शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

कोकण विद्यापीठ निर्मितीची कार्यवाही न केल्यास रस्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 11:34 IST

कोकणातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र कोकण विद्यापीठ सुरू करण्यात यावे.अशी मागणी कोकणवासीयांनी सातत्याने केली आहे. मात्र, अजूनही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे येत्या दोन महिन्यात कोकण विद्यापीठ निर्मितीची कार्यवाही करण्यात आली नाही तर मुंबई - गोवा महामार्गावर ठिकठिकाणी विद्यार्थी, पालकांसह रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल .असा इशारा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे स्वतंत्र कोकण राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देकोकण विद्यापीठ निर्मितीची कार्यवाही न केल्यास रस्ता रोको आंदोलनस्वतंत्र कोकण राज्य संघटनेचा इशारा ; मुख्यमंत्र्यांना निवेदन

कणकवली : कोकणातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र कोकण विद्यापीठ सुरू करण्यात यावे.अशी मागणी कोकणवासीयांनी सातत्याने केली आहे. मात्र, अजूनही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे येत्या दोन महिन्यात कोकण विद्यापीठ निर्मितीची कार्यवाही करण्यात आली नाही तर मुंबई - गोवा महामार्गावर ठिकठिकाणी विद्यार्थी, पालकांसह रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल .असा इशारा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे स्वतंत्र कोकण राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी दिला आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी कणकवली प्रांताधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील महाविद्यालयांना भेटी दिल्या आहेत. तसेच प्राचार्य, प्राध्यापक , विद्यार्थी यांच्या संयुक्त सभाही घेतल्या आहेत. यावेळी स्वतंत्र कोकण विद्यापीठ झालेच पाहिजे .अशी मागणी आमच्याकडे सर्वांनी केली आहे. याबाबत प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदने पाठविली आहेत.गेल्या विधानसभा अधिवेशनाच्यावेळी लोकप्रतिनिधींनी या विद्यापीठाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी शिक्षणमंत्र्यांनी रत्नागिरी येथे स्वतंत्र कोकण विद्यापीठ सुरू करण्यास आपण सकारात्मक असल्याचे सांगितले होते. मात्र, पुढील कार्यवाही अद्याप झालेली नाही.विदर्भ, कोकण, मराठवाडा, प. महाराष्ट्र हे महाराष्ट्राचे चार प्रादेशिक विभाग आहेत. कोकण सोडून प्रत्येक विभागात विद्यापीठे आहेत. परंतु कोकण विभागात एकही विद्यापीठ नाही. हा कोकणावर अन्याय आहे.कोकण महसूल विभागात मुंबई विद्यापीठ आहे. पण ते भारतीय विद्यापीठ झाले आहे. त्यात देशातील आणि विदेशातील लाखो विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे कोकणी विद्यार्थी दुर्लक्षित होतो.शैक्षणिक दर्जाबरोबरच वेळच्या वेळी परीक्षा घेऊन त्यांचा योग्य वेळी निकाल लावणे. उच्च शैक्षणिक दर्जा ठेवणे व संशोधन करणे ह्या तिन्ही गोष्टीत मुंबई विद्यापीठाला अपयश आले आहे. कोकणला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. सर्वच जैवविविधता आहे. मात्र, संशोधनाच्या नावाखाली बोंब आहे.गुणवत्तेच्या दृष्टीने जगातील पहिल्या २०० विद्यापीठात भारतातील एकाही विद्यापीठाचे नाव नाही. भारतातील गुणवत्ताधारक विद्यापीठात सातवा नंबर पुणे विद्यापीठाचा आहे. तर मुंबई विद्यापीठ पहिल्या १०० विद्यापीठातही नाही. ही शर्मेची गोष्ट आहे. त्यामुळे कोकण विद्यापीठ झाल्याने उत्तम शैक्षणिक दर्जा निर्माण होईल . कोकणातील साधन संपत्तीवर आधारित रोजगाराभिमुख नवीन अभ्यासक्रम सुरू करता येतील. संशोधनाला गती येईल तसेच विद्यार्थी, पालक, प्राध्यापक , प्राचार्यांचा वेळ व पैसा वाचेल.आज कोकण बोर्डाचे महाराष्ट्रात दरवर्षी एस. एस. सी. ,एच. एस. सी.चे निकाल प्रथम क्रमांकाचे असतात. कारण कोकणी विद्यार्थी बुद्धिमान व प्रतिभावंत आहेत. कोकण विद्यापीठ झाल्यानंतर जगातील प्रथम २०० विद्यापीठात त्याचा वरचा क्रमांक असेल . सिंधुदुर्ग व रत्नागिरीत विद्यापीठाची केवळ उपकेंद्रे सक्षम करून ती विद्यापीठाची जागा घेऊ शकणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर कोकण विद्यापीठ निर्मितीची कार्यवाही सुरू करावी . असेही या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग