शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

नदीपात्रातील भरावामुळे पाणी भरण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 18:25 IST

महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना ठेकेदार कंपनीने जानवली पुलाजवळ नदीपात्रात मातीचा भराव केला आहे. सध्या जोरदार पडणाऱ्या पावसामुळे नदीपात्रातील पाणी वाढत आहे. यापुढेही पावसाचा जोर कायम राहिल्यास कलमठ महाजनीनगरमध्ये पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देनदीपात्रातील भरावामुळे पाणी भरण्याचा धोकाकलमठ महाजनीनगरमधील रहिवासी चिंतातूर

कणकवली : महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना ठेकेदार कंपनीने जानवली पुलाजवळ नदीपात्रात मातीचा भराव केला आहे. सध्या जोरदार पडणाऱ्या पावसामुळे नदीपात्रातील पाणी वाढत आहे. यापुढेही पावसाचा जोर कायम राहिल्यास कलमठ महाजनीनगरमध्ये पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.कणकवली तालुक्यात पावसाने जोर केला आहे. त्यामुळे नदी, नाले यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. जानवली नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यातच महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत जानवली नदीवर पूल बांधण्यात येत आहे. त्यासाठी नदीपात्रात ठेकेदार कंपनीने मातीचा भराव केला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी बाहेर पडणार असून ते कलमठ महाजनीनगरमध्ये घुसण्याची दाट शक्यता मंगळवारी सायंकाळी निर्माण झाली होती.त्यामुळे त्या परिसरातील रहिवासी चिंतातूर झाले होते. दरम्यान, याबाबत माहिती समजताच तहसीलदार रमेश पवार, मंडळ अधिकारी दिलीप पाटील, नागावकर यांनी जानवली पुलाजवळ जाऊन पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री, ऋषिकेश कोरडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.जानवली पुलाच्या कामाबाबत खबरदारी आवश्यकजानवली पुलाचे सध्या काम सुरू असून अर्धा स्लॅब घालण्यात आला आहे. हा स्लॅब घालताना त्याला देण्यात आलेले ह्यसपोर्टह्ण पावसाच्या पाण्यामुळे हलले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्या कामाची तांत्रिकदृष्ट्या पाहणी करूनच पुढील काम करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :Rainपाऊसhighwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग