शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी साहेब..कोकणातील रस्ता कोकणी माणसामुळे नव्हे तर प्रशासनामुळे रखडला, परशुराम उपरकरांचा टोला

By सुधीर राणे | Updated: August 9, 2023 16:19 IST

पहिल्यांदा या रस्त्यावरुन गाडीने फिरा, मग सत्य समजेल

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी या रखडलेल्या कामासाठी कोकणी माणूस जबाबदार असल्याचे म्हटले आहे, हे चुकीचे आहे. कोकणी माणसाला त्यांनी बदनाम करु नये. पहिल्यांदा या रस्त्यावरुन गाडीतून फिरावे, मग त्यांना सत्य परिस्थिती समजेल. 'गडकरी साहेब..कोकणातील रस्ता कोकणी माणसामुळे नव्हे तर प्रशासनामुळे रखडला आहे', असा टोला मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालय येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उपरकर म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाविषयी केंद्रीय मंत्री गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये कोकणातील माणसांमुळे या महामार्गाचे काम रखडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, ते काम रखडण्यास ठेकेदार आणि प्रशासन जबाबदार आहे. गडकरी हे चांगले काम करतात. त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. मात्र, त्यांनी विनाकारण कोकणी माणसाला दोष देऊ नये. ते आता पुस्तक लिहिणार आहेत. त्यात महामार्ग उभारताना प्रशासनाकडून कशा चुका झाल्या याबाबतही त्यांनी लिहावे.कोकण रेल्वेसाठी विना आंदोलन येथील जनतेने जागा दिली. मग फक्त मुंबई-गोवा महामार्ग भूसंपादन करतानाच त्रास का झाला? याचा विचार त्यांनी करावा. गडकरी यांनी सध्या काम पूर्ण झालेल्या महामार्गावरून एकदा गाडीने फिरावे, त्यांना नक्कीच खरी स्थिती समजेल. त्यानंतर त्यांनी पुणे- बेंगलोर रस्त्याने गाडीने फिरावे. दोन्ही रस्त्यांच्या बांधकामातील फरक त्यांच्या लक्षात येईल. या महामार्गावरील बारा पूल बांधण्याचे काम ज्या ठेकेदाराला दिले त्याचा पूर्ण इतिहास तपासला गेला नाही त्यामुळे ते काम रखडले.दिलीप बिल्डकॉनने कणकवली येथे बांधलेला बॉक्सेल कोसळला. तसेच अनेक ठिकाणी महामार्गावर तडे गेले. काही ठिकाणी खड्डे पडले. त्यामुळे कोकणातील नागरिक कंटाळल्याने न्यायालयात गेले. वेळप्रसंगी आंदोलने केली त्याचा दोष नागरिकांना देऊ नये. महामार्ग कामाची पाहणी केली तर कणकवलीतील उड्डाणपुलावरील धबधबे आणि खड्डे दिसतील. त्यामुळे गडकरी यांनी कोकणी माणसाबद्दल बोलू नये. समृध्दी महामार्ग ज्या गतीने केला, त्या धर्तीवर हा रस्ता केला पाहिजे होता. मात्र,तसे झाले नाही असेही उपरकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्गkonkanकोकणNitin Gadkariनितीन गडकरीParshuram Upkarपरशुराम उपरकर