्रामुख्याने नाव ...

अनंत जाधवसावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठरावीक गावे आहेत ज्या गावांना सैनिकी परंपरा लाभली आहे. त्यात प्रामुख्याने नाव घ्यावे असे गाव म्हणजे कलंबिस्त. हे गाव निर्सगाच्या सान्निध्यात वसले असून, या गावातील अनेक मुले ही देशप्रेमाने भारावून जात सैन्यात भरती झाली होती. त्यातीलच एक नाव होतं बाबली राजगे यांचे. राजगे यांच्या कुटुंबात सैन्यात पूर्वी कोणी नव्हते. बाबली राजगे हे कुटुंबातील पहिलेच जे सैन्यात भरती झाले होते.

याच काळात म्हणजेच १९६५ मध्ये भारत-पाकिस्तानयुद्ध झाले आणि शत्रूच्या हल्ल्यात हवालदार बाबली राजगे हे शहीद झाले. पाकिस्ताननेभारतीय सैनिकांवर बॉम्बचा वर्षाव केला होता. त्यात बाबली राजगे हे शहीद झाले होते. विशेष म्हणजे शहीद राजगे यांचे पार्थिव घरी न आणता फक्त अंगावरील सैनिकी पोषाख घरी आणण्यात आला होता. यावरून १९६५ च्या युद्धाची भीषणता आजही आठवली तरी राजगे कुटुंबीयांचा कंठ दाटून येतो.शहीद राजगे यांच्या वीर पत्नी सरस्वती राजगे यांनी तर हा प्रसंग माझ्यासाठी आभाळ कोसळल्यासारखा होता, असे सांगितले. वयाच्या ९१ वर्षीही मला हा प्रसंग चांगला आठवतो. “तिकडे भारत-पाकिस्तान युद्ध सुरू आहे एवढंच माहीत होतं. पण, टीव्ही, मोबाइल नाही, पेपर नाही. त्यामुळे युद्ध थांबलं की सुरू आहे हे सांगायला पण कोणी येत नव्हतं. अशातच एके दिवशी दुपारच्या वेळी पोस्टातून तार आली आणि सर्व काही संपलं.”

त्यांना शेवटचं बघायलाही मिळालं नाहीमग पुढील दोन-चार दिवसांत त्यांचा पोशाख आला. पण, आम्हाला काही त्यांना शेवटचं बघायला मिळालं नाही. माझी मुलं लहान होती. एक पहिलीत होता तर मुलगी शाळेत जात नव्हती. अशा प्रसंगात ते दु:ख पचवत स्वत:ला सावरत उभे राहिलो आणि आज हे दिवस पाहतो आहोत. आमच्या घरात तसे पूर्वी सैन्यात कोणीही नव्हतं आणि आजही नाहीत. पण, त्यांना देशसेवेची आवड होती त्यातून ते पुढे पुढे गेले. आमचे शिक्षणही जेमतेम पण ते मागे हटले नाहीत. तेव्हा भारत-पाकिस्तानचे युद्ध मोठे झाले होते. त्याच अगोदर काही वर्षे ते सैन्यात भरती झाले होते, असे शहीद राजगे यांच्या पत्नी सरस्वती राजगे यांनी सांगितले.

मुलांच्या शिक्षणासाठी झटल्याआपले पती देशसेवेत शहीद झाले. तरी सरस्वती राजगे यांनी धीर सोडला नाही. मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटत राहिल्या हे विशेष आहे. मी शिकली नाही; पण, माझी दोन्ही मुले शिकली पाहिजेत, अशा त्या नेहमी म्हणत असत.

आठवणी ताज्याभारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या १९६५च्या लढाईनंतर तब्बल ६० वर्षांनी पुन्हा एकदा सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यानिमित्ताने वीर पत्नीने आपल्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गIndiaभारतPakistanपाकिस्तानwarयुद्ध