शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

स्वाभिमानच्या केणींनी स्वत:ची पात्रता ओळखावी, हरी खोबरेकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:25 IST

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मच्छीमारांचे प्रश्नच माहिती नाही. त्यामुळे मच्छीमार तसेच मच्छीमार संस्थानी आमदार वैभव नाईक यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी हे बालिश तालुकाध्यक्ष असल्याचे वाळू व्यावसायिकांनी म्हटले असल्याने केणी यांनी स्वत:ची पात्रता ओळखावी, अशी टीका शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली.

ठळक मुद्देस्वाभिमानच्या केणींनी स्वत:ची पात्रता ओळखावी, हरी खोबरेकर यांची टीकाटीकेला उत्तर देण्यापेक्षा शिवसेना विकासाला प्राधान्य देते

मालवण : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मच्छीमारांचे प्रश्नच माहिती नाही. त्यामुळे मच्छीमार तसेच मच्छीमार संस्थानी आमदार वैभव नाईक यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी हे बालिश तालुकाध्यक्ष असल्याचे वाळू व्यावसायिकांनी म्हटले असल्याने केणी यांनी स्वत:ची पात्रता ओळखावी, अशी टीका शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली.मालवण येथील शिवसेना तालुका कार्यालयात तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मंदार केणी यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, संमेश परब, यशवंत गावकर, अक्षय रेवंडकर, श्रेयस रेवंडकर, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील वाळू प्रश्न हा सत्ताधारी आमदार, खासदार व पालकमंत्री यांच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. याबाबत वाळू व्यावसायिकांनीच पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करत वाळू व्यवसायिकांमधील समन्वयाच्या अभावामुळे वाळू लिलाव प्रक्रिया रखडली असल्याचे जाहीर केले आहे. वाळू प्रक्रिया रखडल्याने मंदार केणी यांची रोजीरोटी बंद झाल्याने दिशाभूल करणारी वक्तव्ये करत आहे. आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा विकासकामाना प्राधान्य देतो, असे खोबरेकर म्हणाले.शिवसेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात खऱ्या अथार्ने विकासाची गंगा आली आहे. वीज, रस्ता तसेच मूलभूत सोयी-सुविधांसाठी भरघोस निधी शासनाकडून मिळत आहे. विरोधकांकडे काहीच मुद्दे नसल्याने सत्ताधाऱ्यांवर टीका करून जनतेची दिशाभूल करत आहे. मात्र जिल्ह्यातील जनता सुज्ञ असून आगामी काळ हा शिवसेनेचाच असेल. त्यामुळे केणी यांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा स्वत:च्या पक्षाची चिंता करावी, असा टोला खोबरेकर यांनी लगावला.

केणींना प्रभागाचाही अभ्यास नाहीचांदा ते बांदा योजना फसवी असल्याचे स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी हे सांगत आहे. मात्र केणी यांच्याच धुरीवाडा प्रभागातील मच्छीमारांना आऊटबोट इंजिन चांदा ते बांदा योजनेतून देण्यात आले. केणी यांच्या प्रभागात अनेक विकासकामे शिवसनेनेच्या माध्यमातून मार्गी लागत आहे.

स्वत:च्या प्रभागाचा अभ्यास नसलेल्या केणी यांनी तालुकाध्यक्ष म्हणून आपले तालुक्यासाठी काय योगदान आहे? हे तपासून पाहावे, असे आव्हान बाबी जोगी यांनी दिले. पतंग महोत्सव हा पर्यटनाला चालना देण्यासाठी राबविण्यात आला. शहरातील किनारपट्टीचा प्रसार व पर्यटन वाढीच्या दृष्टीने आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पतंग महोत्सव घेतला गेला, असे खोबरेकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग