शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मतदारांनी नाकारल्याचे आतातरी राणे यांनी मान्य करावे ! -वैभव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 15:43 IST

राणेंना मतदारांनी नाकारले असल्याने आगामी निवडणुकीत त्यांचा  कोणताही पक्ष आणि चिन्ह असले तरी  पराभव अटळ आहे. आमचा  पक्ष आणि चिन्ह नवीन होते.असे ते म्हणत आहेत. मात्र,  २०१४ मध्ये 'हात ' या निशाणीचा शेकडो वर्षे जुना पक्ष असतानाही

ठळक मुद्देकणकवली मतदारसंघात त्यांनी खोटी आश्‍वासने दिली आहेत पराभूत मुलाची समजूत घालण्यासाठी नारायण राणे लोकसभा निवडणुक निकालावर  हेराफेरीचा आरोप करीत आहेत

कणकवली : राणेंना मतदारांनी नाकारले असल्याने आगामी निवडणुकीत त्यांचा  कोणताही पक्ष आणि चिन्ह असले तरी  पराभव अटळ आहे. आमचा  पक्ष आणि चिन्ह नवीन होते.असे ते म्हणत आहेत. मात्र,  २०१४ मध्ये 'हात ' या निशाणीचा शेकडो वर्षे जुना पक्ष असतानाही निलेश राणे यांचा पराभव झाल्याचा आमदार नितेश राणे यांना विसर पडला आहे. असे सांगतानाच मतदारांनी नाकारल्याचे आतातरी राणे यांनी मान्य करावे . असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख  आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.

        कणकवली येथील विजय भवन मध्ये  शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले,सिंधुदुर्गातील मतदारांनीही विनायक राऊत यांना भरघोस मतदान केले आहे. भाजपाने प्रामाणिक साथ  दिल्याने हा विजय सोपा झाला.त्यामुळे भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आम्ही मनापासुन आभार मानतो. खासदार आणि शिवसेना सचिव म्हणून विनायक राऊत यांची उज्ज्वल कारकीर्द असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांना केंद्रीयमंत्री पदाची  संधी देतील असा विश्‍वास आमदार नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.         ते पुढे म्हणाले, आगामी निवडणुकीत कोणताही पक्ष आणि चिन्ह घेतले तरी नारायण  राणेंचा पराभव अटळ आहे. लोक राणेना कंटाळले आहेत. राणेंच्या कार्यकर्त्याना मते मिळतात, ते निवडणुका जिंकतात मग राणेंचा पराभव का होतो याचे आत्मचिंतन  आमदार नितेश राणे यांनी करावे . आमदार नितेश राणे यांच्या खोट्या योजनांचा मतदारांनी पर्दाफाश  केला आहे. कणकवली मतदारसंघात त्यांनी खोटी आश्‍वासने दिली आहेत. त्यांच्या सर्व योजना बंद झाल्या आहेत. त्यांच्या या खोट्या आश्‍वासनामुळेच  त्यांचे कणकवलीतील मताधिक्य घटले आहे.  विधानसभेला कणकवली मतदारसंघातही युतीचा आमदार विजयी होणार असुन आगामी काळात अनेक पक्षातील नेते सेना-भाजपात सामील होतील. केंद्रानंतर राज्यातही  सेना-भाजपाचेच सरकार येणार असुन स्वाभिमान या सिंधुदुर्गातील प्रायव्हेट लिमिटेड पक्षातील असंतुष्ट पदाधिकार्‍यांनी पक्षाबाबत वेळीच निर्णय घ्यावा आणि मुख्य प्रवाहात यावे.         पराभूत मुलाची समजूत घालण्यासाठी नारायण राणे लोकसभा निवडणुक निकालावर  हेराफेरीचा आरोप करीत आहेत . त्यांना लोकांनी नाकारल्याचे आता तरी राणे यांनी मान्य करावे. चार वेळा पराभव पत्करावा लागलेल्या राणे यांना मनातुन पराभव मान्य असेल परंतु मुलाची समजुत काढण्यासाठी ते हेराफेेरीचा आरोप करीत असल्याचे आमदार वैमव नाईक यावेळी  म्हणाले.

विनायक राऊत हेे केंद्रात मंत्री असतील  !

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील मतदारांनी शिवसेनेचे विनायक राऊत यांना चांगले मताधिक्य मिळवून दिले आहे.विधानसभेतही आमची घौडदौड अशीच सुरू राहणार आहे. तसेच विनायक राऊत हे निश्‍चितपणे केंद्रात मंत्री असणार आहेत. असेही वैभव नाईक यावेळी म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालsindhudurgसिंधुदुर्ग