शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

भातशेतीला करपाचा विळखा, नव्या संकटाने शेतकरी हवालदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 14:53 IST

सध्या ऊन, पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कनेडी परिसरातील गावांमधील भातशेतीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. काही ठिकाणी शेतीला करपा रोगाने ग्रासले आहे. या नव्या संकटाने शेतकरी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देभातशेतीला करपाचा विळखा, नव्या संकटाने शेतकरी हवालदीलऊन पावसाच्या खेळाने विविध रोगांचा प्रादुर्भाव

कनेडी (सिंधुदुर्ग) : सध्या ऊन, पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कनेडी परिसरातील गावांमधील भातशेतीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. काही ठिकाणी शेतीला करपा रोगाने ग्रासले आहे. या नव्या संकटाने शेतकरी संकटात सापडला आहे.जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो एकर भातशेती पूर्णपणे कुजली आहे. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीतील भातशेती अजूनही सुस्थितीत होती. मात्र, अतिवृष्टी आणि ऊन-पावसाच्या खेळामुळे शेतीला विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. काही भागातील भातशेतीवर निळे भुंगेरेंचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. येथील शेती सुरूवातीला लालसर होऊन नंतर करपल्यासारखी दिसत आहे. तर काही भागात करपा, शेंडा करपा, कडा करप्याचा प्रादुर्भाव दिसत आहे.सह्याद्रीच्या पट्ट्यातील नाटळ, दिगवळे, कुंभवडे, दारिस्ते, भिरवंडे, सांगवे, शिवडाव, हरकुळ, कुपवडे, जांभवडे, घोडगे या गावांमध्ये भातशेतीवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या कडक ऊन व पावसाचे कमी झालेले प्रमाण यामुळे अशा प्रकारचे रोग शेतीवर पडत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.कोकणातील शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. सुरूवातीला अतिपावसामुळे भातशेती कुजून व वाहून गेली. नंतर वन्यप्राण्यांनी काही ठिकाणची भातशेती फस्त केली आहे. याचा फटका सह्याद्रीच्या पट्ट्यातील गावांना बसला असून, जंगलापासून जवळच असलेली भातशेती वन्यप्राण्यांनी फस्त केली आहे.शासनाने कायमस्वरूपी तोडगा काढावागवा, सांबर, डुक्कर, माकडे यामुळे दरवर्षी येथील शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. यावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. त्यातच आता पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मानसिकता नकारार्थी होण्याची भीती बुजूर्ग शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. शासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

टॅग्स :floodपूरsindhudurgसिंधुदुर्ग