शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

करूळ-गगनबावडा घाटाच्या कामात सुरक्षितता महत्त्वाची - मंत्री नितेश राणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 14:12 IST

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणीनंतर अधिकृत एकमार्गी रस्ता सुरू होईल

कणकवली : करूळ-गगनबावडा घाट मार्गाची दि. २८ डिसेंबरला महामार्ग प्राधिकरण व अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत एकत्रित पाहणी केली. त्याचवेळी रस्त्याचे काम दर्जेदार असले पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेशी तडजोड होता कामा नये, ही आमची सर्वांची भूमिका होती. त्यानुसार माझ्याकडे संबंधित विभागाचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तीन त्रुटी दर्शविण्यात आलेल्या आहेत. हा क्वालिटी कंट्रोलचा अहवाल मी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार आहे, त्यानुसार जिल्हाधिकारी स्वत: पाहणी करून त्रुटींची पूर्तता करून घेत काही दिवसातच जनतेची सुरक्षा पाहून त्या घाटातून एकमार्गी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतील. मात्र, विरोधकांनी माझ्या विरोधातील वैयक्तिक हिशोब चुकता करण्यासाठी राजकारण करू नये, असा टोला मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी लगावला आहे.कणकवली येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश सावंत उपस्थित होते. मंत्री नितेश राणे म्हणाले, लोकशाहीत मला जशी जनतेची सेवा करायची आहे. तशीच विरोधकदेखील जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करत आहेत. जर जनतेचा फायदा होत असेल तर ते स्वागतार्ह आहे. करूळ घाटा संदर्भात ज्या ज्या जनतेच्या सूचना आल्या. त्यानुसार काम केले जात आहे.

अहवालात प्रमुख तीन त्रुटींचा उल्लेख

  • या मार्गावरून होणारी वाहतूक लक्षात घेता सर्वसामान्यांनी सुरक्षेसाठी काम केले पाहिजे.
  • ज्या ठिकाणी डोंगराकडील बाजू ठेकेदारांनी रुंदीकरणासाठी तोडली आहे, त्या ठिकाणी असलेली दगड, माती हटविली पाहिजे.
  • अवघड वळणावर वाहनांच्या सुरक्षितेसाठी संरक्षक भिंत बांधण्याची आवश्यकता आहे.

महामार्गाच्या अभियंत्यांनी स्वत: पाहणी करून दिला अहवालते पुढे म्हणाले, करूळ-गगनबावडा रस्त्याच्या कामाबाबत क्वॉलिटी कंट्रोलकडून अहवालाची मी स्वतः मागणी केली होती. त्यात त्या ठेकेदाराने काम चांगले केले आहे का? याबाबत तो अहवाल हातात आला तर आम्ही निर्णय घेऊ शकणार होतो. महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी संतोष शेलार यांनी स्वतः घाट रस्त्याची पाहणी केली. त्यांनी रस्त्याचे काम पाहून त्यानुसार एक अहवाल दिलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे हा पाठविला जाईल.

विरोधकांसाठी मिनी बस पाठवितोविरोधकांनी धोका पत्कारून प्रवास करण्यापेक्षा आपण सर्वांनी एकत्रित प्रवास करुया. हा रस्ता सुरू करत असताना पाहिजे तर विरोधकांसाठी मिनी बस पाठवितो. विरोधकांनी त्यातून चांगल्या कामासाठी मतभेद बाजूला ठेवून नागरिक म्हणून आमच्या सोबत प्रवास करावा, असेही मिश्किलपणे मंत्री राणे यांनी सांगितले.

जलवाहतुकीसाठी प्रयत्न करणार !जिल्ह्यातील बंदरांच्या माध्यमातून समुद्रमार्गे जलवाहतूक व्हावी यासाठी सर्वोतोपरी माहिती घेतली जाईल. आवश्यक यंत्रणा व इतर बाबींची पूर्तता केल्यानंतर निश्चितपणे जलवाहतूक सुरू होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे kolhapurकोल्हापूर