शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

मतदारांनी नाकारल्याचे आतातरी राणे यांनी मान्य करावे ! -वैभव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 15:43 IST

राणेंना मतदारांनी नाकारले असल्याने आगामी निवडणुकीत त्यांचा  कोणताही पक्ष आणि चिन्ह असले तरी  पराभव अटळ आहे. आमचा  पक्ष आणि चिन्ह नवीन होते.असे ते म्हणत आहेत. मात्र,  २०१४ मध्ये 'हात ' या निशाणीचा शेकडो वर्षे जुना पक्ष असतानाही

ठळक मुद्देकणकवली मतदारसंघात त्यांनी खोटी आश्‍वासने दिली आहेत पराभूत मुलाची समजूत घालण्यासाठी नारायण राणे लोकसभा निवडणुक निकालावर  हेराफेरीचा आरोप करीत आहेत

कणकवली : राणेंना मतदारांनी नाकारले असल्याने आगामी निवडणुकीत त्यांचा  कोणताही पक्ष आणि चिन्ह असले तरी  पराभव अटळ आहे. आमचा  पक्ष आणि चिन्ह नवीन होते.असे ते म्हणत आहेत. मात्र,  २०१४ मध्ये 'हात ' या निशाणीचा शेकडो वर्षे जुना पक्ष असतानाही निलेश राणे यांचा पराभव झाल्याचा आमदार नितेश राणे यांना विसर पडला आहे. असे सांगतानाच मतदारांनी नाकारल्याचे आतातरी राणे यांनी मान्य करावे . असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख  आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.

        कणकवली येथील विजय भवन मध्ये  शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले,सिंधुदुर्गातील मतदारांनीही विनायक राऊत यांना भरघोस मतदान केले आहे. भाजपाने प्रामाणिक साथ  दिल्याने हा विजय सोपा झाला.त्यामुळे भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आम्ही मनापासुन आभार मानतो. खासदार आणि शिवसेना सचिव म्हणून विनायक राऊत यांची उज्ज्वल कारकीर्द असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांना केंद्रीयमंत्री पदाची  संधी देतील असा विश्‍वास आमदार नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.         ते पुढे म्हणाले, आगामी निवडणुकीत कोणताही पक्ष आणि चिन्ह घेतले तरी नारायण  राणेंचा पराभव अटळ आहे. लोक राणेना कंटाळले आहेत. राणेंच्या कार्यकर्त्याना मते मिळतात, ते निवडणुका जिंकतात मग राणेंचा पराभव का होतो याचे आत्मचिंतन  आमदार नितेश राणे यांनी करावे . आमदार नितेश राणे यांच्या खोट्या योजनांचा मतदारांनी पर्दाफाश  केला आहे. कणकवली मतदारसंघात त्यांनी खोटी आश्‍वासने दिली आहेत. त्यांच्या सर्व योजना बंद झाल्या आहेत. त्यांच्या या खोट्या आश्‍वासनामुळेच  त्यांचे कणकवलीतील मताधिक्य घटले आहे.  विधानसभेला कणकवली मतदारसंघातही युतीचा आमदार विजयी होणार असुन आगामी काळात अनेक पक्षातील नेते सेना-भाजपात सामील होतील. केंद्रानंतर राज्यातही  सेना-भाजपाचेच सरकार येणार असुन स्वाभिमान या सिंधुदुर्गातील प्रायव्हेट लिमिटेड पक्षातील असंतुष्ट पदाधिकार्‍यांनी पक्षाबाबत वेळीच निर्णय घ्यावा आणि मुख्य प्रवाहात यावे.         पराभूत मुलाची समजूत घालण्यासाठी नारायण राणे लोकसभा निवडणुक निकालावर  हेराफेरीचा आरोप करीत आहेत . त्यांना लोकांनी नाकारल्याचे आता तरी राणे यांनी मान्य करावे. चार वेळा पराभव पत्करावा लागलेल्या राणे यांना मनातुन पराभव मान्य असेल परंतु मुलाची समजुत काढण्यासाठी ते हेराफेेरीचा आरोप करीत असल्याचे आमदार वैमव नाईक यावेळी  म्हणाले.

विनायक राऊत हेे केंद्रात मंत्री असतील  !

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील मतदारांनी शिवसेनेचे विनायक राऊत यांना चांगले मताधिक्य मिळवून दिले आहे.विधानसभेतही आमची घौडदौड अशीच सुरू राहणार आहे. तसेच विनायक राऊत हे निश्‍चितपणे केंद्रात मंत्री असणार आहेत. असेही वैभव नाईक यावेळी म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालsindhudurgसिंधुदुर्ग