शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

करूळ-गगनबावडा घाटाच्या कामात सुरक्षितता महत्त्वाची - मंत्री नितेश राणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 14:12 IST

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणीनंतर अधिकृत एकमार्गी रस्ता सुरू होईल

कणकवली : करूळ-गगनबावडा घाट मार्गाची दि. २८ डिसेंबरला महामार्ग प्राधिकरण व अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत एकत्रित पाहणी केली. त्याचवेळी रस्त्याचे काम दर्जेदार असले पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेशी तडजोड होता कामा नये, ही आमची सर्वांची भूमिका होती. त्यानुसार माझ्याकडे संबंधित विभागाचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तीन त्रुटी दर्शविण्यात आलेल्या आहेत. हा क्वालिटी कंट्रोलचा अहवाल मी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार आहे, त्यानुसार जिल्हाधिकारी स्वत: पाहणी करून त्रुटींची पूर्तता करून घेत काही दिवसातच जनतेची सुरक्षा पाहून त्या घाटातून एकमार्गी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतील. मात्र, विरोधकांनी माझ्या विरोधातील वैयक्तिक हिशोब चुकता करण्यासाठी राजकारण करू नये, असा टोला मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी लगावला आहे.कणकवली येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश सावंत उपस्थित होते. मंत्री नितेश राणे म्हणाले, लोकशाहीत मला जशी जनतेची सेवा करायची आहे. तशीच विरोधकदेखील जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करत आहेत. जर जनतेचा फायदा होत असेल तर ते स्वागतार्ह आहे. करूळ घाटा संदर्भात ज्या ज्या जनतेच्या सूचना आल्या. त्यानुसार काम केले जात आहे.

अहवालात प्रमुख तीन त्रुटींचा उल्लेख

  • या मार्गावरून होणारी वाहतूक लक्षात घेता सर्वसामान्यांनी सुरक्षेसाठी काम केले पाहिजे.
  • ज्या ठिकाणी डोंगराकडील बाजू ठेकेदारांनी रुंदीकरणासाठी तोडली आहे, त्या ठिकाणी असलेली दगड, माती हटविली पाहिजे.
  • अवघड वळणावर वाहनांच्या सुरक्षितेसाठी संरक्षक भिंत बांधण्याची आवश्यकता आहे.

महामार्गाच्या अभियंत्यांनी स्वत: पाहणी करून दिला अहवालते पुढे म्हणाले, करूळ-गगनबावडा रस्त्याच्या कामाबाबत क्वॉलिटी कंट्रोलकडून अहवालाची मी स्वतः मागणी केली होती. त्यात त्या ठेकेदाराने काम चांगले केले आहे का? याबाबत तो अहवाल हातात आला तर आम्ही निर्णय घेऊ शकणार होतो. महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी संतोष शेलार यांनी स्वतः घाट रस्त्याची पाहणी केली. त्यांनी रस्त्याचे काम पाहून त्यानुसार एक अहवाल दिलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे हा पाठविला जाईल.

विरोधकांसाठी मिनी बस पाठवितोविरोधकांनी धोका पत्कारून प्रवास करण्यापेक्षा आपण सर्वांनी एकत्रित प्रवास करुया. हा रस्ता सुरू करत असताना पाहिजे तर विरोधकांसाठी मिनी बस पाठवितो. विरोधकांनी त्यातून चांगल्या कामासाठी मतभेद बाजूला ठेवून नागरिक म्हणून आमच्या सोबत प्रवास करावा, असेही मिश्किलपणे मंत्री राणे यांनी सांगितले.

जलवाहतुकीसाठी प्रयत्न करणार !जिल्ह्यातील बंदरांच्या माध्यमातून समुद्रमार्गे जलवाहतूक व्हावी यासाठी सर्वोतोपरी माहिती घेतली जाईल. आवश्यक यंत्रणा व इतर बाबींची पूर्तता केल्यानंतर निश्चितपणे जलवाहतूक सुरू होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे kolhapurकोल्हापूर