शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भगवा फडकला

By admin | Updated: October 19, 2014 22:25 IST

नारायण राणेंचा पराभव : शिवसेनेचे वैभव नाईक, दीपक केसरकर तर काँग्रेसचे नीतेश राणे विजयी

सिंधुदुर्गनगरी : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रचारप्रमुख तथा माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांना शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी तब्बल १० हजार ३७६ मतांनी पराभूत केले. १९९० पासून २०१४ पर्यंत सलग २५ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर राजकीयदृष्ट्या वर्चस्व गाजविणाऱ्या राणे यांना विजयात सातत्य राखण्यापासून नाईक यांनी रोखले आहे. वैभव नाईक यांना ७० हजार ५८२ तर नारायण राणे यांना ६० हजार २०६ मते मिळाली. तर सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर यांनी आपल्या सर्व विरोधकांना धूळ चारत तब्बल ४१ हजार १९२ मतांनी विजय मिळवत ही सावंतवाडीची जागाही शिवसेनेकडे खेचून आणली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ वर्षानंतर पुन्हा दोन आमदार आल्याने सिंधुदुर्गात भगवा डौलाने फडकला आहे.एकीकडे सावंतवाडी आणि कुडाळमध्ये शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व राखले असले तरी कणकवली मतदारसंघात भाजपाचे आमदार प्रमोद जठार यांचा २५ हजार ९७९ एवढ्या मोठ्या मताधिक्याने काँगे्रसच्या नीतेश राणे यांनी पराभव करीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसतर्फे एकमेव आमदार होण्याची संधी मिळवली आहे.१९९० पासून सलग सहावेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या आणि मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारलेल्या नारायण राणे यांची विजयी घोडदौड शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी रोखली आहे. या पराभवानंतर नारायण राणे आता राजकारणात कोणती भूमिका घेतात? याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कासार्डे येथे प्रचार सभा होऊनदेखील भाजपाचे एकमेव आमदार असलेल्या प्रमोद जठार यांचा पराभव झाल्याने सिंधुदुर्गात मोदी लाटेचा कोणताही प्रभाव दिसून आला नाही. मतदारसंघ एकत्रित असताना युतीची राजवट वगळता देवगड मतदारसंघ कायमच विरोधी पक्षात राहिला होता. या निवडणुकीतदेखील कणकवली मतदारसंघ पर्यायाने देवगड तालुका काँग्रेसच्या रूपाने विरोधी पक्षात राहणार आहे. मात्र, नारायण राणे यांना विरोध म्हणून कुडाळ आणि सावंतवाडी मतदारसंघाने शिवसेनेच्या पदरी घवघवीत यश टाकले आहे. त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन जागांपैकी दोन जागा शिवसेना तर एक जागा काँग्रेसकडे आली आहे. गत निवडणुकीप्रमाणेच तीनपैकी एका जागेवरच काँग्रेसला समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे नारायण राणेंची राजकीय इनिंग संपून नीतेश राणेंच्या इनिंगला सुरूवात झाली आहे. (प्रतिनिधी)कोणत्या कारणामुळेपक्ष जिंकलाशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थ साथीमुळे वैभव नाईक आणि दीपक केसरकर यांनी कुडाळ आणि सावंतवाडी मतदारसंघात कार्यकर्त्यांना हाताशी धरून घवघवीत यश संपादन केले.नारायण राणे यांना विरोध तसेच काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांबाबतची नाराजी, जनसंपर्क कमी ठेऊन ग्रामीण भागात विकासकामांबाबत असलेल्या नाराजीचा फटका काँग्रेसला या निवडणुकीत बसल्याने नारायण राणेंसारख्या नेत्याचा पराभव झाला.वैभव नाईक यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीसाठी विशेष प्रयत्न केले. तसेच विविध आंदोलनांद्वारे आघाडी सरकारबाबत लोकांच्या मनात असलेल्या खदखदीला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच ते या खेळीत यशस्वी झाले.ठळक वैशिष्ट्येराज्याचे माजी उद्योगमंत्री नारायण राणे विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पराभूत झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कासार्डे येथे प्रचारसभा घेऊनही प्रमोद जठार निवडून येऊ शकले नाहीत.दीपक केसरकर यांनी सर्व विरोधी उमेदवारांना पराभवाची धूळ चारत तब्बल ४१ हजार १९२ मतांनी विजय संपादन केला.