शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

स्वाभिमानच्या केणींनी स्वत:ची पात्रता ओळखावी, हरी खोबरेकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:25 IST

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मच्छीमारांचे प्रश्नच माहिती नाही. त्यामुळे मच्छीमार तसेच मच्छीमार संस्थानी आमदार वैभव नाईक यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी हे बालिश तालुकाध्यक्ष असल्याचे वाळू व्यावसायिकांनी म्हटले असल्याने केणी यांनी स्वत:ची पात्रता ओळखावी, अशी टीका शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली.

ठळक मुद्देस्वाभिमानच्या केणींनी स्वत:ची पात्रता ओळखावी, हरी खोबरेकर यांची टीकाटीकेला उत्तर देण्यापेक्षा शिवसेना विकासाला प्राधान्य देते

मालवण : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मच्छीमारांचे प्रश्नच माहिती नाही. त्यामुळे मच्छीमार तसेच मच्छीमार संस्थानी आमदार वैभव नाईक यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी हे बालिश तालुकाध्यक्ष असल्याचे वाळू व्यावसायिकांनी म्हटले असल्याने केणी यांनी स्वत:ची पात्रता ओळखावी, अशी टीका शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली.मालवण येथील शिवसेना तालुका कार्यालयात तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मंदार केणी यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, संमेश परब, यशवंत गावकर, अक्षय रेवंडकर, श्रेयस रेवंडकर, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील वाळू प्रश्न हा सत्ताधारी आमदार, खासदार व पालकमंत्री यांच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. याबाबत वाळू व्यावसायिकांनीच पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करत वाळू व्यवसायिकांमधील समन्वयाच्या अभावामुळे वाळू लिलाव प्रक्रिया रखडली असल्याचे जाहीर केले आहे. वाळू प्रक्रिया रखडल्याने मंदार केणी यांची रोजीरोटी बंद झाल्याने दिशाभूल करणारी वक्तव्ये करत आहे. आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा विकासकामाना प्राधान्य देतो, असे खोबरेकर म्हणाले.शिवसेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात खऱ्या अथार्ने विकासाची गंगा आली आहे. वीज, रस्ता तसेच मूलभूत सोयी-सुविधांसाठी भरघोस निधी शासनाकडून मिळत आहे. विरोधकांकडे काहीच मुद्दे नसल्याने सत्ताधाऱ्यांवर टीका करून जनतेची दिशाभूल करत आहे. मात्र जिल्ह्यातील जनता सुज्ञ असून आगामी काळ हा शिवसेनेचाच असेल. त्यामुळे केणी यांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा स्वत:च्या पक्षाची चिंता करावी, असा टोला खोबरेकर यांनी लगावला.

केणींना प्रभागाचाही अभ्यास नाहीचांदा ते बांदा योजना फसवी असल्याचे स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी हे सांगत आहे. मात्र केणी यांच्याच धुरीवाडा प्रभागातील मच्छीमारांना आऊटबोट इंजिन चांदा ते बांदा योजनेतून देण्यात आले. केणी यांच्या प्रभागात अनेक विकासकामे शिवसनेनेच्या माध्यमातून मार्गी लागत आहे.

स्वत:च्या प्रभागाचा अभ्यास नसलेल्या केणी यांनी तालुकाध्यक्ष म्हणून आपले तालुक्यासाठी काय योगदान आहे? हे तपासून पाहावे, असे आव्हान बाबी जोगी यांनी दिले. पतंग महोत्सव हा पर्यटनाला चालना देण्यासाठी राबविण्यात आला. शहरातील किनारपट्टीचा प्रसार व पर्यटन वाढीच्या दृष्टीने आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पतंग महोत्सव घेतला गेला, असे खोबरेकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग